नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


संत निळोबा

Go down

संत निळोबा Empty संत निळोबा

लिखाण  aplemarathijagat Sat May 19, 2012 8:48 pm

संत निळोबा 9961_MahaS

वारकरी संप्रदायाची परंपरा झानदेव नामदेवांपासून सुरु होते व तुकोबा निळोबांपर्यंत येते. निळोबांनी तुकोबांनाच गुरुस्थानी मानलं होतं. त्यांना अनुग्रह देण्याचं तुकोबांनी मान्य केलं होत पण त्यापूर्वीच तुकोबा वैकुंठवासी झाले. त्यांनी आपल्याला स्वप्नामध्ये अनुग्रह दिला असं निळोबांनी आपल्या एका अभंगात म्हटंल आहे.

येवोनिया कृपावंते | तुकयास्वामी सदगुरुनाथे
हात ठेविला मस्तकी | देऊनि प्रसाद केले सुखी
माझी वाढविली मती | गुण वणविया स्फुर्ती
निळा म्हणे, मी बोलता | दिसे परि त्याची सत्ता

योगायोग असा की, तुकोबांनीही त्यांच्या गुरुंनी -बाबाजी चैतन्यानी - स्वप्नातच उपदेश दिला व राम -कृष्ण-हरी या मंत्राचा जप कर असं सांगितलं.

आपण कवी नाही तर पांडुरंगच आपल्याला बोलवितो असं तुकोबा म्हणतात त्याच प्रमाणे निळोबाही आपल्या कवितेचं श्रेय तुकोबांना देतात, हे वरील अवतरणाच्या शेवटच्या चरणावरुन लक्षात येईलच.

संत निळोबा हे अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेरचे. त्यांची चिरित्र विषयक माहिती फार अल्प प्रमाणात उपलब्ध होते. निश्चित माहिती उपलब्ध होत नाही. संत चरित्र्यकार महीचती यांनी निळोबांविषयी भद्यविजया च्या 59व्या अध्यायात विवेचन केलं असून त्यांच्या विषयीच्या काही आख्यायिकाही सांगितल्या आहे. त्यांचा काळ सतराव्या शतकाचा पूर्वार्ध असावा. ते शके 1580 (इ.स.1658) च्या सुमारास विद्यमान होते अशी माहिती महाराष्ट्र भाषा भूषण ज.र.आजगावकर यांनी दिली आहे.

त्यांनी तुकोबांविषयी 332 श्लोक लिहिले व त्यांची अभंगरचना सुमारे 1900 असावी. त्यांच्या अभंगवाडय़ात वारकरी सम्प्रदायाच्या तत्त्वज्ञानाची आचारधर्माची आणि परंपरेची अनेकविध वैशिष्टचं दिसतात.

वारकरी सम्प्रदायान सुलभ भक्तिमार्गावर भर दिला आहे. यज्ञयाग, कर्मकांड, पोथी-पांडित्य, उपासनेची जटिलता ही जर जनसामान्यांच्या भक्तीच्या आड येत, असेल तर केवळ देवाचं नाव घेऊनही भक्ती करता येते, असं वारकरी सम्प्रदायाच्या तत्वज्ञानात सांगितलं असून ज्ञानदेव. नामदेवांपासून तुकोबांपर्यंतच्या सर्व वारकरी संतांनी नामस्करणावर व ईशचिंतनावर भर दिला आहे. निळोबाही नामस्मरणाचं ईशचिंतनाचं महत्व अशा प्रकारे प्रतिदादितात
गोड नाम तुमचें देवा | गोड सेवा तुमची ते |
गोड तुमची कीर्ती वाणी | गोड श्रवणी ऐकतां |
गोड तुमचे रुप दृष्टी | गोड पोटी प्रेम ते |
गोड निळा तुमचे पायी | गोड डोई ठेवितां |

नामस्मरण ही व्यक्तिगत भक्ती आहे तर कीर्तन ही सामूहिक भक्ती आहे. त्यामुळं वारकरी सम्प्रदायान कीर्तनरुपी सामूहिक भक्तीचाही

भवरोगी जे पीडिले | तिही आवश्यक सेवा
महामाचा हरिकीर्तन | उतरलें रसायन निजनिगुती |
मागें बहुतां गुणासि आलें | अरोगी ठेविले करुनि |
निळा म्हणे सांगता फार | होईल विस्तार नामे त्याच्या

भक्ती करण्यासाठी संसाराचा/प्रपंचाचा त्यागच करायला हवा असं नाही हा विचारही वारकरी सम्प्रदायाच्या विचारसरणीत महत्त्वाचा आहे. नामदेव एकनाथ, तुकोबा, निळोबा हे सारे सन्त प्रापंचिकच होते. त्यांनी प्रपंचाची परमात्माशी सांगड घातली.

भक्ती करताना सत्संग, संतसंग हाही महत्त्वाचा आहे, असं वारकरी संप्रदाय मानतो. निळोबांनं यासाठीच सन्तमहिमा वर्णन करणारे अनेक अभंग लिहिले आहेत. निळोबांनी तुकोबांप्रमाणंच ज्ञानदेव, नामदेव, एकनाथादी संतांचा महिमाही आपल्या अभंगातून अत्यंत तन्मयतेनं व समरसून गायिला आहे.

एकेश्वरवाद हा तर वारकरी सम्प्रदायाच्या तत्वज्ञानाचा गाभा आहे. यासाठी वारकरी संप्रदाय विठ्ठल भक्तीचा - सगुणोया सतेचा पुरस्कार करतो याचं प्रतिबिम्ब निळोबांच्या पांडुरंगमाहात्मयपर अभंगात उमटलं आहे. पांडुरंगामुळंच पंढरीला नि वारीलाही महत्त्व आलं- निळोबांनी या विषयीचेही अनेक अभंग लिहिले आहेत. पण ह्या सगुणोपासनेचं अंतिम उद्दिष्ट निर्णणोपासना हेच आहे, हे निळोबांच्या 'कैवल्याचा गाभा' व्यापूनिया ठेला नभी यासारख्या अभंगातून आढळतं.

डॉ.यू.म.पठाण

aplemarathijagat
Member
Member

Posts : 47
Join date : 15/05/2012

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही