Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
त्रिशुंड गणपती मंदीर
त्रिशुंड गणपती मंदीर
तुळशीबाग, बेलबाग, पर्वती किंवा ओंकारेश्वर ही पुण्यातली प्रसिध्द मंदिरे अगदी पक्क्या पुणेकरांनासुध्दा हीच मंदीर प्रसिध्द मंदिराच्या यादीत आठवतील. पण याच पुण्यामध्ये काहीसे दुर्लक्षित राहिलेले पण मंत्रशक्ती आणि हटयोगी या दोघांनाही पुजनीय असलेले गणपतीचे मंदीर म्हणजे त्रिशुंड गणपती मंदीर.
हे मंदीर संपूर्ण महाराष्ट्रातले वैशिष्ट्यपूर्ण मंदीर आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. इथली तीन सोंड असलेली गणपतीची मुर्ती, मंदिराची स्थापत्यशैली, शिल्पकला सारेच काही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे गणपती मंदीर इंदोरजवळच्या धर्मापूरच्या भिमगीरी गोसावी यांनी १७५४ मध्ये बांधले. मंदिराचे एकूण बांधकाम एखादी गुहा कोरावी तसे केले आहे. या मंदिराच्या स्थापत्यशैलीमध्ये अनेक राज्याच्या स्थापत्यकलेचे मिश्रण झालेले दिसते. मंदिराच्या बाहेरच्या भागावर राजस्थानी आणि मराठी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसतो तर मंदिराच्या आतले कोरीव काम गुजराथी आणि मध्य प्रदेशचे अस्तित्व दाखवून देते. मंदिरातले षटकोनी खांब, घुमटावर दाक्षिणात्य प्रभाव दिसतो. या सगळ्यांची सुरेख सरमिसळ होऊन या मंदिराला एक रेखीवपणा आला आहे.
या मंदिराच्या बाहेरच्या बाजुने अलंकारिक आकृती, प्राणी, पुराणकथांमधली पात्रं, वानरं, सैनिक, योध्दे यांच्या आकृती कोरल्या आहेत.
या मंदिरावर कोरलेल्या शिल्पातून त्या काळातल्या समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला होता. या मंदिराच्या प्रवेशद्वारालगतचे एक शिल्प आपले सहज लक्ष वेधून घेते. या शिल्पामध्ये एका गेंड्याला जेरबंद करुन काही ब्रिटीश शिपाई घेऊन चालले आहेत, असे हे शिल्प यातून या कलाकारांनी दिलेला संदेश होता तो म्हणजे जसे बंगाल राज्य ब्रिटीशांनी घशात घातले तसेच इतरही राज्य जातील म्हणून त्यांनी सावध असावं.
मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असे तीन भाग आहेत. सभामंडपातील कोरीव काम अप्रतिम आहे. मराठी स्थापत्यशैलीमध्ये बहुतेकदा सभामंडप हा लाकडी कोरीव काम केलेला असतो पण इथे हा दगडी आहे. गाभार्यामध्ये तिन सोंड असलेली गणपतीची मुर्ती आहे.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे या मंदिरात हटयोगीही साधना करायचे. हटयोगी महाराष्ट्रात आता जवळपास दिसतच नाहीत. पण पुर्वी ते होते. त्यांच्या साधनेसाठी आवश्यक असणारी व्यवस्था या मंदिरात केली आहे. जुने मठ कसे होते याची कल्पना या मठांकडे बघून येते. इथे साधना करणारे हटयोगी कित्येक महिने मंदिराच्या बाहेरही येत नसतं. त्यादृष्टीने या मंदिराची रचना करण्यात आली आहे.
आता अनेक नव्या वास्तू मंदिर परिसरात तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर आणखीच दुर्लक्षित झाले आहे. पण मठ आणि मंदिर एक असणारे त्रिशुंड गणपती मंदिर महाराष्ट्रातले एकमेव मंदीर आहे, यात शंका नाही.
किर्ती मोहरील
हे मंदीर संपूर्ण महाराष्ट्रातले वैशिष्ट्यपूर्ण मंदीर आहे, असे म्हटले तरी ती अतिशयोक्ती ठरणार नाही. इथली तीन सोंड असलेली गणपतीची मुर्ती, मंदिराची स्थापत्यशैली, शिल्पकला सारेच काही वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे गणपती मंदीर इंदोरजवळच्या धर्मापूरच्या भिमगीरी गोसावी यांनी १७५४ मध्ये बांधले. मंदिराचे एकूण बांधकाम एखादी गुहा कोरावी तसे केले आहे. या मंदिराच्या स्थापत्यशैलीमध्ये अनेक राज्याच्या स्थापत्यकलेचे मिश्रण झालेले दिसते. मंदिराच्या बाहेरच्या भागावर राजस्थानी आणि मराठी स्थापत्यकलेचा प्रभाव दिसतो तर मंदिराच्या आतले कोरीव काम गुजराथी आणि मध्य प्रदेशचे अस्तित्व दाखवून देते. मंदिरातले षटकोनी खांब, घुमटावर दाक्षिणात्य प्रभाव दिसतो. या सगळ्यांची सुरेख सरमिसळ होऊन या मंदिराला एक रेखीवपणा आला आहे.
या मंदिराच्या बाहेरच्या बाजुने अलंकारिक आकृती, प्राणी, पुराणकथांमधली पात्रं, वानरं, सैनिक, योध्दे यांच्या आकृती कोरल्या आहेत.
या मंदिरावर कोरलेल्या शिल्पातून त्या काळातल्या समाजासाठी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला गेला होता. या मंदिराच्या प्रवेशद्वारालगतचे एक शिल्प आपले सहज लक्ष वेधून घेते. या शिल्पामध्ये एका गेंड्याला जेरबंद करुन काही ब्रिटीश शिपाई घेऊन चालले आहेत, असे हे शिल्प यातून या कलाकारांनी दिलेला संदेश होता तो म्हणजे जसे बंगाल राज्य ब्रिटीशांनी घशात घातले तसेच इतरही राज्य जातील म्हणून त्यांनी सावध असावं.
मंदिराचे सभामंडप, अंतराळ आणि गाभारा असे तीन भाग आहेत. सभामंडपातील कोरीव काम अप्रतिम आहे. मराठी स्थापत्यशैलीमध्ये बहुतेकदा सभामंडप हा लाकडी कोरीव काम केलेला असतो पण इथे हा दगडी आहे. गाभार्यामध्ये तिन सोंड असलेली गणपतीची मुर्ती आहे.
पुर्वी सांगितल्याप्रमाणे या मंदिरात हटयोगीही साधना करायचे. हटयोगी महाराष्ट्रात आता जवळपास दिसतच नाहीत. पण पुर्वी ते होते. त्यांच्या साधनेसाठी आवश्यक असणारी व्यवस्था या मंदिरात केली आहे. जुने मठ कसे होते याची कल्पना या मठांकडे बघून येते. इथे साधना करणारे हटयोगी कित्येक महिने मंदिराच्या बाहेरही येत नसतं. त्यादृष्टीने या मंदिराची रचना करण्यात आली आहे.
आता अनेक नव्या वास्तू मंदिर परिसरात तयार झाल्या आहेत. त्यामुळे हे मंदिर आणखीच दुर्लक्षित झाले आहे. पण मठ आणि मंदिर एक असणारे त्रिशुंड गणपती मंदिर महाराष्ट्रातले एकमेव मंदीर आहे, यात शंका नाही.
किर्ती मोहरील
aplemarathijagat- Member
- Posts : 47
Join date : 15/05/2012
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin