Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
किल्ले अवचित गड
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
किल्ले अवचित गड
रायगड जिल्ह्यामध्ये रोहे तालुका आहे. रोहे हे तालुक्याचे गाव असून कुंडलिका नदीच्या तीरावर बसलेले आहे. रोहे हे मुंबई-पणजी महामार्गाच्या पश्चिमेला असून पुणे मुंबईशी गाडीमार्गाने जोडलेले आहे. मुंबई -पणजी मार्गावरील नागोठणे अथवा कोलाड येथून रोहे येथे जाता येते.
नागोठणे कडे जाणार्या गाडीरस्त्यावर साधारण ५ कि.मी. अंतरावर पिंगळसई गाव आहे तसचे ६ कि.मी. अंतरावर मेढा गाव असून ही दोन्ही गावे अवचितगड किल्ल्याच्या पायथ्याला वसलेली आहेत.
रोहे येथून अथवा नागोठणे येथून खाजगी वाहनातूनही पिंगळसई अथवा मेढापर्यंत पोहोचता येते. मेढा येथून गडावर जाणारी पायवाट ही चांगली रुळलेली आहे. या वाटेने तासाभरात आपण गडावर पोहोचू शकतो. स.स. पासून ३९४ मी. उंच असलेला अवचितगड पूर्वेकडून डोंगराशी जोडलेला आहे तसेच पश्चिमेकडे याचे कडे असल्यामुळे तिकडून तो अभेद्य पूर्व बाजूनेच गडावर पोहोचतात.
अवचितगडाचा किल्ला हा शिलाहारांच्या काळात लष्करी ठाणे म्हणून बांधला गेला असावा असे दिसते. पुढे निजामशाहीच्या राजवटीमध्ये हे सुभ्याचे ठिकाण म्हणून वापरले गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी अवचितपणे येवून हा किल्ला ताब्यात घेतला. म्हणून याला अवचितगड असे नाव मिळाले असे म्हणतात. पण याचे पूर्वीचे नाव काय होते ते मात्र कळत नाही. मोसे खोर्यातील बाजी पासलकर यांचा संबंध या किल्ल्याशी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला ताब्यात आल्यावर याची लष्करीदृष्ट्या पुर्नबांधणी केली. इंग्रजांबरोबर झालेल्या मराठ्यांच्या युद्धामध्ये कर्नल प्रॉथर याने याने हा किल्ला इ. स. १८१८ मध्ये जिंकून घेतला.
लांबुळक्या आकाराचा अवचितगड तटबंदी आणि बुरुजांनी परिवेष्टीत आहे. या भक्कम तटबंदीच्या आत पाण्याच्या टाक्यांचा समुह असून, एक उत्तम बांधणीचा तलाव आहे. गडावर पासलकरांची घुमटी आहे. गडावर महादेव मंदिर, दिपमाळ, गणपती, पार्वती, विष्णू यांच्या स्थानांबरोबर दक्षिणेकडील बुरुजावर शिलालेख ही पहायला मिळतो.
गडाच्या माथ्यावरुन कुंडलिका खोर्याचे तसेच कोकण रेल्वेचे दृष्य उत्तम दिसते. सूरगडाचेही दर्शन होते. अवचितगडावरुन पिंगळसईच्या मार्गाने उतरुन गावातील गणेश मंदिर पाहून रोहेकडे जाता येते.
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin