Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 3 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 3 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
वाघ्या-मुरळी जागरण
:: विविधा
पृष्ठ 1 - 1 पैकी
वाघ्या-मुरळी जागरण
खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. मणि आणि मल्ल या आसूरांचा नाश करण्यासाठी शंकराने खंडोबांचा अवतार घेतला. खंडोबाला मार्तंड मल्हारी, म्हाळसावंत मैलार, असंही म्हणतात. खंडोबाची उपासना करणारे खंडोबाला हे जागृत देवस्थान आहे, हे मनोमन मानतात. त्याची पूजाअर्चा करण्याच्या विधीला 'जागरण' घालणे असं म्हटलं जातं, नवदाम्पत्यांना सुख समृद्धी लाभावी म्हणून त्याचे जागरण घालतात.
आपण जागे राहून देवाला जागं करणं याला जागरण म्हणतात. जागरण घालणारे ' वाघ्या मुरळी ' हे खंडोबाचे निस्सिम भक्त. ज्या घरी मुलबाळ होत नाही ते खंडोबाला नवस करतात की, आम्हाला मुलगा झाला तर आम्ही त्याला तुझ्या नावानं वाघ्या सोडू आणि मुलगी झाली तर तिला मुरळी सोडू..
वाघ्या मुरळी शिवाय खंडोबाचे जागरण होत नाही. देवाला सोडलेल्या या वाघ्या नी मुरळीला लग्न करण्याचा अधिकारी नाही, कारण त्यांचे देवाशी (खंडोबाशी) लग्न झालेलं असत. त्याच्या नावानं भिक्षा मागणं आणि त्या भिक्षेवर आपली उपजिविका करणं, हा वाघ्या मुरळीच्या आयुष्याचा नितक्रम झालेला आहे.
गोंधळात आईचा मांड भरला जातो. तसाच जागरणात चौरंग्यावर पांढरेशुभ्र कापडावर गहू, तांदूळ, खारका, स्त्रोत्र यांच्यावर हळद कुंकू या पूजेच्या वस्तू ठेवून चौरंग सजविला जातो. त्याला गादी भरणे असेही म्हणतात. ताटावर खंडोबाचा टाकं ठेवून पूजा केली जाते, या पूजेत भंडार्याला अधिक मान दिला जातो. भंडारा उधळून 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा गजर होतो.
जागरणाला सुरुवात होते. पूर्व रंगात गण म्हटला जातो, व उत्तररंगात खंडोबाच्या लग्नाची कथा तर म्हाळसा आणि वाणाई या त्यांच्या दोन बायकांच्या भांडणाची कथा, देवाच्या गोष्टी अशा विषयाचा 'वग' लावला जातो. पूर्व रंगात गण म्हटला जातो. वाघ्या मुरळ्यांच्या वेगवेगळ्या संचाने गण म्हटले आहेत. इथं शंकर धामणीकरांचा गण नमुन्याखातर...
या गणा या या रणा या
विघ्न हराया ताराया - धृ.
तुझ्याच स्मरणी जग हे तरले
अखंड व्यापूनी त्रिखंड उरले
पाखंड मनाला कधीना नुरले
दुखंड जनाला ताराया
नंतर देवादिकांना जागरणासाठी आवाहन केलं जातं.
कोडथनच्या मल्हारी जागरणाला याव जी
जागरणं मांडीलं मल्हारी जागरणाला याव जी
नळदुर्गाच्या मल्हारी जागरणाला याव
जेजुरीच्या मल्हारी जागरणाला याव
पालपेंनरच्या मल्हारी जागरणाला याव.
वाघ्या दिमडी वाजवतो आणि मुरळी हातात घाटी घेऊन नाचते, दोघेही सुंदर नृत्य करतात. खंडोबा, म्हाळसा, बाबाईंची पदं गातात. गाण्यासोबत संचातली कलाकार मंडळी विनोदाची पखरण करुन सवांदानी जनतेचं मनोरंजन केलं जातं, पहाटे पहाटे वग संपतो, मग देवाचा नांगर तोडण्याचा विधि होऊन जागरणाची समाप्ती होते.
वाघ्या मुरळी हा लोककलाप्रकार आजही प्रचलित असला तरी वाघ्या आणि मुरळी सोडणे ही एक अंधश्रद्धा आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. हा प्रकार आता कमी होतांना दिसतो.
# लोकशाहीर विठ्ठल उमप
आपण जागे राहून देवाला जागं करणं याला जागरण म्हणतात. जागरण घालणारे ' वाघ्या मुरळी ' हे खंडोबाचे निस्सिम भक्त. ज्या घरी मुलबाळ होत नाही ते खंडोबाला नवस करतात की, आम्हाला मुलगा झाला तर आम्ही त्याला तुझ्या नावानं वाघ्या सोडू आणि मुलगी झाली तर तिला मुरळी सोडू..
वाघ्या मुरळी शिवाय खंडोबाचे जागरण होत नाही. देवाला सोडलेल्या या वाघ्या नी मुरळीला लग्न करण्याचा अधिकारी नाही, कारण त्यांचे देवाशी (खंडोबाशी) लग्न झालेलं असत. त्याच्या नावानं भिक्षा मागणं आणि त्या भिक्षेवर आपली उपजिविका करणं, हा वाघ्या मुरळीच्या आयुष्याचा नितक्रम झालेला आहे.
गोंधळात आईचा मांड भरला जातो. तसाच जागरणात चौरंग्यावर पांढरेशुभ्र कापडावर गहू, तांदूळ, खारका, स्त्रोत्र यांच्यावर हळद कुंकू या पूजेच्या वस्तू ठेवून चौरंग सजविला जातो. त्याला गादी भरणे असेही म्हणतात. ताटावर खंडोबाचा टाकं ठेवून पूजा केली जाते, या पूजेत भंडार्याला अधिक मान दिला जातो. भंडारा उधळून 'येळकोट येळकोट जय मल्हार' असा गजर होतो.
जागरणाला सुरुवात होते. पूर्व रंगात गण म्हटला जातो, व उत्तररंगात खंडोबाच्या लग्नाची कथा तर म्हाळसा आणि वाणाई या त्यांच्या दोन बायकांच्या भांडणाची कथा, देवाच्या गोष्टी अशा विषयाचा 'वग' लावला जातो. पूर्व रंगात गण म्हटला जातो. वाघ्या मुरळ्यांच्या वेगवेगळ्या संचाने गण म्हटले आहेत. इथं शंकर धामणीकरांचा गण नमुन्याखातर...
या गणा या या रणा या
विघ्न हराया ताराया - धृ.
तुझ्याच स्मरणी जग हे तरले
अखंड व्यापूनी त्रिखंड उरले
पाखंड मनाला कधीना नुरले
दुखंड जनाला ताराया
नंतर देवादिकांना जागरणासाठी आवाहन केलं जातं.
कोडथनच्या मल्हारी जागरणाला याव जी
जागरणं मांडीलं मल्हारी जागरणाला याव जी
नळदुर्गाच्या मल्हारी जागरणाला याव
जेजुरीच्या मल्हारी जागरणाला याव
पालपेंनरच्या मल्हारी जागरणाला याव.
वाघ्या दिमडी वाजवतो आणि मुरळी हातात घाटी घेऊन नाचते, दोघेही सुंदर नृत्य करतात. खंडोबा, म्हाळसा, बाबाईंची पदं गातात. गाण्यासोबत संचातली कलाकार मंडळी विनोदाची पखरण करुन सवांदानी जनतेचं मनोरंजन केलं जातं, पहाटे पहाटे वग संपतो, मग देवाचा नांगर तोडण्याचा विधि होऊन जागरणाची समाप्ती होते.
वाघ्या मुरळी हा लोककलाप्रकार आजही प्रचलित असला तरी वाघ्या आणि मुरळी सोडणे ही एक अंधश्रद्धा आहे हे लोकांच्या लक्षात आले आहे. हा प्रकार आता कमी होतांना दिसतो.
# लोकशाहीर विठ्ठल उमप
:: विविधा
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin