नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


श्री सिद्धेश्वर

Go down

श्री सिद्धेश्वर      Empty श्री सिद्धेश्वर

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:44 am

श्री सिद्धेश्वर      5852_Mahas
'श्री सिद्धरामेश्वर' हे वीरशैव सन्त 'श्रीसिद्धेश्वर' या नावाने अधिक परिचित आहेत. सिद्धेश्वर हे सोलापूरचं ग्रामदैवत (नगरदैवत) आहे. संक्रान्तीच्या सुमारास सोलापूरला सिद्धेश्वरांची यात्रा भरते व सर्व जातीधर्मांचे लोक या यात्रेला येतात. सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिर शहराच्या अगदी मध्यवर्ती परिसरात आहे. अत्यंत प्रसन्न स्थळी हे मंदिर असून त्याजवळच एक मोठं सरोवरासारखं वाटणारं तळं आहे. सिद्धेश्वरांच्या प्रेरणेनंच हा तलाव निर्माण केला गेला.

मर्‍हाटी संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी केवळ मराठी भाषक संतांनीच हातभार लावला असं नाही तर कन्नड भाषक सन्तांनी तसंच दक्खिनी भाषक सुफी व अन्य भाषक संन्तानीही हातभार लावला. या रूपात एकात्मतेचं सुंदर प्रतिबिम्ब मर्‍हाटी संस्कृतीत उमटलं आहे. महाराष्ट्राच्या सन्त साहित्यातही उमटलं आहे. वीरशैव धर्म हा पुरातन धर्म असून बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर यांनी त्यात नवचैतन्य ओतलं. त्यांचा प्रभाव पुढच्या काळात महाराष्ट्रातल्या अनेक धर्मसम्प्रदायांच्या विचारसरणीवर व तत्त्वज्ञानावर पडला. कर्मसिद्धातांचं पुनर्मूल्यांकन करून कोणतंही कर्म उच्च किंवा नीच (कनिष्ठ) वा हीन नसतं. सर्व कर्म मानवाच्या व समाजाच्या हितास व अभ्युदयास उपयुक्तच असतात. अशी सत्कर्म सर्वांनी करावीत. त्याचप्रमाणे भक्तीही करावी. कर्माधिष्ठित विषमता, उच्च-नीच जाती असा भेदभाव पाळू नये, असा जो क्रान्तिकारक विचार म.बसवेश्वरांनी दिला त्यामुळे आध्यात्मिक समता प्रस्थापित झाली.

सोलापुरात बहुसंख्य मराठी भाषक आहेत. पण या शहरात कन्नड, तेलगू, ऊर्दू-दक्खिनी भाषकही आहेत. त्यामुळे या शहरात भाषिक एकात्मकतेचं दर्शन देखील घडतं. वीरशैव संतांची रचना मूलत: कन्नड भाषेत आहे. तथापि, महाराष्ट्रातील अनेक वीरशैव संतांनी मराठी भाषेत मौलिक रचना केली आहे. त्यापैकी मन्मथस्वामी, लक्ष्मणमहाराज, बसवलिंग इ. प्रमुख संतकवी असून त्यांच्या रचनाही महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी याविषयी पीएचडीचं संशोधन केलं आहे व ते ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.

श्रीसिद्धरामेश्वर (सिद्धेश्वर) हे सोलापूरचे वीरशैव सन्तकवी. सोलापूरचं मूळ नाव 'सोन्नलगी' असल्याचं उल्लेख आढळतात. सिद्धेश्वरांनी कन्नड भाषेत लेखन केलं. हे वचन साहित्यांच्या स्वरूपात आहे. मूळ कन्नड वचनं व त्यांचा आशय पुढं देत आहे. त्यावरून सिद्धेश्वराच्या तत्त्वज्ञानाची (विचारविश्वाची) व भावविश्वाची कल्पना येईल. यातील 'कपिलासिद्ध मल्लीनाथ्' ही संज्ञा शिव (शंकर) विषयक असून शिव ही वीरशैवांची उपास्यदेवता आहे. शिव हा परमात्माच होय.

अन्य मराठी सन्ताप्रमाणंच आर्त भक्तिभावाचीच प्रचिती सिद्धेश्वरांच्या वचनसाहित्यात येते. (या मूळ कन्नड वचनांचा मराठी अनुवाद डॉ.पसारकर यांनी संपादिलेल्या 'श्रीसिद्धरामश्वरांची वचने' या ग्रंथात पहिल्या खंडात प्रसिद्ध झाला असून कन्नड वचनांचा मराठीत अनुवाद सर्वश्री मगाई, हनगंडी व डॉ.पुजारी यांनी केला असून त्याचा आशय इथं दिला आहे.)

सिद्धेश्वर म्हणतात :- 'देवा, तुम्हाला शरण न गेल्यामुळे माझं जीवन वाया गेलं आहे. तुम्हीच माझा उद्धार करा' (वचन क्रमांक ६२)

आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर भक्ती करायला हवी. त्यासाठी आपण सद्गुणांचा स्वीकार करावा व दुर्गुणांचा त्याग करावा. (सत्कर्म करावीत, दुष्कर्मांचा त्याग करावा.) आणि आपले आचार-विचार पवित्र असावेत, असं म्हणताना सिद्धेश्वरांनी वचन क्र. ४० मध्ये पुढील जीवनादर्श सांगितले आहेत.

'पापाच्या सहवासात पुण्य वाढत नाही नि पुण्याच्या सान्निध्यात पापही वाढत नही. सापाला दूध पाजलं तरी तो विष सोडीत नाही नि मद्यात दूध मिसळलं तरी ते दूध होत नाही.

भक्ती ही निस्वार्थ असावी, देवाला काही अर्पण केलं म्हणजे देव काही देतो असा विचार असल्यास तो एक प्रकारचा व्यवहारच नाही का? यातून ज्या चुकीच्या रुढी निर्माण झाल्या, त्यांचा विरोध सिद्धेश्वरांनी वचन क्र. ५७ मध्ये केला आहे. ते म्हणतात, ''आपला मुलगा देवाला अर्पण केल्यानं किंवा त्याला पत्नी अर्पण केल्यानं आपला उद्धार होतो किंवा देव आपल्यावर प्रसन्न होतो, या अंधश्रद्धा मुळीच बाळगू नका.''

सिद्धेश्वरांच्या वचनसाहित्यात त्यांनी महत्त्वाचं समाजप्रबोधन केलं आहे. कर्मसिद्धान्तामुळं जो दैववाद निर्माण होतो, त्यामुळं ऐहिक जीवनातील प्रयत्न वादावर नैराश्याचं सावट येऊ नये, यासाठी ते म्हणतात, पूर्वजन्मातील पाप-पुण्य (दुष्कर्म-सत्कर्म) या जन्मातील दु:खाला वा सुखाला मुळीच कारणीभूत नसतात. (वचन क्र. ८३)

त्याचप्रमाणं म.बसवेश्वरांनी सांगितल्याप्रमाणंच ऐहिक व आध्यात्मिक क्षेत्रात सर्वच समान असतात व सर्वच भक्ती करून आपला उद्धार करून घेऊ शकतात. यासाठी 'स्पृश्य-अस्पृश्य' या कल्पना चुकीच्या तर आहेच पण समाजातल्या काही लोकांवर अन्याय करणार्‍या आहेत. (वचन क्र.१२७)

सर्व धर्मातील महापुरूष व संत कसा समान विचार करतात याची प्रचिती सिद्धेश्वरांच्या या कन्नड भाषेतील वचनांवरून येत नाही का?
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही