नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले अलंगगड

Go down

किल्ले अलंगगड Empty किल्ले अलंगगड

लिखाण  Admin Sat May 19, 2012 10:15 pm

किल्ले अलंगगड 8442_MahaS

सह्याद्रीच्या उपरांगामधील कळसूबाईची उपरांग ही नैसर्गिक रित्या अतिशय बेलाग आहे. या रांगेतील किल्ले बलदंड असून त्यांना निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला आहे. या रांगेमधे आड, औढा, पट्टा, बितन, अलंग, मदन, आणि कुलंग असे एका चढ एक किल्ले आहेत.

प्रवरा नदीच्या खो-यात आहे किल्ले अलंगगड. किल्लेप्रेमीचे आकर्षण ठरलेले अलंग, कुलंग आणि मदन हे त्रिकुट याच खोप्यात आहे.

येथे कळसूबाई रांग नाशिक आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर उभी आहे. नाशिककडे म्हणजे उत्तर बाजूला इगतपूरी तालूका असून दक्षिणबाजूला अहमदनगर मधील अकोले तालुका आहे.

अकोले तालुक्यामधील भंडारदराचे धरण प्रसिध्द आहे. रंधा धबधबा, भंडारदरा तसेच अमृतेश्वर मंदिर पहाण्यासाठी शेकडो पर्यटक या परिसरामध्ये भेट देत असतात. यामधील मोजकेच पर्यटक या भागातील दुर्गम किल्ल्यांना भेटी देतात.

भंडारदरा धरणाच्या जलाशयाच्या मागे म्हणजे पश्चिमेला घाटघर नावाचे लहानसे गाव आहे. या गावापर्यंत गाडीरस्ता गेलेला आहे. घाटघर हे गाव अलंगगडाच्या पायथ्याशी वसलेले आहे. .

तीन चारशे मिटर उंचीचे कातळमाथे असणारे अलंग, कुलंग आणि मदनगडाचे दर्शन उरात धडकी भरवणारे आहेत. हा प्रदेश दुर्गम आहे. त्यामुळे घाटघर मधून वाटाड्या घेणे सोईस्कर ठरते. तसेच सोबतच्या पाणपिशव्याही भरुन घ्याव्या लागतात.

घाटघरपासून तीनएक कि.मी चालत गेल्यावर आपण अलंगगडावरून उतरणार्‍या एका दांडाजवळ पोहोचतो. तिव्र चढाच्या या दांडावरुन अलंगगडाच्या पश्चिम अंगाच्या पदरामधे पोहोचेपर्यंत चांगलीच दमछाक होते. या पदरात जंगल आहे. येथे झाडीबरोबर झुडुपेही खूप आहेत.

झाडीच्या पट्टयामागे अलंगचा कातळमाथा दिसतो. या कातळमाथ्याला एक लहानसा सुळका आहे. त्याला लिंगी म्हणतात. अलंगच्या कातळमाथ्यावरुन पावसाळ्यात पाण्याचे ओहोळ खाली वहातात त्याच्या खुणा दिसतात. लिंगीपासून डावीकडे तिसर्‍या ओहोळा जवळ गडावर जाणारा मार्ग आहे. झाडीत शिरुन तिसर्‍या ओहोळाच्या पायथ्याशी पोहोचावे लागते. येथून कातळ चढून आपण अलंगच्या कड्याला भिडतो. येथे असलेल्या काही पायर्‍या तुटल्यामुळे हा भाग काहीसा अवघड झालेला आहे. येथे दोराचा वापर आवश्यक आहे. बुजलेल्या दरवाजाच्या बाजूने आपण गडप्रवेश करतो. येथून किल्ल्याच्या उत्तर बाजूला चालत जावे लागते. हा मार्ग कातळ कड्याच्या मध्यातून जात असल्यामुळे डावीकडे दरी आणि उजवीकडे कातळमाथा असतो. एक कि.मी पेक्षा जास्त आडवे चालत (ट्रल्हर्सी) गेल्यावर अलंगच्या मधल्या पठारावर पोहोचतो. या पठारावर आल्यावर आपल्याला काहीश्या उंचीवर कोरीव गुहा दिसते. ही गुहा उत्तम आहे. मुक्कामा योग्य आहे.

गुहेपासून जवळच माथ्यावर जाणारा मार्ग आहे. येथून वर चढल्यावर पाण्याच्या टाक्यांचा समुह आहे. हे पाणी पिण्यायोग्य आहे. अलंगगड चारही बाजूने कड्यानी वेढलेला असल्यामुळे शत्रु कोठुनही गडावर येवू शकत नाही. त्यामुळे तटबंदीची आवश्यकताच नव्हती.

अलंगगडावरून भंडारदरा जलाशय, रतनगड, कात्राबाई, आजोबा, हरिश्चंद्रगड, पासरगड, भैरवगड तसेच कुलंग पासून सुरु होणारी कळसूबाई रांग उत्तमपैकी दिसते. कोकणामधील ठाणे तसेच स्वच्छ हवामानात रायगड जिल्ह्यामधील भूप्रदेशही येथून दिसतो.

गडावरील काही भग्नावशेष पाहून आपण पुन्हा खालच्या पठारावर येतो. या पठाराच्यावर लहानशी टेकडी आहे. या टेकडीच्या येथूनच खाली उतरणारी एक वाट आहे. अर्थात प्रस्तर रोहणाचे पुर्ण साहित्य असल्याशिवाय येथून उतरणे अवघड आहे. पठारावरून मदनगड आणि कुलंग चे अप्रतिम दर्शन होते. सह्याद्रीच्या या रौद्रभिषण रुपाचे दर्शन घेवून आपण परतीच्या मार्गाला लागतो.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही