Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
वाचण्याजोगे काही - 'दृष्टिभ्रम'
पृष्ठ 1 - 1 पैकी
वाचण्याजोगे काही - 'दृष्टिभ्रम'
काही पुस्तक अशी असतात की, जी वाचल्यावर आयुष्यभर लक्षात राहतात. अर्थात अशी पुस्तक कधीतरी अचानक हाती येतात आणि वाचूनही होतात, हे लक्षात देखील येत नाही. मुळात पुस्तकांमुळे अनेक वैचारिक गोंधळ जसे दूर होतात, तसे एखाद्या विषयाबद्दलची विविधांगी मते देखील लक्षात येतात.
लहानपणी बाबुराव अर्नाळकरांच्या कथा वाचतांना किंवा गुरुनाथ नाईकांना वाचतांना त्यातील काही संदर्भ काल्पनिक वाटत असत. पुढे मात्र योग्य ती मराठी विज्ञान कथा लेखकांची पुस्तक हाती लागली, तस तसे विज्ञानातील अद्भूत चमत्कार स्पष्ट होऊ लागले. वाढत्या वयाबरोबर वाचनाची अभिरुची देखील बदलत गेली आणि त्यातूनच सोप्या भाषेची जयंत नारळीकर, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, अरुण मांडे, सुभदा गोगटे, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे या विज्ञान कथा लेखकांना वाचता आलं.
परवाच डॉ. बाळ फोंडके यांचा 'दृष्टिभ्रम' हा कथा संग्रह वाचण्यात आला. 'माया दर्पण' आणि 'नजरबंद' या दोन दिर्घ कथांचे हे पुस्तक आहे. विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक समाज रचनेमध्ये निर्माण होणारी स्पर्धा, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी माणसाचे जगणे आत्मकेंद्री होत जाते. या आत्मकेंद्रीपणाला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. यातून अधिकाधिक पैसा मिळवून भौतिक साधनाची प्राप्ती करुन घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यातून निर्माण होणारे विविध प्रसंगाचे चित्रण या कथेत केले आहे.
मानवीमन, विचार आणि भावना याच्यावर अनादी कालापासून पारंपारिक मुल्यांचा पगडा पडल्याचा आढळतो. मानवी मनाला समृध्द करणारी प्रत्यक्ष न दिसणारी आदी भौतिक पातळी आणि प्रत्यक्ष जणण्याचा भौतिकस्तर यामध्ये जो फरक दिसतो, तो फरक कसा दूर करता येऊ शकतो, याचा मूलगामी विचार आवश्यक ठरतो. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग हाच केंद्रबिंदू ठेवून ही कथा केवळ वाचनीय न होता मनाला स्पर्श करणारी आहे.
दुसर्या 'माया दर्पण' या कथेत स्वप्न आणि जागृत या स्थिती, सत्य आणि आभास यांची सरमिसळ उत्तमपणे रंगविण्यात आली आहे.
'नजरबंद' मध्ये करण्यात आलेले वर्णन हे शास्त्रीय तत्वावर नमूद करण्यात आले आहे. मानवी भावविश्व आणि वैज्ञानिक सत्य यावर आधारित असलेले ज्ञान आणि समाज जीवन या त्रिसुत्रीवर 'दृष्टीभ्रम' वाचनीय झाले आहे.
विज्ञान सत्यावर पुस्तक वाचतांना जेव्हा मानवी संवेदनाची जोड जुळत जाते, तेव्हा या कथा समुहाच्या कथा होतात. मानवीमनातील जागृत आणि सुप्त विचार एकाच वेळी प्रत्ययास येण्यासाठी विज्ञान कथा, या कथा न राहता ज्ञानाधारित कथा होतात.
लहानपणी बाबुराव अर्नाळकरांच्या कथा वाचतांना किंवा गुरुनाथ नाईकांना वाचतांना त्यातील काही संदर्भ काल्पनिक वाटत असत. पुढे मात्र योग्य ती मराठी विज्ञान कथा लेखकांची पुस्तक हाती लागली, तस तसे विज्ञानातील अद्भूत चमत्कार स्पष्ट होऊ लागले. वाढत्या वयाबरोबर वाचनाची अभिरुची देखील बदलत गेली आणि त्यातूनच सोप्या भाषेची जयंत नारळीकर, निरंजन घाटे, सुबोध जावडेकर, अरुण मांडे, सुभदा गोगटे, डॉ. बाळ फोंडके, लक्ष्मण लोंढे या विज्ञान कथा लेखकांना वाचता आलं.
परवाच डॉ. बाळ फोंडके यांचा 'दृष्टिभ्रम' हा कथा संग्रह वाचण्यात आला. 'माया दर्पण' आणि 'नजरबंद' या दोन दिर्घ कथांचे हे पुस्तक आहे. विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक समाज रचनेमध्ये निर्माण होणारी स्पर्धा, या स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी माणसाचे जगणे आत्मकेंद्री होत जाते. या आत्मकेंद्रीपणाला एक प्रकारचा अहंकार निर्माण होतो. यातून अधिकाधिक पैसा मिळवून भौतिक साधनाची प्राप्ती करुन घेण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. त्यातून निर्माण होणारे विविध प्रसंगाचे चित्रण या कथेत केले आहे.
मानवीमन, विचार आणि भावना याच्यावर अनादी कालापासून पारंपारिक मुल्यांचा पगडा पडल्याचा आढळतो. मानवी मनाला समृध्द करणारी प्रत्यक्ष न दिसणारी आदी भौतिक पातळी आणि प्रत्यक्ष जणण्याचा भौतिकस्तर यामध्ये जो फरक दिसतो, तो फरक कसा दूर करता येऊ शकतो, याचा मूलगामी विचार आवश्यक ठरतो. प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग हाच केंद्रबिंदू ठेवून ही कथा केवळ वाचनीय न होता मनाला स्पर्श करणारी आहे.
दुसर्या 'माया दर्पण' या कथेत स्वप्न आणि जागृत या स्थिती, सत्य आणि आभास यांची सरमिसळ उत्तमपणे रंगविण्यात आली आहे.
'नजरबंद' मध्ये करण्यात आलेले वर्णन हे शास्त्रीय तत्वावर नमूद करण्यात आले आहे. मानवी भावविश्व आणि वैज्ञानिक सत्य यावर आधारित असलेले ज्ञान आणि समाज जीवन या त्रिसुत्रीवर 'दृष्टीभ्रम' वाचनीय झाले आहे.
विज्ञान सत्यावर पुस्तक वाचतांना जेव्हा मानवी संवेदनाची जोड जुळत जाते, तेव्हा या कथा समुहाच्या कथा होतात. मानवीमनातील जागृत आणि सुप्त विचार एकाच वेळी प्रत्ययास येण्यासाठी विज्ञान कथा, या कथा न राहता ज्ञानाधारित कथा होतात.
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin