Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
गिरीराज गाविलगड
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
गिरीराज गाविलगड
गाविलगड ह किल्ला विदर्भाचे भूषण आहे. गाविलगडाचा किल्ला गिरीदुर्ग प्रकारचा असून तो अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यामध्ये आहे.
अमरावती जिल्ह्याच्या वायव्येकडे असणारा चिखलदरा तालुका सातपुड्याच्या डोंगररांगेवार वसलेला आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. तसेच येथील मेळघाटचा व्याघ्र प्रकल्पही भारतात प्रसिद्ध आहे.
चिखलदर्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर कडून धारणी हरिसाल, सेमाडोह ते चिखलदरा हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असल्यामुळे हा गाडीरस्ता सुर्यास्त ते सुर्योदय या रात्रीच्या वेळेस बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होवू शकते. चिखलदरा ते गाविलगड हे दोन किलोमिटरचे अंतर असून गाविलगडापर्यंत वाहनाने आपण जावू शकतो. चिखलदर्याच्या कडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.
गडाजवळ या दांडाची रुंदी कमी आहे. या बाजूला खंदक खोदून किल्ला पठारापासून विभक्त केलेला आहे. खंदकाच्या मागे भक्कम तटबंदी बांधलेली असून या तटबंदीमध्ये माची दरवाजा आहे. हा भाग गाविलगडाच्या माचीचा आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्हीकडून तटबंदी असून मधून मार्ग आहे. यामार्गावर लपवलेला दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच्या भागात पहारेकर्यांच्या निवासस्थानाचे अवशेष दिसतात. समोरचा रस्ता माचीच्या अंतर्भागात जातो तर डावीकडील रस्ता मुख्य किल्ल्याकडे जातो. या पायवाटेच्या मार्गाने निघाल्यावर समोरच्या पठारावरील तटबंदी आणि त्यातील दिल्ली दरवाजा आणि शार्दुल दरवाजा आपले लक्ष वेधून घेतात. साधारण किलोमीटर अंतरावरील या शार्दुल दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी डावीकडील टेकडीला वळसा घालून पायवाट जाते.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम आपल्याला चकीत करते. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे पहात रहावी अशीच आहेत. लांबरुंद पायर्यावरुन आपण दरवाजामधून प्रवेश करतो. आतील पहारेकर्यांच्या जागा, घुमट पाहून पुढे चालू लागतो. पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चवथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा आपली वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशाप्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर आढळत नाही.
गाविलगडाचे हे वैभवशाली बांधकाम पहाताना सहाजिकच त्याचा इतिहास आपल्या समोर येतो. हा भाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पुर्वी या डोंगरावर गवळी लोकांना मातीचा कोट उभारला होता. अशी वंदता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणार्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनिय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करुन ठेवली आहे.
गाविलगडाचे संपूर्ण दर्शन घेण्यासाठी आपल्याला सहा सात तासांचा अवधी हवा. आठ दहा किलोमिटर क्षेत्र फळामध्ये पसरलेल्या गाविलगडावर बामणी ताल, देव ताल, लेंड ताल, खांब ताल, धोबी ताल, सती ताल अशा नावाचे पाण्याचे तलाव आहेत. मांजरी बुरुज, बेहराम बुरुज, सोनकिल्ला बुरुज असे जवळ जवळ ३६ बुरुज किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आहेत. या शिवाय अनेक वास्तुंचे अवशेष सर्वत्र विखूरलेले आहेत.
गाविलगडाची भव्यता त्याच्या भग्नावशेषात सामावली असल्याची हुरहुर आपल्याला अस्वस्थ करते. गाविलगडाची गळाभेट ही जाताजाता घेण्यासारखी नाही हे मात्र निश्चितपणे आपल्याला पटते.
अमरावती जिल्ह्याच्या वायव्येकडे असणारा चिखलदरा तालुका सातपुड्याच्या डोंगररांगेवार वसलेला आहे. विदर्भातील थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा प्रसिद्ध आहे. तसेच येथील मेळघाटचा व्याघ्र प्रकल्पही भारतात प्रसिद्ध आहे.
चिखलदर्यापासून गाविलगडाचा बलदंड किल्ला दोन कि.मी. अंतरावर आहे. चिखलदरा येथे पोहोचण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत. त्यापैकी एक जळगाव, भुसावळ, बुर्हाणपूर कडून धारणी हरिसाल, सेमाडोह ते चिखलदरा हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असल्यामुळे हा गाडीरस्ता सुर्यास्त ते सुर्योदय या रात्रीच्या वेळेस बंद करण्यात येतो.
दुसरा मार्ग अमरावती, अचलपूर, परतवडा, ते चिखलदरा असा आहे. या मार्गावर धामनगाव गढी ते चिखलदरा हा घाटरस्ता आहे. चिखलदरा येथे मुक्कामाची व जेवणाची उत्तम सोय होवू शकते. चिखलदरा ते गाविलगड हे दोन किलोमिटरचे अंतर असून गाविलगडापर्यंत वाहनाने आपण जावू शकतो. चिखलदर्याच्या कडून निघालेल्या एका दांडावरील पठारावर गाविलगडाचा किल्ला बांधलेला आहे.
गडाजवळ या दांडाची रुंदी कमी आहे. या बाजूला खंदक खोदून किल्ला पठारापासून विभक्त केलेला आहे. खंदकाच्या मागे भक्कम तटबंदी बांधलेली असून या तटबंदीमध्ये माची दरवाजा आहे. हा भाग गाविलगडाच्या माचीचा आहे. या दरवाजातून आत शिरल्यावर दोन्हीकडून तटबंदी असून मधून मार्ग आहे. यामार्गावर लपवलेला दुसरा दरवाजा आहे. या दरवाजाच्या आत पहारेकर्यांच्या देवड्या आहेत. समोरच्या भागात पहारेकर्यांच्या निवासस्थानाचे अवशेष दिसतात. समोरचा रस्ता माचीच्या अंतर्भागात जातो तर डावीकडील रस्ता मुख्य किल्ल्याकडे जातो. या पायवाटेच्या मार्गाने निघाल्यावर समोरच्या पठारावरील तटबंदी आणि त्यातील दिल्ली दरवाजा आणि शार्दुल दरवाजा आपले लक्ष वेधून घेतात. साधारण किलोमीटर अंतरावरील या शार्दुल दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी डावीकडील टेकडीला वळसा घालून पायवाट जाते.
शार्दुल दरवाजाचे भव्य आणि भक्कम बांधकाम आपल्याला चकीत करते. दरवाजावरील शार्दुलाची शिल्पे पहात रहावी अशीच आहेत. लांबरुंद पायर्यावरुन आपण दरवाजामधून प्रवेश करतो. आतील पहारेकर्यांच्या जागा, घुमट पाहून पुढे चालू लागतो. पुन्हा एक दरवाजा लागतो. हा दरवाजा म्हणजे चवथा दरवाजा आहे. हा दरवाजा ओलांडून पुढे गेल्यावर गडाचा मुख्य असा दिल्ली दरवाजा आपली वाट अडवून उभा असतो. हा या मार्गावरील पाचवा दरवाजा आहे. या भव्य दरवाजाच्या आतल्या बाजूला पहारेकर्यांच्या निवासाचे कक्ष आहेत. दरवाजाला लागूनच असलेले अशाप्रकारचे भव्य बांधकाम महाराष्ट्रातील इतर किल्ल्यावर आढळत नाही.
गाविलगडाचे हे वैभवशाली बांधकाम पहाताना सहाजिकच त्याचा इतिहास आपल्या समोर येतो. हा भाग बहमनी सुलतानांच्या ताब्यात होता. तत्पुर्वी या डोंगरावर गवळी लोकांना मातीचा कोट उभारला होता. अशी वंदता आहे. बहमनी सुलतानाच्या काळात सातपुड्याच्या संरक्षणासाठी शहाबुदीन अहमदशहाने हा बलदंड किल्ला बांधून उत्तरेकडून होणार्या आक्रमणाला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. पुढे हा किल्ला औरंगजेबाकडे आला. नंतरच्या काळात हा भोसल्यांच्या ताब्यात असताना यावर बेणीसिंह नावाचा किल्लेदार होता. त्यावेळी झालेल्या इंग्रजांबरोबरच्या युद्धात बेणीलिंगाने अतुलनिय पराक्रम केला. त्याच्या या पराक्रमाची प्रशंसा जनरल सर जेस्पर निकोल्स यांनी आपल्या नोंदवहीत करुन ठेवली आहे.
गाविलगडाचे संपूर्ण दर्शन घेण्यासाठी आपल्याला सहा सात तासांचा अवधी हवा. आठ दहा किलोमिटर क्षेत्र फळामध्ये पसरलेल्या गाविलगडावर बामणी ताल, देव ताल, लेंड ताल, खांब ताल, धोबी ताल, सती ताल अशा नावाचे पाण्याचे तलाव आहेत. मांजरी बुरुज, बेहराम बुरुज, सोनकिल्ला बुरुज असे जवळ जवळ ३६ बुरुज किल्ल्याच्या तटबंदी मध्ये आहेत. या शिवाय अनेक वास्तुंचे अवशेष सर्वत्र विखूरलेले आहेत.
गाविलगडाची भव्यता त्याच्या भग्नावशेषात सामावली असल्याची हुरहुर आपल्याला अस्वस्थ करते. गाविलगडाची गळाभेट ही जाताजाता घेण्यासारखी नाही हे मात्र निश्चितपणे आपल्याला पटते.
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin