Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
किल्ले सोनगीर
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
किल्ले सोनगीर
सोनगीर किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये आहे. मध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सोनगीर किल्ला धुळ्याच्या उत्तरेला २० कि.मी. अंतरावर आहे. धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सूरत या महामार्गावर वसलेले आहे. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक ३ म्हणूनही ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच सोनगीरचा किल्ला आहे.
सोनगीर किल्ल्याला जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बसेस मिळतात. धुळे-शिरपूर, धुळे- नरडाणा अशा जाणार्या बसेस येथे थांबतात. सोनगीर येथून नंदूरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरुन एक कि.मी. चालत जावून आपण सोनगीर गाठू शकतो.
सोनगीर गावात आपण पायउतार होवून गावातील विठ्ठल-रुक्मीनी मंदिराजवळ पाच मिनिटांमध्ये पोहोचतो. या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ बेवारस पडलेली आहे. मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी रथ ठेवलेला आहे. या लाकडी रथाचे नक्षीकाम पाहून आपण किल्ल्याकडे निघतो. किल्ल्याच्या पूर्व पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. समोरच्या घरांच्या रांगांमध्ये मधून मधून मागे जाण्यासाठी बोळ ठेवलेल्या आहेत. त्यातील एखाद्या बोळातून घरांच्या मागच्या बाजूला आपल्याला पोहोचावे लागते. किल्ल्याचा पुर्वउतार या घरांपर्यंत येवून पोहोचलेला आहे. हा परिसर अतिशय अस्वच्छ असल्यामुळे आपण चटकन डोंगरावर चढणे महत्त्वाचे आहे. आठ-दहा मीटर चढल्यावर आपल्याला किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर सोनगीर किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पुर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरुन खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेवून ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत.
दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणार्या कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. पायर्यांच्या सुरवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. येथून पंधरा-वीस पायर्या चढून आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
सोनगीर किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंच आहे. पायथ्यापासून आपण २० मिनिटांमध्ये माथा गाठू शकतो. सोनगीरचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने जास्त आहे. माथ्यावरील पठारावर आज उल्लेखनीय एकही वास्तू नाही. इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली होती. त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे.
सोनगीरचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची तटबंदी रचिव दगडाची आहे. ती तटबंदीही मधून मधून खाली ढासळलेली आहे. उत्तरेकडील तटबंदीवर असलेल्या बुरुजांचे तुरळक अवशेष आपल्याला पहायला मिळतात. जमिनीखाली हौदासारखी वास्तू बांधून त्यामध्ये तेल व तुप साठवित असल्याचे दिसते. या जागांना तेल टाके, तुप टाके असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे पण खोल असे टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरु नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देवून सुरक्षीत केलेले आहे. या विहीरीतून खाली गावातही पाणी पुरवठा होत असे.
या विहीरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रु. खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे.
अतिशय मोक्याच्या जागी असलेला सोनगीर किल्ला कोणी नेमका बांधला याची इतिहासात नोंद नाही. इ.स. १३७० मध्ये हिंदू सरदाराकडून हा किल्ला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुखी सुलतानांनी त्यावर आपली पकड कायम ठेवली. पुढे मोगल बादशहा अकबराने आपली सत्ता खानदेशात प्रस्थापीत केल्यावर सोनगीर त्यांच्या ताब्यात गेला. औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला.
इतिहासातील अनेक राजवटीचा आणि घटनांचा साक्षीदार असलेला सोनगीरचा किल्ला आज मात्र उपेक्षीत ठरला आहे. सोनगीरच्या गतकालाची स्मृती घोळवीतच आपण किल्ला उतरायला सुरवात करतो.
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin