नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


तुकोबांच्या स्वप्नांच्या कथा

Go down

तुकोबांच्या स्वप्नांच्या कथा Empty तुकोबांच्या स्वप्नांच्या कथा

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:10 am

तुकोबांच्या स्वप्नांच्या कथा 6462_Mahasan_L

श्री तुकाराम महाराजांना गुरुमंत्र दिला तो त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांनी. हा गुरुमंत्र तुकोबांना बाबाजी चैतन्यांनी स्वप्नात येऊन दिला. तुकोबांनीच लिहून ठेवले आहे, राघव चैतन्य, केशव चैतन्य सांगितली खूण मालिकेची बाबाजी चैतन्य, सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी आपली सांस्कृतिक परंपरा तुकोबांना या स्वप्नात दिलेल्या गुरुमंत्राबद्दल नितात आदर बाळगते. आजही तुकोबांना दिलेल्या राम कृष्ण हरी या मंत्राचा आपण मुक्तकंठाने जयजयकार करताना जय जय रामकृष्ण हरी, असे म्हणतो.

तुकोबांच्या आयुष्यात घडलेली दुसरी विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी केलेले कवित्व ही होय. तुकोबा हे प्रारंभी कवी नव्हते. त्यांना कवी म्हणून मान्यता मिळवून देणारा प्रसंगही स्वप्नाशी संबंधित आहे. तुकोबांना स्वप्नात येऊन नामदेव महाराजांनी आदेश दिला आणि त्यांना म्हणजे तुकोबांना कवित्व करण्याबद्दल सांगितले. त्या वेळेला नामदेवांबरोबरच स्वत: पांडुरंगसुद्धा होते. कोणतेही निमित्त व सबब न सांगता कवित्व करा, असा आदेश प्रत्यक्ष पांडुरंगाच्या साक्षीने नामदेवांनी दिला, असे तुकोबा सांगतात. नामदेवें केलें, स्वप्नामाजी जागें सवें पांडुरंगें येऊनियां सांगितलें काम, करावें कवित्व वाऊगें निमित्य बोलों नको माप टाकी सळ, धरिली विठ्ठलें थापटोनी केलें सावधान प्रमाणाची संख्या, सांगे शत कोटी उरले ते शेवटीं लावी तुका आणि आश्यर्च असे की, तुकाराम महाराजांचा काळ आणि नामदेव महाराजांचा काळ यात तीन-चारशे वर्षांचे अंतर असूनसुद्धा नामदेव आणि तुकाराम या दोघांच्याही अभंगांची जातकुळी खूपच मिळतीजुळती आहे. दोघांचीही भाषाशैली, रचनेची धाटणी, शब्दयोजनेचे कौशल्य आणि त्याचे सोपेपण या सगळ्या गोष्टी इतक्या जवळजवळच्या आहेत की, 'ज्ञानाचा एका आणि नाम्याचा तुका', असा वाक्प्रचारच वारकरी संप्रदायात रूढ झाला.

तुकोबांना भक्तिसंप्रदायाचा मार्ग दाखवणारे आणि नाममहिमा सांगणारे बाबाजी चैतन्य त्यांना भेटतात आणि तुकोबांना कवित्वाच्या राजमार्गावर आणून सोडणारे नामदेव महाराजही त्यांना स्वप्नातच येऊन कवित्व करण्याचा उपदेश देतात. या दोन्ही गोष्टीत तुकोबांच्या जीवनात स्वप्नातल्या दृष्टांताला मिळालेले महत्त्व आपणाला जाणवते. आता तिसरी गोष्ट त्या मानाने अलिकडच्या काळातली आहे. प्रभात फिल्म कंपनीने संत तुकाराम हा नितांत सुंदर, रमणीय चित्रपट १९३६ मध्ये निर्माण केला. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कोणी करावी याबद्दलचा विचार बराच काळ चालू होता. कारण ही भूमिका करणारा नट तुकोबांसारख्या संतश्रेष्ठाच्या रूपाशी जुळणारा हवा होता. तुकोबांसारख्याच तो सत्वगुणांचा पुतळा आहे, असे वाटायला हवे होते आणि त्याबरोबरच त्या काळात पार्श्वगायनाची सोय नसल्यामुळे त्याला चांगले गाता येणे आवश्यक होते. हे गुण ज्यांच्या ठिकाणी एकवटले होते असे विष्णुपंत पागनीस मुंबईत होते. प्रभात फिल्म कंपनीचे एक भागीदार, कलादिग्दर्शक आणि तंत्रज्ञ विष्णुपंत दामले हे त्या काळात मुंबईत आले होते. दामले एकदा गिरगावातून जात असताना त्यांना पागनीसांनी ओळखले आणि हाक मारून थांबवून म्हणाले, 'आज पहाटे मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात मी एका सजविलेल्या पांढर्‍या शुभ्र घोड्यावर स्वार झालो आहे आणि त्याचा लगाम तुमच्या हातात आहे, असे मला दिसले आणि नेमकी आजच तुमची भेट झाली.' एका विष्णुपंताना म्हणजे पागनीसांना दुसर्‍या विष्णुपंतांनी म्हणजे दामल्यांनी उत्तर दिले. 'पांडुरंगाच्या मनात असले तर तसेही होईल.' पागनीसांना पडलेले स्वप्न शुभसूचक होते. येणार्‍या उज्ज्वल आयुष्याची ती पूर्वसूचना होती. पुढे पागनीसांनी चित्रपटात तुकारामाची भूमिका समरसून केली. इतकी समरसून केली की, तुकोबांच्या वेशातील पागनीसांचे फोटो घरोघरी देवघरात जाऊन बसले. आजही तुकाराम म्हटल्यावर तुकोबांच्या वेशातले विष्णुपंत पागनीसच आठवतात, एवढा त्या भूमिकेचा प्रभाव आहे.
अशा या स्वप्नांच्या स्वप्नसुंदर कथा.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही