नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


संत एकनाथ

Go down

संत एकनाथ           Empty संत एकनाथ

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:47 am

संत एकनाथ           5779_eknath%20mandirL
संत एकनाथ हे वारकरी संप्रदायाच्या परंपरेतील एक महत्वाचे संत. ज्ञानाचा एका आणि नाम याचा तुका अशी एक उक्ती वारकरी संप्रदायात प्रचलित आहे. ज्ञानदेवांच्या लेखनामध्ये व विचारसरणीमध्ये नि एकनाथांच्या लेखनामध्ये तसंच त्या उभयतांनी प्रतिपादिलेल्या तत्त्वज्ञानामध्ये बर्‍याच अंशी साम्य आढळतं, असा 'ज्ञानाचा एका'चा अर्थ आहे असं मला वाटतं. ज्ञानदेवांचा आदर्श आपल्या समोर ठेवून नाथांनीही आपल्या लेखनाची व कार्याची रुपरेषा ठरविली असावी व त्याचा अधिक विस्तार केला असावा, असं सतत जाणवत राहतं. संत बहिणाबाईंनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेविषयी जो अभंग लिहिला आहे, त्यात 'जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत' असा नाथांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. नाथांनी भागवत ग्रंथ लिहून वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानास आणखी एक भक्कम आधार दिला. त्याचप्रमाणं आपल्या कीर्तनांच्या माध्यमातून या संप्रदायाचा व्यापक प्रमाणात प्रसार केला व त्याचा विकास केला.

नाथांचं लेखन बहुवेडी आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीत गीतेवर भाष्य केलं तर नाथांनी भागवताच्या एकादशस्कंधावर आपल्या भागवत ग्रंथात विस्तृत भाष्य लिहिलं. त्यापूर्वी नाथांनी भागवताच्या चार श्लोकांवर चतु:श्लोकी भागवत ही टीका लिहिली ती जणू त्यांच्या भावी भागवताच्या एकादश स्कंधावरील विस्तृत टीकेची पूर्वसूचनाच असावी.

भागवताच्या प्रारंभीच नाथांनी आपण हे भाष्य मराठीतच का लिहीत आहोत, याविषयी विवेचन केलं आहे. जरी भागवत प्राकृत झाले तरी नाही 'चुकले निजज्ञाना' या त्यांच्या आश्वासनात व आत्मविश्वासात ज्ञानदेवांच्या 'माझा मराठाचि बोल कौतुके, अमृतातेंही पैजा जिंके' या प्रतिज्ञेचं प्रतिबिम्ब उमटलं आहे. नाथही ज्ञानदेवांप्रमाणंचे संस्कृत तज्ज्ञ होते पण त्यांनी संस्कृत भाषेत लेखन न करता महाराष्ट्राच्या लोकभाषेत अध्यात्मविचाराचा प्रसार व्हावा, यासाठी मराठीतच लेखन केलं. संस्कृत भाषेला गीर्वाणवाणी म्हणजे देवांची भाषा मानतात, ती देवांनी निर्माण केली असेल तर प्राकृत -इथं मराठी भाषा असा संदर्भ आहे - चोरांनी केली आहे का. या त्यांच्या प्रश्नातच स्व:भाषेचा अभिमान अस्मिता व जनहिताचा कळवळा दिसतो.

ज्ञानेश्वरीचं अधिष्ठान गीतात आहे, तर नाथभागवताचं अधिष्ठान भागवताचा एकादशस्कंध आहे. असं असूनही ज्ञानदेवांनी ज्या अद्वैतमताचं विवरण ज्ञानेश्वरींत केलं त्याच अद्वैतमताचं विवरण नाथांनी आपल्या भागवतात केला आहे. भागवत हा शब्दच भगवद या शब्दापासून सिद्ध झाला असून भक्त हा अर्थ त्यातून सूचित होतो. स्वत: नाथांनी प्रपंच करुन परमार्थ साधला व जनसामान्यांसमोर प्रपंच-परमार्थ -समन्वयाचा आदर्श ठेवला. भक्तीचे नवविध प्रकार असले तरी त्यांच नामस्मरण ही सर्वात सोपी व जनसामान्यांच्या आटोक्यातील उपासना पद्धती असल्यानं समाजानं तिचा स्वीकार करुन आपला उद्धार करुन घ्यावा, ही नाथ भागवतांच्या निर्मितीमागील प्रमुख प्रेरणा आहे. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीतील सोळाव्या अध्यायात दैवी व आसुरी संपत्तीविषयी जे विवरण केलं आहे, तशाच आशयाचं विवरण नाथांनी भागवतात ज्ञानी व अज्ञानी पुरुषाच्या संदर्भात केलं आहे. या भागवतातील नीतिमीमांसा सद्गुणसंवर्धन व दुर्गुणत्याग या द्विसूत्रीवर आधारलेली आहे.

भावार्थ रामायण या महाकाव्यात नाथांनी मर्यादापुरुषोत्तम रामाचा जीवनादर्श समाजासमोर ठेवला आहे. रुक्मिणीस्वयंवर हे त्यांचं आरन्यानकाव्य, त्यात नाथांनी काव्य आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घातली आहे. कृष्ण म्हणजे परमात्मा आणि रुक्मिणी म्हणजे जीवात्मा अशा प्रकारचं रुपक यात चित्रित केलं आहे.

नाथांची स्फुट रचनाही लक्षणीय आहे, त्यांनी भारुडं ही उपदेशपर रुपकं आहेत. यापैकी अर्जदास्त, विंचू, भूत आणि पाखरु त्याचप्रमाणं जोहार या सारखी भारुड विशेष लोकप्रिय आहेत. हिंदू-तुर्क संवादा सारख्या भारुडात हिंदू आणि इस्लाम या दोन धर्मातील समान तत्वांच्या आधारे दोन्ही धर्मियांमध्ये एकात्मता प्रस्थापित करण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. नाथांच्या भारुडांत काव्य, नाट्य व अध्यात्म यांचा सुरेख संगम झाला आहे. लोकसंगीत, लोकगीत,लोककला, लोकनाट्य इ. लोकसंस्कृतीच्या विविध माध्यमांतून ही भारुडं प्रकटली आहेत. मराठवाडयात भारुडं म्हणणारी जवळपास ३२ घराणी आहेत. नाथांच्या भारुडांत विठू, वासुदेव, दरवेश, फकीर, जंगम, नानकशहा, भटीण, कोल्हाटीण अशा समाजाच्या विविध थरांतील व विविध धर्मातील व्यक्ती आहेत.

गवळणी हे त्यांचं लोकप्रिय मधुराभक्तिपर लेखन आहे. नाथांच्या अभंगगाथेतं मराठी अभंग-वाड्मयात फार मोलाची भर घातली आहे.

संत एकनाथ हे लोकनाथ आहेत, ते लोकसाहित्यकारही आहेत, अशा शब्दांत संतसाहित्य समीक्षकांनी नाथांचा गौरव केला आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही