Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
श्यामची आई - साने गुरुजी
पृष्ठ 1 - 1 पैकी
श्यामची आई - साने गुरुजी
साने गुरुजींचे 'श्यामची आई` हे पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले, ते १९३५ साली. याचा अर्थ पुढच्या वर्षी हे पुस्तक प्रकाशित होऊन ७५ वर्षे होतील. याचाच अर्थ सन २०१० हे 'श्यामची आई` या पुस्तकाचे 'अमृत महोत्सवी` वर्ष आहे. सलग पंच्च्याहत्तर वर्षे एखादे पुस्तक लोकांच्या मनात रुतून बसणे, एवढेच नव्हे तर त्याच्या लाखाहून अधिक प्रती विकल्या गेल्यावरही, त्याची मागणी कायम राहणे, असे भाग्य एखाद्या पुस्तकाला क्वचितच लाभते.
असे काय आहे या पुस्तकात?
खरे तर हे पुस्तक आज मराठी माणसांच्या घराघरांत आहे. पुस्तक नसले, तरी त्याची कहाणी ही जवळपास प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. ज्या कोणी ते वाचलेले नसेल, त्यांनी आचार्य अत्रे यांनी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडून काढलेला 'श्यामची आई` हा चित्रपट तरी पाहिलेला असतो आणि त्यातील श्यामच्या आईची वनमालाबाईंनी उभी केलेली भूमिका आणि माधव वझे यांनी जिवंत केलेला श्याम हा त्यांच्या डोळ्यासमोर कायम उभा राहिलेला असतो.
'श्यामची आई` हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्याच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले. 'श्यामची आई` ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्या अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ`च होते.
स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे,` असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या सार्याच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र` असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले.
दररोज रात्री आश्रमातील आपल्या सहकार्यांना श्याम आईच्या या आठवणी सांगतो, असा फॉर्म गुरुजींनी या आठवणी शब्दांकित करताना निवडला आहे. एकूण ४२ रात्रींचा हा प्रवास आहे. कोकणातले दापोली परिसरातले श्यामचे घर, तेथील गरिबीचे पण अत्यंत प्रेमळ असे वातावरण, श्यामवर त्याच्या आईइतकेच प्रेम करणारे पण प्रसंगी वज्राहूनही कठोर होणारे त्याचे वडील, दुर्वांची आजी अशी अनेक पात्रे गुरुजींनी आपल्या भावमधूर शैलीत जिवंत करून सांगितली आहेत. आई अर्थातच श्यामला मनापासून जीव लावणारी पण तीही शिस्तीचे धडे देताना वडलांइतकीच कठोर होणारी... कधी श्यामला आपल्या आईच्या या शिस्तीचा वा तिच्या कठोरपणाचा रागही येतो. पण पुढच्याच क्षणी आईच त्याला ते समजावून सांगते. हे सारेच कसे मनाचा ठाव घेणारे आहे. पुस्तकातील अनेक प्रसंग, उपकहाण्या, सुभाषितवजा वाक्ये किमान गेल्या पिढीतील लोकांच्या तरी मनात कायमचे घर करून बसली आहेत.
खरे तर आज ज्या प्रकारे आपल्याला जीवन जगावे लागत आहे आणि ते करताना जी नवी जीवनमूल्ये समाजात रूढ होऊ पाहत आहेत, त्यांच्याशी संपूर्ण विसंगत अशी जीवनशैली आणि जीवनमूल्ये या पुस्तकात आहेत. तरीही गेली सात दशके या पुस्तकाची महती कायम आहे. त्यामुळे त्याबद्दल आणखी काहीही सांगण्याची गरज नाही.
असे काय आहे या पुस्तकात?
खरे तर हे पुस्तक आज मराठी माणसांच्या घराघरांत आहे. पुस्तक नसले, तरी त्याची कहाणी ही जवळपास प्रत्येक मराठी माणसाला ठाऊक आहे. ज्या कोणी ते वाचलेले नसेल, त्यांनी आचार्य अत्रे यांनी त्या पुस्तकाच्या प्रेमात पडून काढलेला 'श्यामची आई` हा चित्रपट तरी पाहिलेला असतो आणि त्यातील श्यामच्या आईची वनमालाबाईंनी उभी केलेली भूमिका आणि माधव वझे यांनी जिवंत केलेला श्याम हा त्यांच्या डोळ्यासमोर कायम उभा राहिलेला असतो.
'श्यामची आई` हा साने गुरुजींच्या बालपणीच्या आठवणींचा एक सोहळा आहे. अर्थात, याचा अर्थ गुरुजींच्या सार्याच आठवणी सुखद आहेत, असे मुळीच नाही. उलट गुरुजींचे बालपण किती खडतर अवस्थेत गेले, त्याचीच एका अर्थाने ही 'कथामाला` आहे. पण गुरुजींच्या मनात त्या आठवणी सांगताना, त्याबद्दलची खंत बिलकूलच नाही. उलट त्या खडतर काळातही आईने लहानग्या श्यामवर केवळ प्रेमाचाच वर्षाव केला, असे नाही तर उलट कोणत्याही खडतर प्रसंगातून आपले चारित्र्य आणि शील अभंग राखून बाहेर कसे पडावयाचे याचेच त्यास शिक्षण दिले. 'श्यामची आई` ही एका अर्थाने एक संस्कार शाळाच होती. शाळा कसली, ते खर्या अर्थाने गुरुजींचे 'माझे विद्यापीठ`च होते.
स्वातंत्र्य आंदोलनात तुरुंगवासात गुरुजींनी या आठवणी जागवल्या. खुद्द गुरुजी लिहितात : 'दिवसा काम करावे आणि रात्री जगन्माता, भारतमाता व जन्मदात्री माता यांच्या विचारात रंगावे,` असे तेथे चालले होते. गुरुजींच्या तुरुंगातील अनेक मित्रांना या रात्री आवडल्या. ज्यांना गुरुजी आपले लिखाण वाचून दाखवीत, त्यांच्या डोळ्यात अश्रू येत आणि त्यांच्याबरोबर गुरुजींच्या डोळ्यातूनही घळघळा पाणी वाहत असे. अश्रू हा गुरुजींच्या सार्याच साहित्याचा एक अविभाज्य घटक आहे. कोणी त्यामुळे गुरुजींच्या साहित्याची संभावना रडके वा पळपुटे साहित्य अशा शब्दांत भलेही करोत त्यामुळे त्या साहित्याची महती कमी होणारी नाही. आचार्य अत्रे यांच्यासारख्या अत्यंत आक्रमक प्रकृतीच्या माणसालाही ती समजू शकली होती त्यामुळेच त्यांनी या आठवणींवर अत्यंत भावूक आणि मनाला हात घालणारा असा चित्रपट तर काढलाच, शिवाय 'मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र` असा डोळ्यात पाणी आणणारा लेख लिहून या पुस्तकाचे अजरामर स्थान मराठी वाचकांच्या लक्षात आणून दिले.
दररोज रात्री आश्रमातील आपल्या सहकार्यांना श्याम आईच्या या आठवणी सांगतो, असा फॉर्म गुरुजींनी या आठवणी शब्दांकित करताना निवडला आहे. एकूण ४२ रात्रींचा हा प्रवास आहे. कोकणातले दापोली परिसरातले श्यामचे घर, तेथील गरिबीचे पण अत्यंत प्रेमळ असे वातावरण, श्यामवर त्याच्या आईइतकेच प्रेम करणारे पण प्रसंगी वज्राहूनही कठोर होणारे त्याचे वडील, दुर्वांची आजी अशी अनेक पात्रे गुरुजींनी आपल्या भावमधूर शैलीत जिवंत करून सांगितली आहेत. आई अर्थातच श्यामला मनापासून जीव लावणारी पण तीही शिस्तीचे धडे देताना वडलांइतकीच कठोर होणारी... कधी श्यामला आपल्या आईच्या या शिस्तीचा वा तिच्या कठोरपणाचा रागही येतो. पण पुढच्याच क्षणी आईच त्याला ते समजावून सांगते. हे सारेच कसे मनाचा ठाव घेणारे आहे. पुस्तकातील अनेक प्रसंग, उपकहाण्या, सुभाषितवजा वाक्ये किमान गेल्या पिढीतील लोकांच्या तरी मनात कायमचे घर करून बसली आहेत.
खरे तर आज ज्या प्रकारे आपल्याला जीवन जगावे लागत आहे आणि ते करताना जी नवी जीवनमूल्ये समाजात रूढ होऊ पाहत आहेत, त्यांच्याशी संपूर्ण विसंगत अशी जीवनशैली आणि जीवनमूल्ये या पुस्तकात आहेत. तरीही गेली सात दशके या पुस्तकाची महती कायम आहे. त्यामुळे त्याबद्दल आणखी काहीही सांगण्याची गरज नाही.
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin