Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
संत रोहिदास
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
संत रोहिदास
संत रोहिदास हे उत्तर भारतातील महान संत असले तरी महाराष्ट्रातील बहुतेक 'संत नामावळ्यां'त त्यांचा निर्देश आढळतोच. संत कबीरांचंही तसंच आहे. आपले महाराष्ट्रातले बहुतेकं संत आपल्या लेखनातही त्यांचा उल्लेख अत्यंत आदरपूर्वक करतात. वारकरी संप्रदायात पुढील उक्ती प्रसिद्ध आहे, तिच्यात संत कबीरांचा उल्लेख असा केला असून मराठी संतकवी शेख महमद हे हिन्दी संतकवी कबीर यांच्याप्रमाणं असल्याचं म्हटलं आहे. ही उक्ती अशी 'ज्ञानाचा एका नामयाचा तुका!' आणि कबिराचा शेका (शेखमहमद), तसंच संत रोहीदास यांचंही आहे. ते चर्मकार समाजाचे होते व त्यांचं लेखन हिंदी भाषेत आहे. महाराष्ट्रातही ते सर्वांनाचा आदरणीय आहेत. यापुढंही जाऊन असं देखील म्हणता येईल की, महाराष्ट्रातील दलित साहित्याच्या निर्मितीला त्यांचीही प्रेरणा, काही प्रमाणात का होईना, निश्चितपणे लाभली असावी. दलित समाजातील मराठी संतकवीं प्रमाणंच संत रोहिदासांनी देखील दलित समाजाची व्यथा व्यक्त केली असून भक्ती करण्याचा या समाजाचा अधिकार कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, अशा आशयाचे विचार आपल्या हिंदी भाषेतील पदांत व्यक्त केले आहेत.
तथाकथित प्रस्थापित वर्गानं स्वत:ला उच्चवर्णीय व समाजातील काही अन्य वर्गांना कनिष्ठ वर्णीय घोषित करुन त्यांना हीनत्व 'प्रदान' केलं व त्यांना साधनेचा, भक्तीचा, मुक्तीचा अधिकार नाकारुन फार मोठा अन्याय केला. त्याचे पडसाद भारतात सर्वत्र उमटले.
संत चोखामेळा यांच्या नावातील 'चोखा' हा शब्दच हा सामाजिक व धार्मिक विषमतेविरुद्धचा ज्वलंत उद्गार होय असं मला नेहमी वाटलं आहे. जेव्हा संत रोहिदास (रविदास) म्हणतात -
'जाती ओछी, पाती ओछी
राजाराम की सेवा न कीन्ही
कहि रविदास चमारा
(अधोरेखन माझं)
यातील 'मी देवाची सेवा केली नाही' याचा अर्थ 'ती मला करु दिली नाही कारण मी चर्मकार समाजातला होतो (चमार), आणि म्हणूनच 'ओझा' (म्हणजे वाईट, हीन) होतो. या शब्दांत ती सारी वेदना, तो सारा असंतोष नित्यात दडलेला सुप्त विद्रोह जाणवत नाही का ? जसं असूनही रोहिदासांनी भक्ती केलीच, तिचं किती स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या या उद्गारांत उमटलं आहे, पाहा -
जिव्हा भजे हरिनाम नित
हत्थ करहि नित काम
रविदास भए निहचित हम
मम चिंत करेंगे राम
(हत्थ-हात, निहचित - निश्चित, चिंत - चिंता)
आपण प्रपंच करुनही परमार्थ साधना करु शकतो, हा मराठी संतांनी प्रतिपादिलेला विचार व रोहिदासांचा वरील विचार यात किती साम्य आहे !
'सर्वांभूती भगवद्भाव' या मराठी संतांच्या विचारांशी संत रोहिदास यांचे विचार तंतोतंत जुळतात. ते चर्मकार असल्यानं त्यांचा चामड्याशी (व्यवसायमुळंही) संबंध येणारच पण 'विश्वात सर्वत्र चामडं नाही का ?' असा त्यांचा प्रश्न सर्वांनाचा निरुत्तर करणारा आहे. गाय, वासरू, उंट, त्यावर वाद्य, हत्ती व त्यावर आरूढ होणारा राजा, तुम्ही-आम्ही सारेच नाही का? यातूनच रोहिदास महाराजांनी सर्व प्राणिमात्रांतील व अन्य वस्तुंतील अद्वैत स्पष्ट केलेलं नाही का? त्याचं मूळ पद असं आहे -
ज्याहां देखो वहाँ चाम ही चाम
चाम के मंदिर बोलत राम
चाम की गऊ, चाम का बछडा चाम ही धुने, चाम ही ठाडा,
चाम का हाथी, चाम का राजा
चाम के ऊंटपर चाम का बाजा
कहत रोहिदास, सुनो कबीरभाई
चामविना देह किनकी बनाई ?
हा शेवटचा रोहिदास महाराजांनी विचारलेला प्रश्न किती बिनतोड आहे !
परमेश्वर सर्वांचा उद्धार करतो कारण 'पतित-पावन' हेच त्याचं ब्रीद आहे. परमात्म्याचाच अंश सर्व जीवात्म्यांत व चराचरात आहे, ही भावनाचं हा विचार जसे सर्व मराठी संत व्यक्त करतात, तशी संत रोहिदासांनीही व्यक्त केली आहे. सर्व संत समान विचार व्यक्त करतात, याचं हे किती सुंदर उदाहरण आहे. ते परमेश्वरालाच सांगतात -
देवा, हमन पास करंत अनंता
'पतित पावन तेरा बिरद क्यो अहंता
तोहि-मोही, मोही-तोही अंतर ऐसा
कनक कटक जल तरंग जैसा
मैं केई नर तुहिं अंतरजामी
ठाकुर थै जन जानिये, जन थै स्वामी
तुम सबन में सब तुम माही
रैदास दास असमझि सी कहौं कहाँ ही
आपल्या संतांप्रमाणंच सत्संगाचं नि संतसंगाचं
महत्व नि माहात्म्य संत रोहिदासांनी त्यांच्या
संत तुझी तन -संगति प्रान
सत्गुरु ज्ञान संत देवादेव
या पदात फार चांगल्या प्रकारे वर्णिलं आहे.
तथाकथित प्रस्थापित वर्गानं स्वत:ला उच्चवर्णीय व समाजातील काही अन्य वर्गांना कनिष्ठ वर्णीय घोषित करुन त्यांना हीनत्व 'प्रदान' केलं व त्यांना साधनेचा, भक्तीचा, मुक्तीचा अधिकार नाकारुन फार मोठा अन्याय केला. त्याचे पडसाद भारतात सर्वत्र उमटले.
संत चोखामेळा यांच्या नावातील 'चोखा' हा शब्दच हा सामाजिक व धार्मिक विषमतेविरुद्धचा ज्वलंत उद्गार होय असं मला नेहमी वाटलं आहे. जेव्हा संत रोहिदास (रविदास) म्हणतात -
'जाती ओछी, पाती ओछी
राजाराम की सेवा न कीन्ही
कहि रविदास चमारा
(अधोरेखन माझं)
यातील 'मी देवाची सेवा केली नाही' याचा अर्थ 'ती मला करु दिली नाही कारण मी चर्मकार समाजातला होतो (चमार), आणि म्हणूनच 'ओझा' (म्हणजे वाईट, हीन) होतो. या शब्दांत ती सारी वेदना, तो सारा असंतोष नित्यात दडलेला सुप्त विद्रोह जाणवत नाही का ? जसं असूनही रोहिदासांनी भक्ती केलीच, तिचं किती स्वच्छ प्रतिबिंब त्यांच्या या उद्गारांत उमटलं आहे, पाहा -
जिव्हा भजे हरिनाम नित
हत्थ करहि नित काम
रविदास भए निहचित हम
मम चिंत करेंगे राम
(हत्थ-हात, निहचित - निश्चित, चिंत - चिंता)
आपण प्रपंच करुनही परमार्थ साधना करु शकतो, हा मराठी संतांनी प्रतिपादिलेला विचार व रोहिदासांचा वरील विचार यात किती साम्य आहे !
'सर्वांभूती भगवद्भाव' या मराठी संतांच्या विचारांशी संत रोहिदास यांचे विचार तंतोतंत जुळतात. ते चर्मकार असल्यानं त्यांचा चामड्याशी (व्यवसायमुळंही) संबंध येणारच पण 'विश्वात सर्वत्र चामडं नाही का ?' असा त्यांचा प्रश्न सर्वांनाचा निरुत्तर करणारा आहे. गाय, वासरू, उंट, त्यावर वाद्य, हत्ती व त्यावर आरूढ होणारा राजा, तुम्ही-आम्ही सारेच नाही का? यातूनच रोहिदास महाराजांनी सर्व प्राणिमात्रांतील व अन्य वस्तुंतील अद्वैत स्पष्ट केलेलं नाही का? त्याचं मूळ पद असं आहे -
ज्याहां देखो वहाँ चाम ही चाम
चाम के मंदिर बोलत राम
चाम की गऊ, चाम का बछडा चाम ही धुने, चाम ही ठाडा,
चाम का हाथी, चाम का राजा
चाम के ऊंटपर चाम का बाजा
कहत रोहिदास, सुनो कबीरभाई
चामविना देह किनकी बनाई ?
हा शेवटचा रोहिदास महाराजांनी विचारलेला प्रश्न किती बिनतोड आहे !
परमेश्वर सर्वांचा उद्धार करतो कारण 'पतित-पावन' हेच त्याचं ब्रीद आहे. परमात्म्याचाच अंश सर्व जीवात्म्यांत व चराचरात आहे, ही भावनाचं हा विचार जसे सर्व मराठी संत व्यक्त करतात, तशी संत रोहिदासांनीही व्यक्त केली आहे. सर्व संत समान विचार व्यक्त करतात, याचं हे किती सुंदर उदाहरण आहे. ते परमेश्वरालाच सांगतात -
देवा, हमन पास करंत अनंता
'पतित पावन तेरा बिरद क्यो अहंता
तोहि-मोही, मोही-तोही अंतर ऐसा
कनक कटक जल तरंग जैसा
मैं केई नर तुहिं अंतरजामी
ठाकुर थै जन जानिये, जन थै स्वामी
तुम सबन में सब तुम माही
रैदास दास असमझि सी कहौं कहाँ ही
आपल्या संतांप्रमाणंच सत्संगाचं नि संतसंगाचं
महत्व नि माहात्म्य संत रोहिदासांनी त्यांच्या
संत तुझी तन -संगति प्रान
सत्गुरु ज्ञान संत देवादेव
या पदात फार चांगल्या प्रकारे वर्णिलं आहे.
:: विविधा :: सण, संत आणि संस्कॄती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin