Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
हृदयवीणेची तार झंकारली
पृष्ठ 1 - 1 पैकी
हृदयवीणेची तार झंकारली
लिफाफे हाती घेतल्यानंतर व्यंकण्णा मोठ्या गोंधळात पडला. नबाबाने लिफाफे वाचण्यासाठी आपल्याकडे दिले आहेत, पण आपल्याला तर वाचता येत नाही. आता काय करावे ? घाबराघुबरा झालेला व्यंकण्णा गयावया करीत नबाबाला म्हणाला, 'मला वाचता येत नाही.' पत्रातील मजकूर जाणून घेण्यास नबाब इतका उतावीळ झाला होती की, हा व्यंकण्णा आपल्याशी खोटे बोलत आहे.
याला वाचता येत असून सुद्धा हा वाचता येत नाही म्हणून सांगतो आहे, असेच नबाबाला ठामपणे वाटले. नबाब रागाने बेभान झाला आणि म्हणाला, 'तुला वाचता येत नसेल तर मी तुला हत्तीच्या पायाखाली देईन. तुझे तलवारीने डोके उडवीन, तू मला ही पत्रे वाचून दाखविलीच पाहिजे. त्या पत्रांत कोणताही मजकूर असू देत, तुला वाचता येत असूनही मला नाही म्हणतोस, यामागे काहीतरी कारण असले पाहिजे.' नबाबाने धारण केलेले उग्र रूप पाहून व्यंकण्णाची घाबरुन बोबडी वळली. त्याला घाम फुटला. तो भीतीने थरथर कापू लागला. काय बोलायचे हेच त्याला कळेना. बरे, पळूनही जाणे सोयीचे नव्हते. नबाबाचे शरीररक्षक घोडेस्वार आजूबाजूला हेतेच. काय करावे ? जमीन पोटात घेईल तर बरे, असे व्यंकण्णाला वाटू लागले आणि इतक्यात त्याला राघवेंद्रस्वामींनी दिलेल्या आशीर्वादाचे स्मरण झाले. 'जेव्हा तुझ्यावर तीव्रतम संकट येईल तेव्हा तू मला हाक मार, मी धावून येईन आणि त्या क्षणापासून तुझे कल्याण होण्यास प्रारंभ होईल.' असे त्याला स्वामींनी सांगितले होते.
व्यंकण्णाने मनोभावे स्वामींचे स्मरण केले. दोन्ही लिफाफे फोडले. त्यातील कागदाच्या घड्या उघडून कागद हातात धरले. अक्षरओळख मुळीच नसलेला व्यंकण्णा त्या मजकुरावरुन डोळे फिरवू लागला आणि इथेच अघटित घडले. त्या क्षणापासून, लिहितावाचता न येणार्या व्यंकण्णाला त्या पत्रात काय लिहिले आहे त्याचा सहजगत्या बोध होत गेला. तो मजकूर धडाधड वाचत होता आणि नबाब अधिकाधिक आनंदित होत होता. कारण एका पत्रात नबाबाच्या ताब्यातील किल्ल्याला शत्रूने घातलेला वेढा उठविला गेला होता आणि किल्ला नबाबाच्या ताब्यात आला होत. दुसर्या पत्रात नबाबाला मुलगा झाल्याची बातमी होती. हा तरुण व्यंकण्णा वाचता येत नसल्याचे खोटेच सांगत होता, असे नबाबाला तीव्रतेने वाटले. त्याने तसे व्यंकण्णाला विचारल्यावर भाबडेपणाने व्यंकण्णा म्हणाला, 'महाराज, मला खरोखरच वाचता येत नव्हते, पण गुरुंच्या आशीर्वादामुळे मला अचानक वाचता येऊ लागले.' व्यंकण्णाच्या या उत्तराने नबाबही चकित झाला. 'तुला काय पाहिजे?' असे त्याने व्यंकण्णाला विचारले. व्यंकण्णा म्हणाला, 'मला काही नको, तुम्ही जे द्याल त्यात मला आनंद आहे.' व्यंकण्णाचे एकूण वागणे, चालणे आणि पत्र वाचून दाखविण्यातली हुशारी, स्वामींवरील त्याची श्रद्धा या सर्व गोष्टी नबाबाला कुतूहलजनक वाटल्या. त्याने व्यंकण्णाला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले आणि स्वामींच्या आशीर्वादाप्रमाणे खरोखरच त्या क्षणापासून व्यंकण्णाच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. तो शाश्वत कल्याणाच्या मार्गाने जाऊ लागला.
ही चमत्काराची कथा राघवेंद्रस्वामींच्या चरित्रात आहे. यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच की, तीव्र स्वरुपाची आंच निर्माण झाल्याशिवाय मन खर्या अर्थाने परमेश्वराकडे धाव घेत नाही. उगाचच जाता जाता आपण ओळखीच्या माणसाला हॅलो करतो, तसे देवाचे नाव घेतले तर त्यापासून काही विशेष फलप्राप्तीची अपेक्षा बाळगण्यात अर्थ नसतो. 'संकटी पावावे, निर्वाणी' हेच शेवटी खरे
याला वाचता येत असून सुद्धा हा वाचता येत नाही म्हणून सांगतो आहे, असेच नबाबाला ठामपणे वाटले. नबाब रागाने बेभान झाला आणि म्हणाला, 'तुला वाचता येत नसेल तर मी तुला हत्तीच्या पायाखाली देईन. तुझे तलवारीने डोके उडवीन, तू मला ही पत्रे वाचून दाखविलीच पाहिजे. त्या पत्रांत कोणताही मजकूर असू देत, तुला वाचता येत असूनही मला नाही म्हणतोस, यामागे काहीतरी कारण असले पाहिजे.' नबाबाने धारण केलेले उग्र रूप पाहून व्यंकण्णाची घाबरुन बोबडी वळली. त्याला घाम फुटला. तो भीतीने थरथर कापू लागला. काय बोलायचे हेच त्याला कळेना. बरे, पळूनही जाणे सोयीचे नव्हते. नबाबाचे शरीररक्षक घोडेस्वार आजूबाजूला हेतेच. काय करावे ? जमीन पोटात घेईल तर बरे, असे व्यंकण्णाला वाटू लागले आणि इतक्यात त्याला राघवेंद्रस्वामींनी दिलेल्या आशीर्वादाचे स्मरण झाले. 'जेव्हा तुझ्यावर तीव्रतम संकट येईल तेव्हा तू मला हाक मार, मी धावून येईन आणि त्या क्षणापासून तुझे कल्याण होण्यास प्रारंभ होईल.' असे त्याला स्वामींनी सांगितले होते.
व्यंकण्णाने मनोभावे स्वामींचे स्मरण केले. दोन्ही लिफाफे फोडले. त्यातील कागदाच्या घड्या उघडून कागद हातात धरले. अक्षरओळख मुळीच नसलेला व्यंकण्णा त्या मजकुरावरुन डोळे फिरवू लागला आणि इथेच अघटित घडले. त्या क्षणापासून, लिहितावाचता न येणार्या व्यंकण्णाला त्या पत्रात काय लिहिले आहे त्याचा सहजगत्या बोध होत गेला. तो मजकूर धडाधड वाचत होता आणि नबाब अधिकाधिक आनंदित होत होता. कारण एका पत्रात नबाबाच्या ताब्यातील किल्ल्याला शत्रूने घातलेला वेढा उठविला गेला होता आणि किल्ला नबाबाच्या ताब्यात आला होत. दुसर्या पत्रात नबाबाला मुलगा झाल्याची बातमी होती. हा तरुण व्यंकण्णा वाचता येत नसल्याचे खोटेच सांगत होता, असे नबाबाला तीव्रतेने वाटले. त्याने तसे व्यंकण्णाला विचारल्यावर भाबडेपणाने व्यंकण्णा म्हणाला, 'महाराज, मला खरोखरच वाचता येत नव्हते, पण गुरुंच्या आशीर्वादामुळे मला अचानक वाचता येऊ लागले.' व्यंकण्णाच्या या उत्तराने नबाबही चकित झाला. 'तुला काय पाहिजे?' असे त्याने व्यंकण्णाला विचारले. व्यंकण्णा म्हणाला, 'मला काही नको, तुम्ही जे द्याल त्यात मला आनंद आहे.' व्यंकण्णाचे एकूण वागणे, चालणे आणि पत्र वाचून दाखविण्यातली हुशारी, स्वामींवरील त्याची श्रद्धा या सर्व गोष्टी नबाबाला कुतूहलजनक वाटल्या. त्याने व्यंकण्णाला आपल्याबरोबर चलण्यास सांगितले आणि स्वामींच्या आशीर्वादाप्रमाणे खरोखरच त्या क्षणापासून व्यंकण्णाच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. तो शाश्वत कल्याणाच्या मार्गाने जाऊ लागला.
ही चमत्काराची कथा राघवेंद्रस्वामींच्या चरित्रात आहे. यात महत्त्वाचा मुद्दा एवढाच की, तीव्र स्वरुपाची आंच निर्माण झाल्याशिवाय मन खर्या अर्थाने परमेश्वराकडे धाव घेत नाही. उगाचच जाता जाता आपण ओळखीच्या माणसाला हॅलो करतो, तसे देवाचे नाव घेतले तर त्यापासून काही विशेष फलप्राप्तीची अपेक्षा बाळगण्यात अर्थ नसतो. 'संकटी पावावे, निर्वाणी' हेच शेवटी खरे
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin