Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
धुळवड - रंगोत्सव
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
धुळवड - रंगोत्सव
होळीचा दुसरा दिवस धूलिवंदनाचा. होळीच्या दुसर्या दिवसापासून चार दिवसांना धुळवडीचे दिवस असेही म्हणतात. आणि फाल्गुन कृष्ण पंचमीच्या दिवसाला रंगपंचमी म्हणून ओळखले जाते. या सणाच्या दिवसांत एकमेकांवर रंग उडविण्याची प्राचीन प्रथा असली तरी होळीचा दुसरा दिवस मात्र धूलिवंदनाचाच. होळीच्या दिवशी धडाडून पेटलेल्या होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो आणि दुसर्या दिवशी वंदन केले जाते, तेच धूलिवंदन. पूर्वी होळाचा अग्नी आपल्या घरी आणून त्या अग्नीवर पाणी तापवून स्नान करण्याची प्रथा होती. होळी हा जनसामान्यांचा सण आहे आणि त्यात धूलिवंदनाला म्हणजे जमिनीला-मातीला नमस्कार करण्याला विशेष महत्त्व आहे. प्राणिमात्राचा देह ज्या पंचमहाभूतांपासून बनतो त्या पंचमहाभूतांत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असा क्रम आहे. पृथ्वीपासून प्रारंभ होणारे आणि आकाशापर्यंत नाते भिडविणारे हे पंचक आहे.
होळी हा वर्षातील शेवटचा सण. त्या दिवशी भूमातेला म्हणजे पृथ्वीला वंदन करावयाचे आणि त्या दिवसानंतर पंधरवड्याने सुरु होणार्या नवसंवत्सराच्या पहिल्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी आभाळात उंच उज्ज्वल भविष्याची गुढी उभारावयाची अशी आपली विचारगर्भ परंपरा आहे.
'माती असशी मातीस मिळशी' हा सृष्टीचा नियम. आसमंतात जे जळण्यासारखे असेल, त्याग करण्यासारखे असेल त्याचा नायनाट होळीच्या दिवशी व्हावा. मनातील कुविचार, दु:शब्द यांना होळीच्या दिवशी वाट करून द्यावी आणि दुसर्या दिवशी पंचमहाभूतांतील पहिल्या तत्त्वाला म्हणजे पृथ्वीला नमस्कार करून आपापल्या कामाला लागावे. 'पृथिवी विश्वस्य धारिणी' असे नारायणोपनिषद म्हणते. तुमचे-आमचे जग हे पृथ्वीपुरतेच मर्यादित आहे. 'बहुरत्ना वसुंधरा ऐसा पदार्थ कैचा दुसरा' असा सवाल समर्थांनीही विचारला आहे.
अवधूताच्या २४ गुरूंपैकी पहिला मानाचा गुरू पृथ्वी हाच आहे. आपण या पृथ्वीच्या आधारानेच जगतो. तीच आपल्याला अन्न, पाणी पुरविते. शेतकरी तर जमिनीला काळी आईच म्हणतो. वर्षातील शेवटच्या पौर्णिमेनंतर लागलीच या भूमातेला कृतज्ञतापूर्वक वंदन करणे आणि 'विष्णुपत्नी, नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे' अशी जी प्रात:स्मरणाची प्रार्थना असते ती प्रत्यक्ष कृतीत आचरणे हाच या धूलिवंदनाचा हेतू असावा. नाही तर रंग उडविण्याला विशेष महत्त्व असलेल्या या सणाला 'धूलिवंदन' का म्हटले असते ? 'जननी जन्मभूमिच्छ स्वर्गादपि गरीयसि' असे रामायणात म्हटले आहे. धरतीमातेला वंदन करणारा हा सण म्हणूनच आपल्या मातृभूमीवरील प्रेमाचा, आपल्या देशभक्तीचा द्योतक आहे. या दिवशी जे धूलिवंदन केले जाते, त्याच संदर्भात समर्थांनी आपल्या होळीपंचकात ''धुळी टाकिती मस्तकीं'' असे म्हटले असेल काय ?
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin