नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


श्री रामानुजाचार्य

Go down

श्री रामानुजाचार्य Empty श्री रामानुजाचार्य

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 9:44 pm

श्री रामानुजाचार्य 8616_Mahasan

आद्य शंकराचार्यांनी माया कल्पित असल्यामुळे 'ब्रह्म सत्य जगन्मिथ्या' असे अद्वैत मत मांडताना जगाचे स्वतंत्र अस्तित्व नाकारले. परंतु दक्षिणेकडील विष्णुभक्तांना त्यांचा हा अद्वैतवाद रुचला नाही. अशा वैष्णवांनी रामानुजाचार्यांचा विशिष्टाद्वैतवाद उचलून धरला. ब्रह्म ही ईश्वराची संज्ञा. ईश्वर हा चित् आणि अचित् या दोन्ही तत्त्वांनी युक्त असून जीव आणि जगत् ही तत्वे नित्य आहेत. सृष्टीकाळी त्यांचे स्वरुप स्थूल असते तर प्रलयकाली ते सूक्ष्म असते. कोणत्याही काळी ब्रह्माच्या ठिकाणी ही विशिष्टता राहतेच. म्हणून या या दर्शनाला विशिष्टाद्वैत असे नाव मिळाले. या दर्शनाचे पहिले आचार्य रंगनाथमुनी. यामुनाचार्य हे त्यांचे नातू. ते दुसरे आचार्य. यामुनाचार्यांचा प्रचारप्रसार करून त्याला प्रतिष्ठा मिळवून दिली.

इ. स. १०१७ मध्ये तामिळनाडूतील पेरुंबूदूर या गावी रामानुजांचा जन्म झाला. श्रीशैलपूर्ण हे पुष्कळ वर्षांनी झालेल्या भाच्याला बघावयास आले असता त्यांना त्याच्या शरीरावर रामाचा भाऊ लक्ष्मण याच्याशी साम्य दाखविणारी लक्षणे दिसली. म्हणून या तेजस्वी दिसणार्‍या भाच्याचे नाव त्यांनी रामानुज ठेवले. रामानुजांचे प्राथमिक शिक्षण वडिलांकडे झाले. पुढे कांची येथील यादवप्रकाश या महान अद्वैतवादी आचार्यांकडे त्यांनी वेदांताचे शिक्षण पूर्ण केले. कुशाग्र बुद्धीमुळे पुढे रामानुजांचे गुरूंशी वादविवाद, मतभेद होऊ लागले. त्यामुळे प्रत्यक्ष गुरूच शिष्याचा द्वेष करू लागले. रामानुजांचा परस्पर काटा काढण्यासाठी योजना आखून ते सर्व शिष्यांना घेऊन काशीस जाण्यास निघाले. रामानुजांचे मावसबंधू गोविंद यांना हा कट कळला होता. त्यांनी संधी मिळताच रामानुजांना सावध केले. त्यामुळे एका रात्री रामानुज पळून पुन्हा घरी आले.

पुढे त्यांचा विवाह झाला. त्यांचे अध्ययन आणि हुशारी श्रीरंगमच्या यामुनाचार्यांच्या कानावर गेली. आपल्या संप्रदायाचा उत्तराधिकारी रामानुजांना करावे या इच्छेने प्रेरित होऊन ते कांचीला रामानुजांकडे येण्यास निघाले. त्याचवेळी त्यांना भेटायला म्हणून कांचीहून रामानुजही निघाले होते. मात्र वाटेतच यामुनाचार्यांचे निधन झाले. रामानुजांना त्यांचे अंत्यदर्शन घेत असताना यामुनाचार्यांच्या हाताची तीन बोटे दुमडलेली दिसली. त्यांनी यामुनाचार्यांच्या शिष्यांना त्याचा अर्थ विचारला. तेव्हा ब्रह्मसूत्रावर भाष्य लिहिणे, विशिष्टाद्वैत मताचा प्रचार करणे आणि तेव्हाच्या दिल्लीच्या बादशहाकडे असलेली विष्णुमुर्ती परत घेणे या त्यांच्या तीन इच्छा अपुर्‍या राहिल्याने तीन बोटे दुमडलेली आहेत, असा अर्थ सांगण्यात आला. ते ऐकताच रामानुजांनी आपण या तिन्ही इच्छा पूर्ण करू अशी प्रतिज्ञा केली. त्क्षणी बोटे सरळ झाली. पुढच्या काळात रामानुजांनी ही प्रतिज्ञा पूर्ण केली.

वैवाहिक जीवन फारसे चांगले नसल्याने पत्नीला माहेरी पाठवून त्यांनी संन्यास घेतला. वरदराजाच्या मंदिराशेजारी मठ स्थापला. त्यांना त्या काळात अनेक शिष्यगणांबरोबर शिष्याही मिळाल्या. विशेष म्हणजे त्यांचे पहिले गुरू यादवप्रकाश यांनीही त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. पुढे यामुनाचार्यांचा मुलगा वरदरंग याने स्वत: येऊन रामानुजांना सन्मानपूर्वक श्रीरंगमला नेले. तेथील देवालय आणि मठाची सूत्रे रामानुजांकडे सोपविली. त्या वेळी रामानुजांनी पुन्हा एकदा गोष्ठीपूर्णाकडून दीक्षा घेतली. त्यांनी ओम नमो नारायणाय: हा मंत्र देऊन हा मंत्र रहस्यपूर्ण असून तो माणसाला मुक्ती देणारा आहे. मात्र तो कोणालाही देऊ नकोस, असे सांगताच रामानुज देवळाच्या शिखरावर चढून तो मंत्र मोठ्याने उच्चारू लागले. त्यांचा तो मंत्र शेकडो स्त्री-पुरुषांनी ऐकला. त्यांच्या या कृतीने गोष्ठीपूर्णांनी तू गुरुची आज्ञा मोडलीस म्हणून नरकात जाशील, अशी शापवाणी उच्चारली. त्यावर रामानुजांनी - मंत्र ऐकणारे हे सारे आपल्या कृपेने मोक्षप्राप्तीस लायक ठरणार असतील आणि मी एकटाच नरकात जाणार असेल तर मला आनंद वाटेल, असे उत्तर दिले. त्यांच्या या उत्तराने गोष्ठीपूर्ण प्रसन्न झाले. आजपासून विशिष्टाद्वैत तुझ्या नावाने रामानुजदर्शन म्हणून ओळखले जाईल, असे उद्गार त्यांनी काढले.

पुढे आयुष्यभर रामानुजाचार्यांनी अध्यापन आणि धर्मप्रचार केला. वयाच्या १२० व्या वर्षी इ. स. ११३७ मध्ये त्यांनी देह ठेवला.

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही