Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
संत नरहरी सोनार
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
संत नरहरी सोनार
यादवकालीन संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. व्यवसाय करणारेही संत आहेत. गोरोबा (गोरा कुंभार), सावतोबा (सावता माळी) यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. विविध वाड्.मयेतिहासात त्यांचा 'नरहरी सोनार' असा उल्लेख केला जातो.
वारकरी संप्रदायाच्या संत नामावलीतील बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. ते विविध व्यवसाय करीत असल्यानं त्यांच्या लेखनात विविध व्यवसायांतील शब्द आले व त्यामुळंही मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली. (तिचा शब्दकोशही समृद्ध व संपन्न झाला.)
यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक 'वैष्णव' या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी 'हरिहरैक्यां'ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा.
ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला. ज्ञानदेवांचे वडील बंधू निवृत्तिनाथ हे नाथसंप्रदायिक होते व तेच ज्ञानदेवांचे गुरुही होते. त्यामुळं ज्ञानदेव गुरुपरंपरेनं नाथसंप्रदायिक होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलोपासक असल्यानं वैष्णव होते. म्हणजे ज्ञानदेव घराण्याच्या परंपरेनं वैष्णव होते, वारकरी होते.
ज्या 'कटिसूत्र' (कडदोरा) प्रसंगानं नरहरी महाराजांना शिव आणि विठ्ठल यांच्या मधील अभेद जाणवला, त्या 'कटिसूत्र' प्रसंगाचं / अख्यायिकेचं आकलन आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं नरहरी महाराजांनी ज्ञानदेवांची हरिहरैक्याची भूमिका का स्वीकारली, याचा उलगडा होईल. ही घटना/ आख्यायिका अशी आहे - देवगिरीच्या एका सावकारानं विठ्ठलमूर्तीला 'कटिसूत्र' (कडदोरा) अर्पण करायचं ठरविलं व ते काम त्यानं नरहरी महाराजांकडे सोपविलं. महाराज शैव असल्यानं ते विठ्ठल मंदिरात जात नव्हते. विठ्ठल मूर्ति दर्शन त्यांना निषिद्ध वाटत होतं. त्यामुळं त्यांनी त्या सावकारालाच मूर्तीच्या 'कटिसूत्रा'चं माप आणायला सांगितल. त्यानुसार नरहरी महाराजांना त्या सावकारानं माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी त्यानुसार 'कटिसूत्र' तयार केलं. पण ते चार बोटं सैल झालं. मग, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून स्वत: नरहरी महाराजचं डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्तीच्या 'कटिसूत्रा'चं माप घेऊ लागले. तेव्हा विठ्ठलमूर्ती ही शिवमूर्ती आहे, असं त्यांना जाणवलं. डोळ्यांवरील पट्टी काढल्यावर पुन्हा ती विठ्ठलमूर्तीच असल्याची प्रचिती त्यांना आली. त्यामुळं 'हरी' आणि 'हर' हे एकच आहेत, हे चिरंतन सत्य त्यांना जाणवलं. त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात.
शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा। ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित।
धन्य ते संसारी, नर आणि नारी। वाचे 'हरी हरी' उच्चारीत।।
नाही पैं भेद, अवघा मनीं अभेद। द्वेषाद्वेष- संबंध उरी नुरे।
सोनार नरहरी न देखे द्वैत। अवघा मूर्तिमंत एकरूप।।
'नरहरी' नावाचे एकूण नऊ संतकवी वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले असले तरी नरहरी सोनार हे यादवकालीन ज्ञानदेवांच्या व नामदेवांच्या प्रभावळीतील प्रमुख संत कवी असल्याचं संशोधनान्ती मान्य झालं आहे. भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी महाराजांच्या अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं. असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्ट्य नि वेगळंपण सिद्ध केलं आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. आपला व्यवसाय व संसार चांगल्या प्रकारे करीत असताना नरहरी महाराजांनी आत्मचिन्तन केलं नि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना कशाची जाणीव झाली ?
'जग हे अवघें सारें ब्रह्मरूप। सर्वांभूती एक पांडुरंग।
अणुरेणुपर्यंत ब्रह्म भरियेलें। सर्वांघटीं राहिलें अखंडित।।
विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें। कवतुक दाविलें मायाजाळ
भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ। परब्रह्मीं खेळे अखंडित।।
अखंडित वस्तु हृदयी बिंबली। गुरुरुपे पाही नरहरी।।
ही जाणीव म्हणजेच ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी'त प्रतिपादिलेला 'चिद्विलासंवाद' होय. या परब्रह्माची प्राप्ती आपल्याला कशी होईल? यासाठी साधना करायला हवी . ही साधना करताना अनुताप, संसाराविषयी विरक्ती नि परमात्म्यास शरणागती या विविध अवस्थांतून ते जातात आणि मग-
'देह-विदेह याचा मानुनी कंटाळा।
बाणलीसे कळा परिपूर्ण।।
म्हणे नरहरी सोनार चरणीं दृढ भाव।
अवघा भासे देव जळी -स्थळीं।।
अशी साक्षात्काराची अवस्था त्यांना प्राप्त होते आणि मग त्यांचा प्रपंच नि व्यवसाय परमार्थरूप होतो. 'देवा, मी तुझा सोनार' किंवा 'देह बागेसरी जाण' हे त्यांचे लोकप्रिय अभंग याच स्थितीचा प्रत्यय देतात. यापैकी दुसरा अभंग धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरातील जुन्या बाडातून (बाडांक क्रं १७३३) इथं त्या संस्थेच्या सौजन्यानं छायाप्रतीच्या रुपात उद्धृत करीत आहे.
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin