Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
फळांचा राजा
:: विविधा
पृष्ठ 1 - 1 पैकी
फळांचा राजा
आंबा हा फळांचा राजा आहे, असे म्हणतात. इतका सर्वप्रिय, सर्वार्थांनी मधुमधुर असा दुसरा कोणता राजा भूतलावर असेल असे वाटत नाही. आंबा सर्वांना आवडतो. त्यामुळे यंदा आंबा रुसला या बातमीनेच बहुसंख्य लोक हिरमुसले झाले.
आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा होऊ नये यासाठी समर्थ फार जपत. या विषयातील खिरीची गोष्ट प्रसिद्धच आहे. समर्थांना आंबा किती आवडत असावा ? त्यांनी आंबा या विषयावर आंब्यासारख्याच सुमधुर अशा अठरा ओव्या लिहिल्या आहेत. ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा। सकळ फळामध्यें आंबा। मोठे फळ।। त्याचा स्वाद अनुमानेना। रंग रूप हें कळेना। भूमंडळी आंबे नाना। नाना ठाई।। आंबे किती नानाप्राकरचे उपलब्ध आहेत, त्याचा तपशील समर्थ यापुढे देतात, मावे हिरवे सिंधुरवर्ण। गुलाली काळे गौरवर्ण। जांभळे ढौळे रे नाना जाण। पिवळे आंबे।। आंबे येकरंगी दुरंगी। पाहो जातां नाना रंगी। अंतरंगी बाहेरंगी। वेगळाले।। आंब्याचे आकार किती विविध आहेत, काही आंबे टणक तर काही लोण्यासारखे मऊ. काही आंबे बडिशेपेच्या तर काही कोथिंबिरीच्या वासाचे, असे समर्थ नोंदवून ठेवतात. आंबे वाटोळे लांबोळे। चापट कळकुंबे सरळे। भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मऊ।। नाना फळांची गोडी ते। आंब्यामध्ये आडळते। सेपे कोथिंबिरी वासाचे। नानापरी।। केवळ आंब्याच्या वासानेच माणसाला सुख लाभते, आनंद वाटतो. आपण तर एका सुवासिक तांदळालाच आंबेमोहोर असे नाव दिले आहे. आंब्याचा मोसम नसतानाही आंब्याचा वास मात्र लाभावा, असा हेतू त्यामागे असावा. कोवी लहान दाणे मोठे। मगज अमृताचे साटे। हाती होतां सुख वाटे। वास येतां।। सोफुसाली हि असेना। नासक वीटक दिसेना। टाकावे वस्त्रावरी नाना। कोरडे आंबे।। येंक आंबा वाटी भरे। नुस्त रसामध्यें गरे। आता श्रमचि उत्तरे। संसारींचा।। आंबे खाल्ल्यामुळे संसाराचा ताप कमी होतो, श्रम हलके होतात, असे हा महाराष्ट्राचा श्रेष्ठ-विरक्त संत आपल्याला सांगत आहे.रस सुकवून-वाळवून आंब्याचे जे साठ केले जाते, त्यामध्येही आंब्याची गोडी उतरते. आंबा तगणाऊ नासेना। रंग विरंग दिसेना। सुकतां गोडी ही सांडिना। काही केल्या।। भूमंडळीं आंबे पूर्ण। खाऊन पाहतो तो कोण। भोक्ता जगदीश आपण। सकळां ठायीं।। नाना वर्ण नाना स्वाद। नाना स्वादामध्ये भेद। नाना सुवासें आनंद। होत आहे।।
एवढे सांगून झाल्यानंतर समर्थ आंबा खाण्याचा आनंद मनसोक्त घ्यावा, सर्वांनी एकमेकांना आंबा द्यावा, अशी इच्छा प्रकट करतात. आंबे लावावे लाटावे। आंबे वाटावे लुटावे। आंबे वाटिता सुटावे। कोणी तरी।। आंब्याला नेहमी पाणी घालावे लागत नाही. आंब्याने एकदा मूळ धरले की तो आपणच मोठा होत जातो आणि फळांची खैरात आयुष्यभर करीत राहतो. केवढा हा उपकार. नाहीं जळ तेथे जळ।कां तें उदंड आंब्रफळ। परोपकाराचें केवळ। मोठे पुण्य।। पुण्य करावें करवावें। ज्ञान धरावें धरवावें। स्वयें तरावें तरवावें। ऐक मेका।। समर्थ एवढे सांगून थांबले तर त्यांनी केवळ आंब्याचाच गुणगौरव केला असे होईल. म्हणून अंाबा जसा इतरांना आनंदी करुन त्या आनंदात स्वत:चे सुख पाहतो, परोपकारार्थ स्वत: कारणी लागतो त्या आंब्यासारखेच आपणही सर्वांनी वागावे, असे समर्थांचे सांगणे आहे. मी तो बोलिलों स्वभावें। यांत मानेल तितुकें घ्यावें। काही सार्थक करावें। संसाराचें।। दास म्हणे परोपरी। शब्दापरीस करणी बरी। जिणे थोडे ये संसारी। दो दिसांचे।।
शब्दांमधून उपदेश करण्यापेक्षा कृतीने करावा.
आंबा घ्यावा, आंबा द्यावा, आंबा लुटावा आणि आपणही आंब्यासारखेच परोपकारी व्हावे, मधुमधुर असावे, असा समर्थांचा संदेश आहे.
या वर्षी आंबे कमी मिळाले, जवळजवळ मिळालेच नाहीत. त्यामुळे आमरस चाखणे अवघड झाले, पण समर्थांच्य साहित्यातील हा आमरस खर्याखुर्या आमरसाची थोडीतरी उणीव भरून काढील, असा विश्वास वाटतो.
आपल्या समर्थ रामदासस्वामींनाही आंबा फार आवडायचा. खरे म्हणजे ते कमालीचे विरक्त. पण आहारामध्ये चोखंदळ होते. पण त्या चोखंदळपणाचा आपल्या आत्मिक उन्नतीत अडथळा होऊ नये यासाठी समर्थ फार जपत. या विषयातील खिरीची गोष्ट प्रसिद्धच आहे. समर्थांना आंबा किती आवडत असावा ? त्यांनी आंबा या विषयावर आंब्यासारख्याच सुमधुर अशा अठरा ओव्या लिहिल्या आहेत. ऐका ऐका थांबा थांबा। कोण फळ म्हणविले बा। सकळ फळामध्यें आंबा। मोठे फळ।। त्याचा स्वाद अनुमानेना। रंग रूप हें कळेना। भूमंडळी आंबे नाना। नाना ठाई।। आंबे किती नानाप्राकरचे उपलब्ध आहेत, त्याचा तपशील समर्थ यापुढे देतात, मावे हिरवे सिंधुरवर्ण। गुलाली काळे गौरवर्ण। जांभळे ढौळे रे नाना जाण। पिवळे आंबे।। आंबे येकरंगी दुरंगी। पाहो जातां नाना रंगी। अंतरंगी बाहेरंगी। वेगळाले।। आंब्याचे आकार किती विविध आहेत, काही आंबे टणक तर काही लोण्यासारखे मऊ. काही आंबे बडिशेपेच्या तर काही कोथिंबिरीच्या वासाचे, असे समर्थ नोंदवून ठेवतात. आंबे वाटोळे लांबोळे। चापट कळकुंबे सरळे। भरीव नवनीताचे गोळे। ऐसे मऊ।। नाना फळांची गोडी ते। आंब्यामध्ये आडळते। सेपे कोथिंबिरी वासाचे। नानापरी।। केवळ आंब्याच्या वासानेच माणसाला सुख लाभते, आनंद वाटतो. आपण तर एका सुवासिक तांदळालाच आंबेमोहोर असे नाव दिले आहे. आंब्याचा मोसम नसतानाही आंब्याचा वास मात्र लाभावा, असा हेतू त्यामागे असावा. कोवी लहान दाणे मोठे। मगज अमृताचे साटे। हाती होतां सुख वाटे। वास येतां।। सोफुसाली हि असेना। नासक वीटक दिसेना। टाकावे वस्त्रावरी नाना। कोरडे आंबे।। येंक आंबा वाटी भरे। नुस्त रसामध्यें गरे। आता श्रमचि उत्तरे। संसारींचा।। आंबे खाल्ल्यामुळे संसाराचा ताप कमी होतो, श्रम हलके होतात, असे हा महाराष्ट्राचा श्रेष्ठ-विरक्त संत आपल्याला सांगत आहे.रस सुकवून-वाळवून आंब्याचे जे साठ केले जाते, त्यामध्येही आंब्याची गोडी उतरते. आंबा तगणाऊ नासेना। रंग विरंग दिसेना। सुकतां गोडी ही सांडिना। काही केल्या।। भूमंडळीं आंबे पूर्ण। खाऊन पाहतो तो कोण। भोक्ता जगदीश आपण। सकळां ठायीं।। नाना वर्ण नाना स्वाद। नाना स्वादामध्ये भेद। नाना सुवासें आनंद। होत आहे।।
एवढे सांगून झाल्यानंतर समर्थ आंबा खाण्याचा आनंद मनसोक्त घ्यावा, सर्वांनी एकमेकांना आंबा द्यावा, अशी इच्छा प्रकट करतात. आंबे लावावे लाटावे। आंबे वाटावे लुटावे। आंबे वाटिता सुटावे। कोणी तरी।। आंब्याला नेहमी पाणी घालावे लागत नाही. आंब्याने एकदा मूळ धरले की तो आपणच मोठा होत जातो आणि फळांची खैरात आयुष्यभर करीत राहतो. केवढा हा उपकार. नाहीं जळ तेथे जळ।कां तें उदंड आंब्रफळ। परोपकाराचें केवळ। मोठे पुण्य।। पुण्य करावें करवावें। ज्ञान धरावें धरवावें। स्वयें तरावें तरवावें। ऐक मेका।। समर्थ एवढे सांगून थांबले तर त्यांनी केवळ आंब्याचाच गुणगौरव केला असे होईल. म्हणून अंाबा जसा इतरांना आनंदी करुन त्या आनंदात स्वत:चे सुख पाहतो, परोपकारार्थ स्वत: कारणी लागतो त्या आंब्यासारखेच आपणही सर्वांनी वागावे, असे समर्थांचे सांगणे आहे. मी तो बोलिलों स्वभावें। यांत मानेल तितुकें घ्यावें। काही सार्थक करावें। संसाराचें।। दास म्हणे परोपरी। शब्दापरीस करणी बरी। जिणे थोडे ये संसारी। दो दिसांचे।।
शब्दांमधून उपदेश करण्यापेक्षा कृतीने करावा.
आंबा घ्यावा, आंबा द्यावा, आंबा लुटावा आणि आपणही आंब्यासारखेच परोपकारी व्हावे, मधुमधुर असावे, असा समर्थांचा संदेश आहे.
या वर्षी आंबे कमी मिळाले, जवळजवळ मिळालेच नाहीत. त्यामुळे आमरस चाखणे अवघड झाले, पण समर्थांच्य साहित्यातील हा आमरस खर्याखुर्या आमरसाची थोडीतरी उणीव भरून काढील, असा विश्वास वाटतो.
aplemarathijagat- Member
- Posts : 47
Join date : 15/05/2012
:: विविधा
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin