नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


वेडेपीर -अनंत उमरीकर

Go down

वेडेपीर -अनंत उमरीकर Empty वेडेपीर -अनंत उमरीकर

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:14 pm

एकोणीसशे सत्तरचं दशक हे जगभरात अस्वस्थ दशक म्हणून गाजलं गेलं. त्या दशकात भारतातच नव्हे तर जगभरात अनेक घडामोडी घडल्या आणि अनेक चळवळी उभ्या राहिल्या. खर्‍या अर्थानं ते तरुणांचं दशक होतं. भारतासाठी तर ते अनेक अर्थानं उलथापालथीचं दशक होतं. बांगलादेशाच्या निर्मितीत भारताने याच दशकात मोलाचा वाटा उचलला. त्यापूर्वीच इंदिरा गांधींनी आपलं निर्विवाद नेतृत्व प्रस्थापित केलं होतं. पण नंतर आणलेल्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर त्यांना पराभवही पत्करावा लागला. पुढे जनता पार्टीचं सरकार कोसळल्यावर त्या परत दणदणीत बहुमतानं निवडूनही आल्या. या सार्‍या घडामोडींमध्ये तरुणांचा सहभाग हा मोठा होता.याच काळात घडलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद जोशी या सनदी अधिकार्‍यानं नोकरी सोडून केलेली 'शेतकरी संघटने'ची स्थापना !

महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यात ही संघटना स्थापन झाली आणि नाशिकपाठोपाठ या संघटनेनं बघता बघता राज्यभरात पाय रोवले. गावोगावचे तरुण आणि लढवय्ये शेतकरी कार्यकर्ते शरद जोशींच्या पाठीशी उभे राहिले आणि ग्रामीण महाराष्ट्रात मोठं आंदोलन सुरु झालं. एका अर्थानं शरद जोशी यांच्या नावाचा टिळा लावून कार्यकर्त्यांनीच वाढवलेली ही संघटना होती. त्यामुळेच शहरी व्हाईट कॉलर जनतेच्या मनातही या संघटनेबद्दल मोठ्या प्रमाणात कुतूहल निर्माण झालं.

१९८० च्या दशकाच्या प्रारंभीच याच संघटनेतील एक कार्यकर्ते विनय हर्डीकर यांनी लिहिलेलं शरद जोशी यांचं 'योध्दा शेतकरी' हे चरित्रही प्रकाशित झालं. त्यामुळे जोशी आणि त्यांचं आंदोलन या विषयीचा एक दस्तावेज उपलब्ध झालाच शिवाय त्यात या संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या कामाचीही नेंद झाली. तरीही राज्यभरात ही संघटना वाढवणारे कार्यकर्ते मात्र काहीसे दुर्लक्षितच राहिले.

मराठवाड्यात या संघटनेचं प्रदीर्घ काळापासून काम करणारे अनंत उमरीकर यांनी मात्र या कार्यकर्त्यांच्या कामाचा वेध घेण्याचं ठरवलं आणि त्यातूनच 'वेडेपीर' हे पुस्तक साकार झालं.

या पुस्तकाचं शीर्षकच अगदी बोलकं आहे. हे सारे कार्यकर्ते एका अर्थानं 'वेडेपीर'च होते. शेतकरी संघटनेत सामील होताना, त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम केला होता आणि शरद जोशी यांच्या विचाराने भारावून जाऊन त्यांनी संघटनेत झोकून दिलं होतं. त्यात विनय हर्डीकर यांच्यासारखा पुण्यातला शहरी भागातला कार्यकर्ता जसा होता, त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातला अस्सल ग्रामीण कार्यकर्ताही माधवराव खंडेराव मोरे यांच्या रुपानं उभा राहिला होता. सरोजताई काशीकर यांच्यासारखी विदर्भातली महिला होती आणि भास्करभाऊ बोरावके यांच्यासारखे बडे शेतकरीही होते. वामनराव चटप यांच्यासारखा पुढे विधानसभा गाजवणारा युवक जसा या चळवळीत दाखल झाला होता. त्याचबरोबर शैला देशपांडेसारखी युवतीही.

असे काही शरद जोशींचे अगदी मोजके पण निष्ठावान कार्यकर्ते आपल्याला या पुस्तकातून भेटतात आणि शरद जोशींना त्यांना कसं भारुन टाकलं होतं, तेही आपल्याल कळत जातं. स्वत: उमरीकर १९८१-८२ पासून शेतकरी संघटनेत काम करत आहेत. हे काम करताना त्यांना हे कार्यकर्ते भेटत गेले, हे तर उघडच आहे. यापैकी बहुतेकांची आर्थिक परिस्थिती अगदी सामान्य आहे. कोणाला तर दुपारच्या जेवणाचीही भ्रांत आहे. तरीही अशा परिस्थितीत संघटनेकडून कुठल्याही प्रकारच्या अर्थप्राप्तीची खात्री नसतानाही हे सारेजण संघटनेत का सामील होतात, हा खरं तर कुणालाही पडणारा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तरही उमरीकर यांनी या निमित्तानं देऊन टाकलं आहे. संघटनेच्या कामात गुंतल्यामुळे पोटच्या पोराच्या लग्नालाही हजर न राहणार्‍या लाहोटींसारखा एक कार्यकर्ता उमरीकर यांना याच काळात भेटला. अशा कार्यकत्यांना 'वेडेपीर' म्हणायचं नाही तर काय म्हणायचं? केसरी मराठा संस्थेनं 'न.चिं.केळकर पुरस्कार' देऊन तर उमरीकरांचा या लेखनाबद्दल गौरव केला आणि उमरीकरांच्या लेखनाचं सार्थक झालं. या 'झपाटलेल्या माणसां'ना भेटण्यासाठी आणि त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासाठी सर्वांनीच हे पुस्तक वाचायला हवं.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही