नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


आषाढाच्या पहिल्या दिवशी

Go down

आषाढाच्या पहिल्या दिवशी Empty आषाढाच्या पहिल्या दिवशी

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:24 pm

आषाढाच्या पहिल्या दिवशी 7022_MahaS

आषाढ महिन्याचा पहिला दिवस. हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून मानला जातो. कालिदासाची संस्कृतमधील रचना ही त्या भाषेची श्रीमंती वाढवणारी आहे. रघुवंश, ऋतुसंहार, कुमारसंभव, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीय, शाकुंतल, मेघदूत अशा एकाहून एक सरस असलेल्या कालिदासाच्या साहित्य संभारातील प्रत्येक रत्न अनेक गुणांनी शोभणारे आहे. त्याने फक्त मेघदूत लिहिले असते तरी तो महाकवी म्हणून गणला गेला असता, असे विद्वान म्हणतात.

मेघदूत हे खंडकाव्य अलकानगरीतील एका यक्षाने आपल्या प्रियेला मेघाबरोबर म्हणजे ढगाबरोबर जो संदेश पाठविला त्याचे वर्णन करणारे आहे. या यक्षाच्या हातून काही चूक घडल्यामुळे कुबेराने त्याला वर्षभर अलका नगरीपासून दूर राहण्याची शिक्षा फर्मावली. त्याप्रमाणे यक्ष रामगिरी येथे मुक्कामास असताना आषाढाच्या पहिल्या दिवशी आभाळात स्वैर विहार करणार्‍या मेघाला पाहून त्याला आपल्या प्रियेची तीव्र आठवण झाली.

मेघदूत हे काव्य अतिआल्हादक असे आहे. या काव्याची अनेक भाषांतरे मराठीमध्ये झली. ती भाषांतरेही मातब्बर मंडळींनी अतिशय सुरेख अशी केलेली आहेत. मेघदूताचे पूर्व-मेघ आणि उत्तर-मेघ असे दोन भाग आहेत.

त्यामधील उत्तर मेघातील त्वामालिख्य प्रणयकुपिता धातुरागै: शिलाया:। मात्मानं ते चरणपतितं यावदिच्छामि कर्तुम् ।। अस्त्रैस्तावन्मुहुरुपचितैदृष्टिरालुप्यते मे। क्रूरस्तस्मिन्नपि न सहते संगमं नौ कृतान्त: ।। हा श्लोक रसिकांच्या विशेष पसंतीला उतरलेला आहे.

त्याचा भावार्थ असा - प्रिये, प्रेमभराने तू माझ्यावर रागावली आहेस आणि तुझा अनुनय करीत मी तुझ्या पाया पडत आहे, असे रेखाचित्र शिलाखंडावर काढण्याचा मी प्रयत्न केला, पण ते चित्र काढताना माझे डोळे आसवांनी भरून जातात. क्रूर काळ इतका कठोर आहे की, त्याला चित्रातदेखील तुझी -माझी भेट होऊ नये असे वाटते.

भारताचे माजी अर्थमंत्री महाराष्ट्र-कंठमणी चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख यांनी केलेले भाषांतर असे आहे - तूझी मूर्ती प्रणय-कुपिता गेरुचा जीस रंग। काढोनी जों चरणि तिचिया ठेवण्या इच्छि अंग।। तेव्हा माझी डबडबुनि हो अश्रुंनी लुप्त दृष्टी । तेथेंही ना रुचत अपुल्या क्रूर दैवासि भेटी ।। याच श्लोकाचे कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांनी केलेले भाषांतर पुढीलप्रमाणे आहे - रुसलेली तूं-तव चरणाशीं मी करितों याचना। कधीं शिळेवर चितारण्याला बसतों ही कल्पना ।। तोंच लोटतें जल नेत्रांतुन, नजरेला अंधता। नशीब निर्दय भेट आपुली तेथेंही साहिना !।।

अतिमोहक शब्दकळा अवगत असलेले बा. भ. बोरकर यांनी केलेले भाषांतर हे असे आहे - तूं रुष्टा, मी शरण चरणीं, रेखण्या चित्र ऐसें। बैसू जातां निवडुनि शिळा आणि गेरु प्रयासें।। डोळां पाणी भरभरुनिया झांकळे दृष्टिधर्म । चित्रीं सुद्धां युति घडुं न दे, हें असे दुष्ट कर्म।।

आणि शांताबाई शेळके यांनी केलेले भाषांतर हे असे आहे - रुसलेली तू धातूरसांनी चित्र शिळेवर असें रेखितों। चरणीं तुझिया नत झालेल्या मला, सखी, मी रंगवूं बघतो।। तोंच आंसवें नयनि दाटती, दृष्टी माझी होते धूसर। चित्रांतीलही मीलन अपुलें सहन होइना दैवा निष्ठूर !।।

कवी हे शब्दसृष्टीचे ईश्वर. सगळ्याच कवींना ईश्वरपदी बसवावेसे वाटले नाही तरी अनामिकेला सार्थ करणार्‍या कालिदासासारख्या थोर कवीची प्रतिभा हा एक ईश्वरी अंशाचाच आविष्कार असतो, यात काय संशय ?
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही