नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


किल्ले वारूगड

Go down

किल्ले वारूगड        Empty किल्ले वारूगड

लिखाण  Admin Sun May 20, 2012 12:51 am

किल्ले वारूगड        5701_Mahas
सातारा जिल्ह्यातील फलटण आणि माण तालुक्याच्या सीमारेषेवरून सह्याद्रीची महादेव रांग धावते. या पूर्व-पश्चिम धावणार्‍या रांगेतच ठाण मांडून वारूगड आपली मान उंचावून बसलेला आहे.

भणाणनार्‍या वार्‍याशीच हितगुज करणार्‍या वारूगड वारूवरच स्वार झालेला आहे. फलटण तालुक्याच्या सखल भागाच्या दक्षिण अंगाने ही रांग जाते.

वारूगडाला जाण्यासाठी दोन तीन मार्ग आहेत. एक मार्ग फलटण-मोगराळे-तोंडल वारूगड असा आहे. एक मार्ग दहिवडी-मलवडी-तोंडल-वारूगड असाही आहे. हे दोन्ही अतिशय कच्चे आहेत. या वरून एस.टी.ची बस धावते म्हणून याला गाडीमार्ग म्हणायचा एवढेच.

वारूगडाला जाण्यासाठी सोयीचा मार्ग म्हणजे फलटण-गिरवी-चव्हाणवाडी असा आहे. या मार्गावरही एस.टी.ची सोय आहे. अन्यथा गिरवी पर्यंत येऊन तेथून चार कि.मी. चालत वारूगडाचा पायथा गाठता येतो.

वारूगडाच्या पायथ्यापासून दीड तासात चढाई करून आपण वारूगडाच्या दरवाजामध्ये पोहोचतो. गोमुखी बांधणीच्या दरवाजाच्या कमानी पडलेल्या असून बाहेरील बुरूज मात्र शाबूत आहेत. या माचीच्या पूर्वेकडील कड्याला सलग तटबंदी बांधून हा भाग संरक्षीत केलेला आहे. या माचीच्या वरच्या भागात वारूगडाचा छोटासा पण आकर्षक दिसणारा बालेकिल्ला आहे. या बालेकिल्ल्याच्या तटबंदीपासून खालच्या माचीपर्यंत एक भिंत बांधून काढलेले आहे. या भिंतीमुळे दोन भाग झालेले आहेत.

भिंतीच्या पलिकडे उंच झाडांमध्ये पाण्याचे टाके आहे. हे टाके नव्यानेच उत्तमपैकी बांधून काढले असून खाली उतरण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहे. याच्या पलिकडे छोटेसे मंदिर आहे. मंदिरामध्ये तांदळा असून दारात नंदी, नागराज इत्यादी शिल्पे पडलेली आहे.

वारूगडाच्या बालेकिल्ल्यावर जाणारी वाट नेमकी कशी होती, हे मात्र कळायला आज काही मार्ग नाही. बालेकिल्ल्यावरून जी भिंत खालपर्यंत बांधलेली आहे, ती ही जमिनदोस्त होत चालली आहे. त्या भिंतीवरूनच एक पायवाट बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी रूळलेली आहे. या वाटेने आपण दहा मिनिटांमध्ये वर पोहोचतो. तटाच्या खाली नष्ट झालेला दरवाजा आहे. तेथपर्यंत आपण भिंतीवरून येऊ शकतो. म्हणजे पूर्वी या भिंतीच्या कडेनेच वर चढण्याचा मार्ग असावा. म्हणूनच येथे दरवाजा बांधलेला दिसतो. भिंतीच्या अवशेषाखाली हा मार्ग बुजला असल्याचे लक्षात येते. येथून पाच मिनिटात आपण गडाच्या नष्ट झालेल्या दारात पोहोचतो. दोन्ही बुरूजांना तडे गेलेले आहेत. अतिशय छोटासा परिसर माथ्यावर आहे. चारही बाजुला कडे असल्यामुळे सावधगिरीने हिंडावे लागते. माथ्यावर जुन्या मंदिराचे अवशेष, काळकोठडी, खोल अशी पाणी नसलेली विहीर आहे. एक मोठ्या आकारचे धान्य दळायचे दगडी 'जाते' ही पडलेले आहे. तटबंदीमध्ये एक शौचकुपही आपल्याला दिसतो. माथ्यावरून ताथवडा किल्ला दिसतो. स्वच्छ वातावरण असल्यास येथून पुरंदर आणि वज्रगड ही किल्ल्याची जोडगोळीही दिसते. महादेव रांगेतील शिखर शिंगणापूरचे मंदिर आपले लक्ष वेधून घेते. लोणंद-बारामती-फलटण ते नातेपुते इतका विस्तृत प्रदेश दिसतो. दिवसापेक्षा रात्री येथून दिसणारा नजारा काही औरच आहे. गावोगावच्या दिसणार्‍या दिव्यांचे पुंजके पाहून गावे ओळखण्याची गंमत वारूगडाव्यतिरिक्त इतरत्र मिळणे मुश्किलच.

आल्यामार्गाने पुन्ही भिंतीवरून उतरून आपण खालच्या माचीत येतो. माचीच्या पूर्व भागात आता नव्याने जिर्णोद्धार केलेले मंदिर आहे. अतिशय कलात्मक दृष्टी ठेवून मंदिराचे रंगकाम केले आहे. हे भैरवनाथाचे मंदिर असून भाविक परिसरामधून येत असतात. पार पुण्या -मुंबईपासून अनेकांची वारी येथे असते. परळ (मुंबई) हूनही येथे मंदिरापर्यंत एस.टी. बस मुक्कामी येते.

येथे मुक्कामाची तसेच जेवणाची उत्तम सोय होऊ शकते. येथे मुक्काम केल्यास सकाळी एस.टी.ने अथवा पुन्हा डोंगर उतरून गिरवी मार्गे फलटण गाठता येते.

डोंगर भटक्यांसाठी अजून एक स्थळ येथून चालत जाण्यासारखे आहे. बाजूच्या डोंगरावर चढून श्रीपलवण गाव गाठायचे. तेथून खाली उतरून सीतामाईचा दरा हे निसर्गरम्य ठिकाण पहाता येईल. अर्थात त्यासाठी तीन साडेतीन तासांची पयपिट आवश्यक आहे.
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही