नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


विजयादशमी : दसरा

Go down

विजयादशमी : दसरा      Empty विजयादशमी : दसरा

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:39 am

विजयादशमी : दसरा      6022_dusehra

विजयादशमीच्या दिवशी देवीने आपले विजया हे नाव सार्थ केले. ती निरंतर विजय पावली आहे. आणि सतत विजय पावणारी आहे. विजयादशमी विजय पावली विजया झाली ही वाणी। सीमोल्लंघन करुनि गांठिली परा परांबा परात्मनी। प्रसन्नवदना प्रसन्न झाली कृपाकटाक्षी वरदानी। कृपाभिलाषी शंकर विनवित कृपाप्रसादा हे जननी ।। अनेक प्रकारच्या सीमा-मर्यादा आपल्या कर्तृत्वाला, व्यक्तित्वाला पडलेल्या असतात. सीमोल्लंघन करावयाचे म्हणजे ज्या गोष्टींचा अडसर आपल्याला निरंतर वाटत असतो त्यांचा अंदाज घ्यावयाचा आणि अनिष्ट बंधने दूर करावयाची. आपण नवरात्रीत देवीची जी पूजा बांधली ती बाह्य उपचारांनी न बांधता मानसपूजेने बांधली. शब्दांनी दाखवलेल्या वाटेवरून आपण देवीच्या लौकिक रुपापासून तिच्या अलौकिकतेचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. उन्मनी अवस्था किंवा सहजावस्था सर्वांनाच प्राप्त होईल अशातला भाग नाही, पण देवीच्या सर्व तर्‍हेच्या स्वरूपांचे मनन केले, चिंतन केले की मनाला एक आगळीवेगळी शांती वाटते, एक आधार वाटतो एवढे तरी निश्चित ना? कारण आपण परंपरेने या सगळ्या गोष्टी मानत आलो आहेत. तथाकथित वेगळ्या विचारांचे लोक देवीकडे भक्तिभावनेने पाहू शकत नसतीलही, पण जगाची निर्मीती आणि प्रगती नैसर्गिक प्रक्रियेतून होते, असे जरी क्षणभर मानले तरी निसर्गाला निसर्गदेवता किंवा सृष्टिदेवता मानून तिचा गौरव करून तिने आपल्यासाठी बहुविध प्रकारची अनुकूलता निर्माण केलेली आहे, आपल्याला जे सुखसंपदेचे अपार वैभव बहाल केले आहे, त्याबद्दलची कृतज्ञता बाळगणे हे संपूर्ण मानवजातीला भूषणास्पद नाही काय? कृतज्ञता हा मानवी मनाचा मोठा अलंकार आहे. कृतघ्नाला सद्गती नाही. कृतघ्नतेचे परिमार्जन करू शकेल असे कोणतेही प्रायश्चित्त नाही, हा रामायणात सांगितलेला विचार त्रिकालाबाधित आहे. आपण कृतज्ञतेचे महत्त्व पूर्णपणे जाणणार्‍या सांस्कृतिक परंपरेचे पाईक आहोत. म्हणूनच मातृदेवतेपासून सृष्टिदेवतेपर्यंत सर्वत्र विविध रूपांनी विलसणार्‍या जगन्मातेच्या चरणी लीन होणे, आपल्याला आनंददायी, समाधानाचे आणि कृतज्ञतेचे वाटते.

विजयादशमीच्या दिवशी देवीच्या कृपाशीर्वादासाठी आपण विनम्रभावे प्रार्थना करुया. आपल्या पराक्रमाला, आपल्या पौरुषाला अटकाव करणार्‍या ज्या मर्यादा आणि सीमा आहेत त्या पार करण्याचे सामर्थ्य आपल्याला लाभो, अशी विनंती आपण देवीच्या चरणी करुया. मनुष्यदेवता म्हणून काही मर्यादा असतातच. मानसपूजा करण्याचा प्रयत्न हा देहापेक्षा मनाशीच अधिक निगडीत आहे. भक्तिभावाच्या चौरंगावर देवीला सुप्रस्थापित करुन आपण तिची जी आराधना केली ती आराधना आपले मन सुखी, समाधानी आणि प्रसन्न राहावे एवढीच माफक अपेक्षा ठेवून केली. मन प्रसन्न असले की सर्व जग आनंदी भासते. मन करा रे प्रसन्न । सर्व सिध्दींचे कारण ।। असे जे तुकोबा म्हणतात ते याच संदर्भात. निरंतर आनंदी आणि प्रसन्न असलेली देवी आपल्या सर्व भक्तांवर सुप्रसन्न होवो, त्यांच्या मनीच्या इच्छाआकांक्षा तिने पूर्ण कराव्यात, अशी विनंती कवीने या श्लोकातील शेवटच्या ओळीत व्यक्त केली आहे.आजचा दसर्‍याचा दिवस सर्वांनाच सुखासमाधानाचा जावो आणि येणारी दिवाळी उत्कर्षाप्रत नेणारी ठरो, ही श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही