Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
संकासूर आणि वनमाळी
पृष्ठ 1 - 1 पैकी
संकासूर आणि वनमाळी
१२ व्या शतकात संपूर्ण भारतात आध्यात्मिक क्रांती झाली. त्यातून संकीर्तनाची आणि संकीर्तनातून भक्तिनाट्याची परंपरा पुढे आली. भक्तिनाट्यांमध्ये दैवी आणि मानवी पात्रांमधील संप्रेषणाने सतत विनोद निर्मिती होत राहिली. कीर्तनियां, चारण, भाट, नटुआ अषी भक्तिनाटयातील पात्रे भारतीय रंगभूमीवर सर्वपरिचित आहेत. महाराष्ट्रापुरता विचार केला तर भक्तिनाटयातील नवरसधारांनी मराठी मन ओलेचिंब झाल्याचे दिसते. भक्तिनाटयातील दैवी आणि मानवी पात्रांमधील संवाद अर्थात संप्रेषण आणि अभिजात संस्कृत रंगभूमीवरील विदुषक आणि कांचुकिय यांच्यासारखी पात्रे अणि त्यांचे देव किंवा दैवी पातळीवरील पात्रांशी होणारे संवाद किंवा संप्रेषण यातून विनोद निर्मिती होते. महाराष्ट्रातील लळित, दशावतारासारखी भक्तिनाटये म्हणजे परमार्थिक लोकसाहित्याची अंग-उपांगे होत. लळित आणि दशावतारात एक समान सूत्र दिसते ते असे, ही दोन ही भक्तिनाटये असून विश्णूच्या दहा अवतारांचे संकीर्तन नाटयरूपाने या भक्तिनाटयामध्ये पूर्वरंगात होते. कधी हे संकीर्तन विस्ताराने तर कधी संक्षेपाने होते. यात दैवी पात्रांचे प्रतिनिधित्व गणपती, रिद्धी, सिद्धी, विष्णू, ब्रम्हदेव यासारख्या देवता करतात. तर मानवी पात्रांचे प्रतिनिधित्व वनमाळी, संकासूर या पात्रांद्वारे होते.
दशावतारातील संकासूर अणि लळितातील वनमाळी ही दोन्ही पात्रे सर्व सामान्यांचे प्रतिनिधित्व करतात. ही पात्रे जमिनीवरची वाटतात. त्यांचे जीवनविषयक तत्वज्ञान भौतिक पातळीवरचे असते. हे तत्वज्ञान सांगतांना 'आम्ही भावबळे देव` प्रसन्न करून घेतो. तो आमच्या प्रेमापोटी आमचा होतो. आमच्या संकीर्तन भक्तिने त्याच्या आमच्यातील द्वैत गळून पडते अषी या मानवी पातळीवरील पात्रांची भूमिका असते. लळितातील वनमाळी आणि दषावतारातील संकासूर यांच्यातील साम्यस्थळांचा वेध घेतांना एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे दोघांचाही वेष चित्रविचित्र. वनमाळी वर उघडाबंब, कमरेला घुंगुरमाळा, ढोपरापर्यत धोतर, डोक्याला मुंडासे, कमरेला झाडांचा पाला अशा वेशात प्रवेश करतो. तो अंगभर गोपीचंदाचा टिळा लावतो. झाडाची पाने खात-खात कमरेला टचका देत आणि घुंगुरमाळा वाजवित वनमाळी ज्यावेळी 'फडफड नाना, फडफड नाना` अशा आरोळया देत येतो, तेव्हा पोरेसोरे घाबरतात. संकासूराचाही वेश चित्रविचित्रच असतो. तो नखशिखान्त काळा वेश धारण करतो आणि त्याच्या जिभेचा शेंडा लांबच लांब लाल असतो. वनमाळी आणि संकासूर दोहोंचेही बोलणे चमत्कृतीपूर्ण, ग्राम्य, अतिषयोक्तीकडे झुकणारे असते. उदाहणार्थ -
वनमाळी :- अहो पाटील ही कोण? ही पिसं लावलेली कोंबडी तर नव्हे? केळीच्या पानाला लावलाय चुना बायको बाळतीन दादुल्या तान्हया.
वनमाळी वरील संवादात सरस्वतीला पिसं लावलेली कोंबडी म्हणतो. गणपतीला गांडपती म्हणतो. त्याचे हे बोलणे ग्राम्य, चमत्कृतीपूर्ण अदभूतरम्य असे वाटते. 'हरबर्या नारायण`, 'जय जय तू मटकेबाई असे बोलत तो भौतिक संदर्भ देतो. तसेच ग्राम्य, चमत्कृतीपूर्ण अदभूतरम्य बोलणे दशावतारातील संकासूराचे असते.
संकासूर:- हे कोण बसलाय हो ?
सुत्रधार:- अरे हे ब्रम्ह देव
संकासूर:- हे बरमदेव देव यांना मी काय देव?
सुत्रधार:- दे तुझ्या कडे काय असेल ते.
संकासूर:- माझ्या कडे असो घंटो, देवळाचो ते मी दिल्यान तर देऊळ वाजतलो कसा?
ग्रामोत्सवात आजही कोकणात दशावतार सादर होतो. पण लळित मात्र काळाच्या पडदयाआड गेलेले आहे. कारण लळितातील अनेक संदर्भ हे तात्कालिक स्वरूपाचे होते. लळिताची स्वतंत्र बोली नव्हती. दशावताराची ती आहे- अर्थातच मालवणी बोली दशावताराची म्हणून ओळखली जाते. आता लळितातील वनमाळी लोप पावत असला तरी त्याचा अंश लोकनाटयात राजाच्या दरबारातील शिपायांमध्ये दिसतो. वनमाळयाची ग्राम्यता आजही ढोलकीफडाच्या तमाशातील सोंगाडयात दिसून येते. किंबहुना ग्राम्यता हेच सोंगाडयाचे मर्मस्थान आहे. वनमाळी, संकासूर सदृष्य पात्रांचे आकर्षण आजही लोकनाटयाच्या रंगभूमीवर आहे.
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin