नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


सर्वोत्तम - रवींद्र पिंगे

Go down

सर्वोत्तम - रवींद्र पिंगे Empty सर्वोत्तम - रवींद्र पिंगे

लिखाण  Admin Sat May 19, 2012 11:45 pm

सर्वोत्तम - रवींद्र पिंगे 6605_MahaS

ललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही.

इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.

पिग्यांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची शैली. आजकाल शैलीदार लेखन अभावानंच बघायला मिळत असताना पिंग्यांचं लेखन एक वेगळाच आनंद देऊन जातो. त्यामुळेच त्यांचं विविध विषयांवरील निवडक लेखन एकत्रितपणे हाती येणं, हा मोठाच योग आहे. 'सर्वोत्तम रवींद्र पिंगे' या शीर्षकाखाली हाती आलेलं त्यांचं लेखन हा पिंग्यांच्या चाहत्यांसाठी एक मोठाच ठेवा ठरू शकतो. पिंग्यांचं लेखन वाचताना नेहमी असं जाणवत राहतं की हा लेखक आपलं बोट धरून आपल्याला कुठे तरी फिरायला घेऊन जात आहे. हे पुस्तक हातात घेतल्यावरही तोच अनुभव येतो. कधी पिंगे आपल्याला त्यांच्या ‘उपळे’ या कोकणातल्या गावात घेऊन जातात, तर कधी मर्ढेकरांच्या रामदासी गावाला. कधी ते आपल्याला कुमार गंधर्वांचं शांत, तृप्त जग दाखवतात, तर कधी आरती प्रभू, पु. ल. देशपांडे, बा. भ. बोरकर यांच्या साहित्यविश्वात फेरफटका मारायला घेऊन जातात. पिंगे यांचं वाचन अफाट होतं आणि ते केवळ मराठीपुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच ते आपल्याला हेमिंग्वे, पर्ल बक, विन्स्टन चर्चिल यांचीही ओळख करून देतात.

पिंगे हे एक मनस्वी आणि भाऊक प्रकृतीचे लेखक होते. त्यामुळेच ‘माझे बाबा आणि मी’, ‘घडले तेच पसंत’ अशा काही लेखांमधून ते स्वत:विषयी बोलत राहतात. हे सारंच लेखन कमालीचं आनंददायी आहे. अनेकदा शैलीच्या मोहात पडून ते शब्दबंबाळ झालं असलं, तरीही!

या पुस्तकाला ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी पिंगे यांचं अगदी अचूक वर्णन केलं आहे. पाडगावकर म्हणतात : ‘वयाची ऐंशी वर्षं पूर्ण झाली, तरी पिंगे यांचा प्रत्यक्ष आणि लेखनाचा असे दोन्ही प्रवास उमेदीच्या वयातल्या उत्साहानेच सुरू आहेत. ते तसेच सुरू राहणार आहेत कारण तो त्यांच्या अंतरीचा झरा आहे आणि अंतरीचा झरा देवाचे देणे असते. कधीही न आटणारा.’
पिंगे यांच्या लेखनामुळे तो झरा, आजही त्यांच्या निधनानंतर न आटता वाहत आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही