Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
वारीचा मारूती
वारीचा मारूती
आपल्याकडे प्रत्येक गावात मग ते अगदी दहा-बारा उंबर्यांचे असले तरी मारूतीचं एक तरी मंदिर असतंच, या मंदिरांपैकी कित्येक मंदिरं रामदास स्वामी आणि त्यांच्या शिष्यांनी स्थापल्याचं सांगितलं जातं. बलोपासनेचं महत्त्व ही मंदिरं मराठी माणसाला सांगत आली आहेत. अशाच एका मंदिरांपैकी एक मंदिर आहे वारीच्या मारुतीचे.
वारी हे गाव अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात आहे. तेल्हार्यापासून अवघ्या २० किमी. अंतरावर हा वारीचा मारुती वसला आहे. एक अत्यंत निसर्गसुंदर ठिकाण असंच याचं वर्णन करावं लागेल. गजबजाटापासून दूर अगदी शांत ठिकाणी हे मंदिर आहे.
मंदिरात जाण्यासाठी ५०-६० पायर्या खाली उतरावं लागतं. सभोवार पसरलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांनी हे ठिकाण एखाद्या द्रोणात ठेवल्यासारखं दिसतं.
पर्वतराजीमधून झुळझूळ वाहणारी वान नदी, अवखळपणे मोठाल्या खडकांवरून उडी मारत असल्याने मधूनच निर्माण होणारे छोट छोटे धबधबे हे सारं बघितलं की प्रवासाचा शिण कुठल्या कुठे पळून जातो. इथे हात पाय धुऊन फ्रेश झालं की पुन्हा २०-२२ पायर्या वर चढून आपण मारुतीच्या मंदिरात पोहचतो.
मंदिर म्हणावे अशी वास्तु नाही, एखाद्या गुफेसारखे हे ठिकाण भासते. आत गाभार्यामध्ये १२ ते १५ फुट उंच मारुतीची मूर्ती आहे. भिमरुपी महारुद्रा ... हे आपण जे म्हणतो त्याचा नेमका अर्थ या मारुतीचे दर्शन घेतलं की येतो. मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगितलं जातं. मंदिराच्या बाजूला पडवीसारखे किंवा व्हरांड्यासारखे दगडी बांधकाम केलेले आढळते. ही धर्मशाळा राजे भोसल्यांनी बांधल्याचे कळते.
मंदिराच्या पायथ्याशी थोडं पुढे गेलं की एक डोह आहे. तो मामा-भाच्याचा डोह म्हणून प्रसिद्ध आहे. खूप खोल असल्यामुळे तिकडे चुकूनही न जाण्याचा सल्ला गावकरी आधीच देतात. नदीमध्ये एका ठिकाणी मोठा खडक आहे. त्याठिकाणी कुंतीनं हळदीकुंकू केलं होतं, अशी दंतकथा गावकरी सांगतात.
मंदिराच्या वरच्या अंगाला वान नदीवर एक धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला वारीच्या मारुतीवरुन हनुमानसागर प्रकल्प असं नाव देण्यात आलं आहे. या पाणी योजनेतून जवळपासच्या ८५ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो.
ह्या मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे दिवाळीनंतर. नदीला पाणी असतंच पण खडकांवरचं शेवाळ बरंच कमी झालं असतं त्यामुळे नदी मनसोक्त हुंदडायचा अनुभव घेता येतो. फारसे प्रसिद्ध नसले तरी पर्यटक म्हणूनही एकादा वारीच्या मारुतीला जावेच.
वारी हे गाव अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यात आहे. तेल्हार्यापासून अवघ्या २० किमी. अंतरावर हा वारीचा मारुती वसला आहे. एक अत्यंत निसर्गसुंदर ठिकाण असंच याचं वर्णन करावं लागेल. गजबजाटापासून दूर अगदी शांत ठिकाणी हे मंदिर आहे.
मंदिरात जाण्यासाठी ५०-६० पायर्या खाली उतरावं लागतं. सभोवार पसरलेल्या सातपुड्याच्या पर्वतरांगांनी हे ठिकाण एखाद्या द्रोणात ठेवल्यासारखं दिसतं.
पर्वतराजीमधून झुळझूळ वाहणारी वान नदी, अवखळपणे मोठाल्या खडकांवरून उडी मारत असल्याने मधूनच निर्माण होणारे छोट छोटे धबधबे हे सारं बघितलं की प्रवासाचा शिण कुठल्या कुठे पळून जातो. इथे हात पाय धुऊन फ्रेश झालं की पुन्हा २०-२२ पायर्या वर चढून आपण मारुतीच्या मंदिरात पोहचतो.
मंदिर म्हणावे अशी वास्तु नाही, एखाद्या गुफेसारखे हे ठिकाण भासते. आत गाभार्यामध्ये १२ ते १५ फुट उंच मारुतीची मूर्ती आहे. भिमरुपी महारुद्रा ... हे आपण जे म्हणतो त्याचा नेमका अर्थ या मारुतीचे दर्शन घेतलं की येतो. मारुतीची स्थापना रामदास स्वामींनी केल्याचे सांगितलं जातं. मंदिराच्या बाजूला पडवीसारखे किंवा व्हरांड्यासारखे दगडी बांधकाम केलेले आढळते. ही धर्मशाळा राजे भोसल्यांनी बांधल्याचे कळते.
मंदिराच्या पायथ्याशी थोडं पुढे गेलं की एक डोह आहे. तो मामा-भाच्याचा डोह म्हणून प्रसिद्ध आहे. खूप खोल असल्यामुळे तिकडे चुकूनही न जाण्याचा सल्ला गावकरी आधीच देतात. नदीमध्ये एका ठिकाणी मोठा खडक आहे. त्याठिकाणी कुंतीनं हळदीकुंकू केलं होतं, अशी दंतकथा गावकरी सांगतात.
मंदिराच्या वरच्या अंगाला वान नदीवर एक धरण बांधण्यात आले आहे. या धरणाला वारीच्या मारुतीवरुन हनुमानसागर प्रकल्प असं नाव देण्यात आलं आहे. या पाणी योजनेतून जवळपासच्या ८५ खेड्यांना पाणीपुरवठा केला जातो.
ह्या मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे दिवाळीनंतर. नदीला पाणी असतंच पण खडकांवरचं शेवाळ बरंच कमी झालं असतं त्यामुळे नदी मनसोक्त हुंदडायचा अनुभव घेता येतो. फारसे प्रसिद्ध नसले तरी पर्यटक म्हणूनही एकादा वारीच्या मारुतीला जावेच.
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin