Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
संसार - शिमगा सांग निरसिती
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
संसार - शिमगा सांग निरसिती
होलिकोत्सव, म्हणजे होळीचा सण हा सर्वांच्या विशेषत: लहान मुलांच्या अधिक आवडीचा सण आहे. कोणा एका राक्षसीने गावातल्या मुलांना त्रास देण्यास, छळण्यास सुरवात केली. तेव्हा गावातल्या सर्व रहिवाशांनी एकत्र येऊन तिला तोंडाला येतील त्या शिव्या दिल्या. अश्लील आणि बिभत्स शब्दांनी तिला वाटेल तसे वाक्ताडन केले आणि सगळीकडे आगी पेटवून तिला घाबरवून पळवून लावले, अशी होळीच्या उत्पत्तीची कथा आहे. म्हणजे होळीचा प्रारंभ हा मुलांना त्रासातून सोडविण्यासाठी आणि भयमुक्त करण्यासाठी झाला, असे दिसते.
होळीचे हे स्वरूप जनसामान्यांच्या अंगीही वीरश्री खेळविणारे आहे. पालथा हात तोंडावर धरून कोणाच्याही नावाने वाटेल तसा शिव्यांचा भडीमार करण्याची मुभा ह्या सणात असते असे लोक धरून चालतात. ज्याला शिव्या दिल्या जातात, त्यानेही तक्रार करू नये किंवा विरोध दर्शवू नये, असा संकेत आहे. त्यामुळे होळीचा सण हा मनावरची सगळी बंधने दूर करणारा ठरतो. बहुजन समाजात होळीचे असे खास महत्त्व असले तरी शिष्ट महाजन मात्र ''होळी रे होळी, पुरणाची पोळी एवढयावरच समाधान मानतात.
प्रत्येक घटनेतून किंवा सांस्कृतिक विषयातून पारमार्थिक बोध करण्याचा वसा घेतलेल्या आपल्या संतमंडळींनी होळीसारख्या सणात काही अध्यात्म वा परमार्थ पाहिला नसता तरच नवल होते ! श्री समर्थ स्वामींनी अनेक विषयांवर पंचके लिहिली आहेत. तसे त्यांचे होळीपंचकसुद्धा आहे. इतर संतांनीही होळी ह्या विषयावर विविध रचना केल्या आहेत. एकनाथांनी होळीवर पुढील रूपक रचले आहे.
देह चतुष्टयाची रचोनि होळी
ज्ञानाग्नि घालुनी समूळ जाली
अझुनी कां उगलाची बोंब पडों दे
नामाची मांदी मेळवा
संतांची तुम्ही साची सोडवण्या धावण्या धावती
संत अंतरंग संसार शिमगा सांग निरसिती
एका जनार्दनी मारिली बोंब
जन वन स्वयंभ एक जालें
ज्ञानाग्नि घालुनी समूळ जाली
अझुनी कां उगलाची बोंब पडों दे
नामाची मांदी मेळवा
संतांची तुम्ही साची सोडवण्या धावण्या धावती
संत अंतरंग संसार शिमगा सांग निरसिती
एका जनार्दनी मारिली बोंब
जन वन स्वयंभ एक जालें
संसाराचा शिमगा निरसण्यासाठी नाथांनी 'बोंब पडों दे नामाची' असा इलाज सांगितला आहे. ह्या होळीचा अग्निसुद्धा त्यांना साधासुधा नको, त्यांना हवा आहे ज्ञानाग्नि ! मग ही होळी धडाडून पेटली की तिच्यासमोर बोंब मारण्यास एकनाथ पुढे सरसावतात आणि जन वन स्वयंभ एक जालें अशी तिची फलश्रुती सांगतात.
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin