Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
कोकणी गडसौंदर्य
:: भटकंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
कोकणी गडसौंदर्य
हणेर् किनारपट्टीवरील कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड म्हणजे अस्तित्वासाठी लढत असणारे गडकिल्ले. इतिहासाची साक्ष पटवणाऱ्या या गडांना भेट द्यायलाच हवी.
महाराष्ट्राला लाभलेल्या लोभस किनारपट्टीचा मोह परकियांनाही आवरता आलेला नाही. मुघल, पोर्तुगीज, डच इंग्रज असे एकेकशत्रू सागरी मार्गाने भारतामध्ये घुसले. याच किनारपट्टीच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी पश्चिम तटावर जलदुर्गांची साखळीच उभी केली. आज या साखळीतले अनेक गडकिल्ले ढासळले आहेत, तर काही अस्तित्वासाठी लढत आहेत. यातलेच काही म्हणजे हणेर् किनारपट्टीवरील कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड.
मंुबई-गोवा महामार्गावरील खेड आणि पुढे दापोलीमागेर् हणेर् गावात दाखल व्हायचं. खेड-दापोली आणि दापोली-हणेर् या प्रवासासठी बससेवा आणि खाजगी वाहनं उपलब्ध आहेत. हणेर् बस स्थानकावरून किनारपट्टीवर यायला साधारण १५-२० मिनिटं लागतात. उजव्या हाताला असलेला गोवागड सोडून सध्या फत्तेगडावर असलेली कोळी बांधवांची वस्ती मागे टाकून धक्क्याच्या दिशेने निघायचं. दोन्ही बाजूला समुद आणि समुदात घुसलेल्या सोंडेवर कनकदुर्ग वसलेला आहे. डाव्या हाताला सागरात डौलात पताका फडकवत असलेल्या होड्या आपल्याला खुणावत असतात. या धक्क्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत.
कनकदुर्गच्या पश्चिम दिशेला नाममात्र तटबंदी पाहायला मिळते. गडावर खोदलेले पाण्याचे टाके आहेत, पण ते बुजल्याने त्यात पाणी नाही. तर गडावर असलेला दीपगृह लक्षवेधक आहे. या दीपगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घरं या किल्ल्यावर आहेत. गडावरून संपूर्ण सागर किनारपट्टीची टेहाळणी करता येते. या गडाची बांधणी केव्हा झाली याची इतिहासात नोंद नाही. पण, १७१० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी यांची बांधणी केली असा कयास आहे.
आल्या वाटेने थोडं मागे आलं, की किनारपट्टीवर डाव्या हाताला कोळी लोकांची वस्ती दिसते. इथेच होता फत्तेगड. सध्या कोणत्याही प्रकारचे अवशेष इथे शिल्लक नसल्याने पाहण्यासारखं काहीच नाही. इथून थोडे पुढे गेलं, की डाव्या हाताला गोवा गडाची प्रशस्त तटबंदी दिसते. इथेच रस्त्यालगत किल्ल्याच्या द्वारावर लोखंडी गेट आहे. सध्या हा किल्ला मंुबईच्या खाजगी हॉटेल चालकाला दिलेला असल्याने इथे चौकीदार असतो. किल्ला पाहायला कोणतंही बंधन नसलं, तरी भविष्यात या तटबंदीच्या आवारात हॉटेलचं वातावरण दिसू शकतं. सध्या असणारं प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार नाही. समुदालगत खाली उतरून गडाच्या उत्तर दिशेला आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतं. हे प्रशस्त द्वार जाम्याच्या दगडांनी बनवेलं आहे. इथेच छोटेखानी हनुमंताचं मंदीर आहे, तर दरवाजाच्या चौथऱ्यावर तळाशी चार हत्तींचं वैशिष्ट्यपूर्ण शिल्प पाहायला मिळतं. आजही बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या आपली वाट पाहत असलेल्या दिसतात.
बालेकिल्ल्यावरून गडावर असलेले वाड्यांचे ढासळलेले चौथारे नजरेस येतात. काळ्या पाषाणात बांधकाम केलेली विहिरही आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर होत नसल्याने सध्या हे पाणी पिण्याजोगं नाही. गोवा गडावरून दिसणारा सुवर्णदुर्गचा परिसर अतिशय लोभस दिसतो. खडकांवरती आपटणाऱ्या फेसाळ लाटा जणू आपल्याला इतिहासाच्या या साक्षीदारांची आठवण करून देत असतात.
इ.स. १७५५ मध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्या झालेल्या तहानुसार सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर सुवर्णदुर्गाबरोबर गोवा किल्लाही पेशव्यांच्या स्वाधीन केला. तर १८६२ च्या पाहणीनुसार या गडावर ६९ तोफा आणि १९ शिपाई गडाची व्यवस्था पाहण्यास होते, याची नोंद मिळते. दुर्गप्रेमींबरोबर सामान्य पर्यटकांनाही हा किल्ला सहज पाहता येतो, तर याच्या निर्सगरम्य आणि ऐतिहासिक वातावरणात मन रमून जातं. महाराष्ट्राला लाभलेल्या या नैसगिर्क आणि ऐतिहासिक ठिकाणाला आवर्जुन भेट द्यावी, असंच हे ठिकाण आहे.
- श्रीपाद भोसले
महाराष्ट्राला लाभलेल्या लोभस किनारपट्टीचा मोह परकियांनाही आवरता आलेला नाही. मुघल, पोर्तुगीज, डच इंग्रज असे एकेकशत्रू सागरी मार्गाने भारतामध्ये घुसले. याच किनारपट्टीच्या संरक्षणासाठी शिवाजी महाराजांनी पश्चिम तटावर जलदुर्गांची साखळीच उभी केली. आज या साखळीतले अनेक गडकिल्ले ढासळले आहेत, तर काही अस्तित्वासाठी लढत आहेत. यातलेच काही म्हणजे हणेर् किनारपट्टीवरील कनकदुर्ग, फत्तेगड आणि गोवागड.
मंुबई-गोवा महामार्गावरील खेड आणि पुढे दापोलीमागेर् हणेर् गावात दाखल व्हायचं. खेड-दापोली आणि दापोली-हणेर् या प्रवासासठी बससेवा आणि खाजगी वाहनं उपलब्ध आहेत. हणेर् बस स्थानकावरून किनारपट्टीवर यायला साधारण १५-२० मिनिटं लागतात. उजव्या हाताला असलेला गोवागड सोडून सध्या फत्तेगडावर असलेली कोळी बांधवांची वस्ती मागे टाकून धक्क्याच्या दिशेने निघायचं. दोन्ही बाजूला समुद आणि समुदात घुसलेल्या सोंडेवर कनकदुर्ग वसलेला आहे. डाव्या हाताला सागरात डौलात पताका फडकवत असलेल्या होड्या आपल्याला खुणावत असतात. या धक्क्याच्या उजव्या हाताला असणाऱ्या टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्या खोदलेल्या आहेत.
कनकदुर्गच्या पश्चिम दिशेला नाममात्र तटबंदी पाहायला मिळते. गडावर खोदलेले पाण्याचे टाके आहेत, पण ते बुजल्याने त्यात पाणी नाही. तर गडावर असलेला दीपगृह लक्षवेधक आहे. या दीपगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घरं या किल्ल्यावर आहेत. गडावरून संपूर्ण सागर किनारपट्टीची टेहाळणी करता येते. या गडाची बांधणी केव्हा झाली याची इतिहासात नोंद नाही. पण, १७१० मध्ये छत्रपती शाहू महाराजांनी यांची बांधणी केली असा कयास आहे.
आल्या वाटेने थोडं मागे आलं, की किनारपट्टीवर डाव्या हाताला कोळी लोकांची वस्ती दिसते. इथेच होता फत्तेगड. सध्या कोणत्याही प्रकारचे अवशेष इथे शिल्लक नसल्याने पाहण्यासारखं काहीच नाही. इथून थोडे पुढे गेलं, की डाव्या हाताला गोवा गडाची प्रशस्त तटबंदी दिसते. इथेच रस्त्यालगत किल्ल्याच्या द्वारावर लोखंडी गेट आहे. सध्या हा किल्ला मंुबईच्या खाजगी हॉटेल चालकाला दिलेला असल्याने इथे चौकीदार असतो. किल्ला पाहायला कोणतंही बंधन नसलं, तरी भविष्यात या तटबंदीच्या आवारात हॉटेलचं वातावरण दिसू शकतं. सध्या असणारं प्रवेशद्वार हे मुख्य प्रवेशद्वार नाही. समुदालगत खाली उतरून गडाच्या उत्तर दिशेला आपल्याला मुख्य प्रवेशद्वार पाहायला मिळतं. हे प्रशस्त द्वार जाम्याच्या दगडांनी बनवेलं आहे. इथेच छोटेखानी हनुमंताचं मंदीर आहे, तर दरवाजाच्या चौथऱ्यावर तळाशी चार हत्तींचं वैशिष्ट्यपूर्ण शिल्प पाहायला मिळतं. आजही बुरुजावर जाणाऱ्या पायऱ्या आपली वाट पाहत असलेल्या दिसतात.
बालेकिल्ल्यावरून गडावर असलेले वाड्यांचे ढासळलेले चौथारे नजरेस येतात. काळ्या पाषाणात बांधकाम केलेली विहिरही आहे. या विहिरीच्या पाण्याचा वापर होत नसल्याने सध्या हे पाणी पिण्याजोगं नाही. गोवा गडावरून दिसणारा सुवर्णदुर्गचा परिसर अतिशय लोभस दिसतो. खडकांवरती आपटणाऱ्या फेसाळ लाटा जणू आपल्याला इतिहासाच्या या साक्षीदारांची आठवण करून देत असतात.
इ.स. १७५५ मध्ये इंग्रज आणि पेशवे यांच्या झालेल्या तहानुसार सुवर्णदुर्ग जिंकल्यानंतर सुवर्णदुर्गाबरोबर गोवा किल्लाही पेशव्यांच्या स्वाधीन केला. तर १८६२ च्या पाहणीनुसार या गडावर ६९ तोफा आणि १९ शिपाई गडाची व्यवस्था पाहण्यास होते, याची नोंद मिळते. दुर्गप्रेमींबरोबर सामान्य पर्यटकांनाही हा किल्ला सहज पाहता येतो, तर याच्या निर्सगरम्य आणि ऐतिहासिक वातावरणात मन रमून जातं. महाराष्ट्राला लाभलेल्या या नैसगिर्क आणि ऐतिहासिक ठिकाणाला आवर्जुन भेट द्यावी, असंच हे ठिकाण आहे.
- श्रीपाद भोसले
mansijoshi- Newbie
- Posts : 10
Join date : 13/05/2012
:: भटकंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin