Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे :: 1 Botएकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
किल्ले थाळनेर
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
किल्ले थाळनेर
धुळे जिल्हा हा खानदेशातील एक जिल्हा आहे. धुळे जिल्ह्यातील थाळनेरचा किल्ला हा इतिहासप्रसिद्ध किल्ला असून तो धुळ्याच्या ईशान्य दिशेला आहे. तापी नदीच्या काठावर वसलेल्या थाळनेर गावालगतच थाळनेरचा किल्ला आहे.
धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर थाळनेर किल्ला असून धुळ्यापासून थाळनेरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची नियमित सेवा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरकडून तसेच जळगांव जिल्ह्यातील चोपडा या गावांकडूनही आपण थाळनेर येथे पोहोचू शकतो.
थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.
थाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकरवान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. ता काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात पोहोचला असताना त्याला एक कुत्रा एका सश्याच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की 'ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीतपणे शौर्याची भूमी असली पाहीजे.' या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान घराण्याची सत्ता होती. फिरोजशहा तुघलग हा त्यावेळी सुलतान होता.
या सुलतानाकडून मलिकखान याने थाळनेर व करवंद हे परगणे जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली. इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करुन थाळनेर येथे किल्ला बांधला.
तापी नदीच्या काठावर असलेल्या एका लहानश्या टेकडीवजा जागेवर साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधण्यात आला. तटबंदी आणि भक्कम बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला. एक बाजूने तापीनदी असल्याने ती बाजू अतिशय संरक्षित झाली होती. किल्ल्यामध्ये येण्याचा एक मार्ग असल्यामुळे त्याबाजूला दरवाजा बांधलेला होता. तो आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तापी नदीचे पाणी किल्ल्याच्या पायथ्याला धडकून ते पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्यामुळे या बाजूची संपुर्ण तटबंदी ढासळली आहे. किल्ल्यामध्ये झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे जपूनच फिरावे लागते. एकेकाळी अत्यंत समृद्ध आणि बलदंड असलेला थाळनेरचा किल्ला आज मात्र दुर्लक्षीत झाल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर येवून पोहोचला आहे.
थाळनेरच्या किल्ल्यावर सुरवातीला फारुखी घराण्याची सत्ता होती. इ.स.१६०० मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशहा फारुखी याचा पराभव करुन थाळनेरवर कब्जा मिळवला.
मोगलांकडुन हा किल्ला पुढे मराठ्यांच्या ताब्यात आला. निंबाळकरांच्या कडून थाळनेर हा होळकरांकडे गेला. थॉमस हिस्लॉप याने इ.स. १८१८ मध्ये तो इंग्रजी अंमलाखाली आणला. पण इंंग्रजांना मात्र प्रखर झुंज द्यावी लागली. यात मराठ्यांचे २५ ते ३० लोक ठार झाले. इंग्रजांचे २५ लोक मारले गेले यात त्यांचे सात अधिकारीही कामी आले.
पराक्रमाची गाथा उराशी कवटाळणारा थाळनेरचा किल्ला आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. मग आपण केव्हा जाणार आहात?
धुळ्यापासून साधारण ५० कि.मी. अंतरावर थाळनेर किल्ला असून धुळ्यापासून थाळनेरला जाण्यासाठी एस.टी. बसेसची नियमित सेवा उपलब्ध आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूरकडून तसेच जळगांव जिल्ह्यातील चोपडा या गावांकडूनही आपण थाळनेर येथे पोहोचू शकतो.
थाळनेर म्हणजे थळ + निर या शब्दांची संधी आहे. थळ म्हणजे जमीन आणि निर म्हणजे पाणी. जेथे समृद्ध जमीन आहे आणि मुबलक पाणी आहे असे थाळनेर.
थाळनेर बद्दल एक दंतकथाही प्रसिद्ध आहे. मलिकरवान हा लष्करी सेवेतील एक सैनिक होता. ता काही कारणाने या परिसरामध्ये आला असताना त्याने येथे एक विचित्र दृष्य पाहील. तो गावात पोहोचला असताना त्याला एक कुत्रा एका सश्याच्या मागे धावताना दिसला. कुत्रा सशाचा पाठलाग करीत असताना पुढे धावणारा ससा अचानक थांबला आणि त्याने कुत्र्यावर आक्रमण केले. सशाच्या या पावित्र्याने कुत्रा माघारी पळू लागला आणि ससा त्याचा पाठलाग करु लागला. असे अनोखे दृष्य पाहून मलिकखान एकदम चकीत झाला. त्याने विचार केला की 'ज्या भूमीमध्ये ससा कुत्र्याला पळवू शकतो ती भूमी निश्चीतपणे शौर्याची भूमी असली पाहीजे.' या भूमीमध्ये जर आपण वास्तव्य केले तर निश्चितच आपल्या हातून पराक्रम घडेल व आपल्याला उर्जितावस्था प्राप्त होईल. म्हणून मलिकखान याने तेथील वतनदाराला ही घटना सांगून तेथे रहाण्याची परवानगी मागितली. वतनदाराने या गोष्टीला नकार दिला. मलिकखान तडक दिल्लीला गेला. दिल्लीमध्ये त्यावेळी सुलतान घराण्याची सत्ता होती. फिरोजशहा तुघलग हा त्यावेळी सुलतान होता.
या सुलतानाकडून मलिकखान याने थाळनेर व करवंद हे परगणे जहागीर म्हणून मिळवले आणि तो थाळनेरला परतला. थाळनेर ताब्यात घेवून त्याने फारुखी घराण्याची सत्ता तेथे स्थापित केली. इ.स. १३७० मध्ये त्याने सत्ता स्थापन करुन थाळनेर येथे किल्ला बांधला.
तापी नदीच्या काठावर असलेल्या एका लहानश्या टेकडीवजा जागेवर साधारण त्रिकोणी आकाराचा किल्ला बांधण्यात आला. तटबंदी आणि भक्कम बुरुज बांधून हा किल्ला अभेद्य करण्यात आला. एक बाजूने तापीनदी असल्याने ती बाजू अतिशय संरक्षित झाली होती. किल्ल्यामध्ये येण्याचा एक मार्ग असल्यामुळे त्याबाजूला दरवाजा बांधलेला होता. तो आता काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. तापी नदीचे पाणी किल्ल्याच्या पायथ्याला धडकून ते पश्चिमेकडे वळण घेते. या पाण्याने संबध टेकडी हळूहळू कापून काढल्यामुळे या बाजूची संपुर्ण तटबंदी ढासळली आहे. किल्ल्यामध्ये झुडुपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. त्यामुळे जपूनच फिरावे लागते. एकेकाळी अत्यंत समृद्ध आणि बलदंड असलेला थाळनेरचा किल्ला आज मात्र दुर्लक्षीत झाल्यामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर येवून पोहोचला आहे.
थाळनेरच्या किल्ल्यावर सुरवातीला फारुखी घराण्याची सत्ता होती. इ.स.१६०० मध्ये मोगल बादशहा अकबर याने बहादूरशहा फारुखी याचा पराभव करुन थाळनेरवर कब्जा मिळवला.
मोगलांकडुन हा किल्ला पुढे मराठ्यांच्या ताब्यात आला. निंबाळकरांच्या कडून थाळनेर हा होळकरांकडे गेला. थॉमस हिस्लॉप याने इ.स. १८१८ मध्ये तो इंग्रजी अंमलाखाली आणला. पण इंंग्रजांना मात्र प्रखर झुंज द्यावी लागली. यात मराठ्यांचे २५ ते ३० लोक ठार झाले. इंग्रजांचे २५ लोक मारले गेले यात त्यांचे सात अधिकारीही कामी आले.
पराक्रमाची गाथा उराशी कवटाळणारा थाळनेरचा किल्ला आपल्या भेटीसाठी उत्सुक आहे. मग आपण केव्हा जाणार आहात?
:: भटकंती :: दुर्ग भ्रमंती
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin