नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया

Go down

वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया Empty वास्तुशांती: एक वैदिक प्रक्रिया

लिखाण  Admin Thu Jun 07, 2012 12:47 pm

वास्तुमध्ये अंतर्गत सजावट करताना ब-याच वेळा तोडफोड होते. त्यामुळे वास्तुमध्ये दोष निर्माण होतात. त्यासाठी वास्तुशांती केली पाहिजे. वास्तुशांती म्हणजे त्या वास्तुमधील अणू-रेणू वर झालेली एक प्रभावी परिणामकारक अशी एक वैदिक प्रक्रिया होय.

कर्तव्यं वास्तुशमनं सौमित्रे चिरजीवि भि:।।

( वाल्मिकी रामायण अरण्यकांड, सर्ग ५६, श्लोक २३)

वरील श्लोक वाल्मिकी रामायणामधील असून ज्यावेळी श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी वनवासात गेले त्यावेळी चित्रकूट पर्वतावर त्यांचा पहिला स्वतंत्र मुक्काम आला व तेथे त्यांनी कुटी बांधली. श्रीराम, लक्ष्मण, सीता म्हणाले, 'हे सौमित्रा! 'चिरंजीवी' इच्छा असलेल्यांनी वास्तुशांती आवश्य करावी असे शास्त्र वचन आहे. म्हणून आपण या कुटीची वास्तुशांती करू या.' त्यावेळेस नगरातून व वनातून विद्वान पुरोहित व ऋषी यांना बोलावून वास्तुशांती करण्यात आली. यावरूनच वास्तुशांती हा विधी वेदकाळापासून आहे हे सिद्ध होते.

वास्तुशास्त्रामधील वास्तुपुरुष कोण याबद्दल काही कथानके आहेत. वेदानुसार 'वस्तोष्पती' ही वैदिक देवता आहे. हा रुदप्रजापती व उषा यांचा चौथा पुत्र यांचे नाव वास्तोष्पती किंवा गृहपतीआग्ने असे आहे. या यज्ञाचा रक्षक व यज्ञवेदीचा अधिनायक मानला जाई. पुढे हा सर्व भवनांचा स्वामी तर पृथ्वी ही त्याची गृहस्वामिनी समजली जाईल.

दुसरी कथा त्रेतायुगात - एक महाकाय मानव निर्माण झाला. त्याने तीनही लोक व्यापले. ्याला घाबरून सर्व देव ब्रह्मादेवाला शरण गेले. ब्रह्मादेवाने सांगितले, याला खाली तांेड करून पाडून टेवला तर त्याला काही खाबरण्याचे कारण नाही. देरांनी त्याला खाली पाडले व देव त्याच्या अंगावर बसले. त्या मानवाने ब्रह्मादेवाची प्रार्थना केली, 'मी काही अपराध केला नसताना हे सर्व देव मला त्रास देत आहेत, मला अभय द्या.' ब्रह्मादेवाने त्याला भयमुक्त केले आणि वर दिला की, जेथे नवीन घर, गाव, नगर, उद्योग वसवले जातील तेथे सर्व लोक तुझी पूजा करून हाविर्भाग देतील.

तिसरी कथा - मत्स्य पुराणात आली. भगवान शंकर व अंधकासूर यांत तुंबळ युद्ध सुरू असताना शंकराच्या कपाळावरून दोन घर्मबिंदू जमिनीवर पडले. त्यातून एक महाभयंकर आकृतीचा पुरुष निर्माण झाला. अंधकासूर व त्याच्या सैन्याचे रक्तपान करूनही त्याची भूक काही शमेना. तो महादेवावर भक्षण करण्याच्या हेतूने चाल करून आला. त्याचा हेतू जर सफल झाला तर भयंकर आपत्ती येईल म्हणून सर्व देवांनी त्याला जिमनीवर अधोमुख झोपवून बांधले. नंतर त्याने शंकराची स्तुती केली. महादेवाने त्याला वर दिला, 'सर्व देव तुझ्या शरीरात वास करतील व जेते नवीन घर, गाव, नगर, उद्योग वसविले जातील आणि वैश्वदेव यज्ञयाग प्रसंगी सर्व मनुष्यमात्रा तुझी पूजा करून हविर्भाव देतील. सर्व देवांनी त्याच्या शरीरात निवास केला म्हणून हा पुढे वास्तुदेवता / वास्तुपुरुष या नावाने प्रसिद्ध झाला. तेव्हापासून याची तलाव, विहीर, मंदिर, यज्ञ, नवीन घर, गाव, वाडे, नवीन व्यवसाय यांच्या आरंभ प्रसंगी तसेच घराचे, मंदिराचे जीणोर्द्वारे प्रसंगी प्रयत्नपूर्वक पूजा करून हविर्भाव दिला जातो.'

वास्तुयज्ञ एकंदरित पाचवेळा करावा असे मत्स्य पुरुणात सांगितलेले आहे.

१) आखणी करून भूमीपूजन करताना २) पहिला खांब बसविताना (कॉलम), ३) पहिले दार बसविताना (स्लॅब टाकताना), ४) छत बसविताना ५) गृहप्रवेश करताना इ. परंतु आता वास्तुशांती गृहप्रवेशाच्या वेळी किंवा गृहप्रवेश करून नंतर मुहूर्तावर करण्याची प्रथा रुढ झाली आहे.

वास्तुमध्ये अंतर्गत सजावट करताना बऱ्याच वेळा तोडफोड होते. त्यामुळे वास्तुमध्ये दोष निर्माण होतात. त्यासाठी वास्तुशांती केली पाहिजे. वास्तुशांती म्हणजे त्या वास्तुमधील अणू-रेणू वर झालेली एक प्रभावी परिणामकारक अशी एक वैदिक प्रक्रिया होय. त्या अणू-रेणूंवर वास्तुशांती करताना पठन होणाऱ्या मंत्राचा, शुभ विचारांचा एक परिणाम जगभरातील प्रत्येक कण दुसऱ्यावर परिणाम करीत असतो. म्हणून तुमच्या परिसरातील एखाद्या वस्तुकडे पाहून तुम्ही चांगले किंवा वाईट विचार करता तेव्हा त्याचे पडसाद इतर कणांवरही पडतात. 'टाओ ऑफ फिजिक्स' आणि 'डान्सिंग वू ली मास्टर्स'मध्ये सूक्ष्मातिसूक्ष्म असे वागतात याचे चित्र आहे. डाविर्नसुद्ध 'जडातूनच चेतना'ची उत्क्रांती मानतो. म्हणून जेथे तुम्ही वावरता, तिथल्या वास्तूवर, मातीवर, वस्तूवर रिचारांच्या धक्क्याचे परिणाम होतात. पूवीर् आपल्या घरी आपली आजी किंवा आजोबा सांगत असत की, घरामध्ये क्लेश करु नये, अभद बोलू नये. वास्तुपुरुष अस्तु म्हणत असतो. हे विचार आपण्यास पटण्यासाठी एकविसावे शतक उजाडले आहे. यात अजून महत्त्वाचे रहस्य म्हणजे प्रत्यक्ष शब्द जरी उच्चारले गेले नाहीत तरीसुद्ध मूक विचारांचे धक्के निर्माण होतातच. बिटा पातळीवरील असे धक्के शास्त्रज्ञांनी मोजलेले आहेत. हे धक्के किंवा त्याचे परिणाम, तुम्ही जे बोलता किंवा तुम्ही करता त्या कामाचे परिणाम त्या वातावरणात राहतात, त्याचे परिणामही भिंतीवर, वस्तूवर, आसमंतात होतात, येथे तर वास्तुशांतीच्या प्रयोगात वातावरणशुद्धी तर होतेच त्याचबरोबर त्या वातावरणात किंवा पूजेच्या वेळेस असणाऱ्या व्यक्तींची देहशुद्धी व मनशुद्धी होत असते व यासारखा प्रबावी उपाय दुसरा असूच शकत नाही. ख्रिश्चनांमध्येदेखील पवित्र जल (होली वॉटर) शिंपडून वास्तुशुद्धी केली जाते. प्रत्येक धर्मात वास्तुशुद्धीचे प्रकार आहेत. पण सर्वात शास्त्रशुद्ध प्रकार म्हणजे वास्तुशांती आपल्या हिंदू धर्मात सांगितलेली आहे. दर पाच वर्षांनी घराची वास्तुशांती करावी. मात्र वास्तुप्रतिमा एकदाच निपेक्ष करावी असे शास्त्रात सांगितले आहे. दर पाच वर्षांनी वास्तुच्या शुद्धीचे वर्तुळ पूर्ण होते. मत्सरापासून निर्माण झालेल्या लहरींचे उच्चाटन होते. हा एक अनुभव आहे.

आपल्या हिंदू संस्कृतीत सगुण व निर्गुण असा पूजा प्रकार आहे. सगुण उपासनेत प्रतिमा तर निर्गुण उपासनेत यंग अथवा प्रतिकांची पूजा होते. यंत्र / मंडल / चक्र / भद यात सर्व देवतांची पूजा होत असते व हे देवतेचे आसन अशा अर्थानेही प्रसिद्ध आहे. वास्तु मंडल हे ४९ पद, संपूर्ण मंडप १०० पद, तलाव, वन, उद्याग निर्माण १९६ पद, सिद्ध लिंग प्रतिष्ठा, नवीन राज्य निर्माण, कोटी होम शांती, महाप्रलयानंतरचे पुननिर्माण, मोटे महोत्सव यात १००० पद वास्तुचक्राची / वास्तुमंडलाची पूजा करण्याचा प्रघात आहे. यज्ञयागात नैऋत्य दिशेला वास्तुचक्राची स्थापना करतात.

वास्तुशांतीत प्रत्यक्ष काय केले जाते याचा संक्षिप्त आढावा घेऊ. घरी गुरुजी येतात, मांडणी करतात, तयारी पूर्ण करून शांतीसुक्त म्हणतात. यात सर्व देवांनी येऊन तृप्त व्हावे असे निमंत्रण व विनंती असते. मंगलाचरण, देव, ब्राह्माण यांना नमस्कार करून संकल्प केला जातो. संकल्पात सिद्धी आहे असे म्हणतात. हा संकल्प म्हणजे मी काय करणा, कुणासाठी करणार, कशासाठी करणार व त्याने मला काय प्राप्त व्हावे हे स्पष्ट केलेले असते. वास्तुशांतीच्या संकल्पात सर्व पूजेच्या संकल्पनाप्रमाणे आपण कुठे बसतो आहोत. आज तिथी, बार, नक्षत्र व आकाशास्य ग्रह स्थिती कशी आहे याचे वर्णन येते. नंतर गोत्र प्रवराचा उच्चार करून विशेष संकल्प सुरू होतो. त्याचा भावार्थ असा, 'ही जमीन घरायोग्य होण्यासाठी जे संस्कार केले ते करताना भूमीला जे दु:ख झाले असेल त्यातून सुवर्ण, रजत, ताम्र, त्रपु, सीसक, कास्य, लोह, पाषाण इत्यादी काढून घेताना, तसेच खणणे, तोडणे, कापणे, भाजणे, भिजविणे, तुडविणे, कांडणे, साखरणे, आय व व्यय म्हणजे कमी जास्त करताना जे दोष निर्माण झाले, या वास्तुच्या क्षेत्रफळाच्या गणिताप्रमाणे, आय (जमा) कमी व व्यय (खर्च) जास्त असेल तर तो दोष जावा, हे घर बांधताना भिंतीत जमिनीत कृमी किटक मारले गेले, ज्या जीव हिंसा झाल्या त्याचा दोष मला येऊ नये व आल्या असल्यास तो निघून जावा तसेच मी येथे चिरकाल निवास करू शकेल यासाठी माझ्या शत्रूंच्या शुजूबुद्धीचा नाश व्हावा, मला माझ्या घरातील परिजनांना दीर्घायुष्य धनधान्य, पुत्र, पौत्र, कीतीर् लाभ इ. प्राप्त व्हावे, ग्रहांचा आशीर्वाद मिळावा म्हणून मी वास्तुशांती करतो. अशा प्रार्थना होते. प्रार्थनेमध्ये किती मोठी शक्ती असते यासाठी एक सत्य घटना नमूद करावीशी वाटते.'

तो काळ सुमारे १९०० चा. फ्रान्समधील डॉ. अॅलॅक्सी कॅरेल नावाचे निष्णांत व वैद्यकिय व्यवसाय करणारे सज्जन गृहस्थ. अतिशय बुद्धिमान पण अश्रद्ध, नास्तिक म्हणून प्रसिद्ध. ते एका मेडिकल कॉलेजमध्ये शिकवित असताना त्यांचे जीवन पालटून टाकणारा एक प्रसंग घडला. एक श्रीमंत व्यक्ती, पण निरनिराळ्या व्याधींनी पीडित विशेषत: क्षयरोग झालेला रुग्ण त्यांच्या इस्पितळात दाखल झाला

- डॉ. तुषार यशवंत सावडावकर
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही