नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद

Join the forum, it's quick and easy

नमस्कार,

१) आपण या समूहाचे सदस्य असल्यास "प्रवेश" ही लिंक वापरा.
२) आपण नविन सदस्य असल्यास "नोंद " ही लिंक वापरुन सदस्य व्हा. सदस्यत्व विनामूल्य आहे.
- धन्यवाद
Would you like to react to this message? Create an account in a few clicks or log in to continue.
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?

Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin

भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …


[ Full reading ]

Comments: 0

अस्सल वासाचं अस्सल चवीचं

Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi

मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …


[ Full reading ]

Comments: 0

चमचमीत आणि आरोग्यदायी

Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi

रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …


[ Full reading ]

Comments: 0

Poll
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 2 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 2 पाहुणे

एकही नाही

[ View the whole list ]


19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
 
 

Display results as :
 


Rechercher Advanced Search

Keywords


स्वराज्याचा श्रीगणेशा -नाथमाधव

Go down

स्वराज्याचा श्रीगणेशा -नाथमाधव Empty स्वराज्याचा श्रीगणेशा -नाथमाधव

लिखाण  Admin Mon May 21, 2012 12:54 pm

स्वराज्याचा श्रीगणेशा -नाथमाधव 5116_MahaS
बालपणात वाचलेल्या अनेक पुस्तकांची मनावर पडलेली भूरळ ही पुढे अनेक दशकं उलटल्यावरही कायम राहावी, हे त्या लेखकाचं यशच म्हणावं लागेल. असे त्या काळात वाचलेले अनेक लेखक आज सांगता येतील. साने गुरुजींपासून थेट भा. रा. भागवत, चिं. वि. जोशी असे अनेक लेखक त्या मांदियाळीत आहेत. पण त्यात अग्रक्रमानं घ्यावं लागेल, असं नाव हे अर्थातच नाथमाधव हे आहे. नाथमाधवांचं संपूर्ण नाव द्वारकानाथ माधवराव चितळे. लेखनासाठी त्यांनी ‘नाथमाधव हे नाव वापरले. आपल्या अवघ्या ४६ वर्षांच्या आयुष्यात नाथमाधवांनी प्रामुख्यानं लिहिल्या त्या कादंबर्‍याच आणि चांगल्या जाडजूड. बालपणीच्या त्या काळात साहजिकच आकर्षण असतं ते अद्भूत रम्यतेचं आणि धाडसाचं. गुप्त खजिना, त्याच्या शोधात निघालेल्या धाडसी तरुणांच्या टोळ्या, त्यांना त्या शोधयात्रेत करावा लागलेला संकंटांचा सामना... भुयारे, चोर दरवाजे, वेषांतरे... यांची लयलूट नाथमाधवांच्या लिखाणात असायची आणि त्यांची मोहिनी आजही कायम आहे. नाथमाधवांनी याच सार्‍या क्लृप्त्यांचा वापर आपल्या लेखनात केला. त्यांनी प्रामुख्याने इतिहास हाच विषय आपल्या लेखनासाठी निवडला असला, तरी 'सोनेरी टोळी'सारखी त्यांची कादंबरीही समाजाच्या त्या काळातील लब्धप्रतिष्ठितांचं बिंग फोडणारी आहे. तर 'वीरधवल' ही त्यांची कादंबरी आपल्याला एका वेगळ्याच अद्भूत अशा विश्वात घेऊन जाणारी आहे. पण आज येथे उल्लेख केलेले पुस्तक हे शिवचरित्र आणि त्यानंतर स्वराज्याच्या स्थापनेसाठी मराठ्यांनी केलेल्या रोमहर्षक अशा संघर्षाची गाथा सांगणारे आहे. नाथमाधवांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य म्हणजे 'स्वराज्या'वरील ही मालिका लिहितानाही त्यानी आपला नेहमीचा बाज तर कायम ठेवलाच शिवाय इतिहासाशीही शक्य तेवढं इमान राखलं. त्यामुळेच आज या कादंबरीमालेचे शतक साजरे होत असतानाही, त्याची लोकप्रियता तितकीच कायम आहे. आपल्या या मालेत नाथमाधवांनी स्वराज्याचा श्रीगणेशा, स्वराज्याची स्थापना, स्वराज्याची घटना, स्वराज्यावरील संकट, स्वराज्याचा कारभार अशा अनेक महाकादंबर्‍या लिहिल्या आणि त्यातून मराठी अस्मितेचं जिवंत चित्रण केलं. त्यातील 'स्वराज्याचा श्रीगणेशा' ही कादंबरी ही बहुधा सर्वात लक्षात राहणारी असावी. शिवाजी महाराजांच्या तरुणपणाचा काळ या कादंबरीत उभा करताना, नाथमाधवांनी आपल्या या कथानायकावर जराही अन्याय होऊ न देता, त्या काळातील सामाजिक काळ आणि त्या काळातील अनेक खर्‍या वा काल्पनिक व्यक्तिरेखा उभ्या करून, इतिहास जिवंत केला आहे. छत्रपतींनी अगदी बालवयात रोहिडेश्वराची शपथ घेऊन, स्वराज्य स्थापनेची मोहीम हाती घेतली, त्या काळात त्यांच्यावर असीम निष्ठा असलेले अनेक तरुण युवक-युवती घराघरांत बघायला मिळत. या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून शिवचरित्राचा महिमा नाथमाधवांनी सांगितला तर आहेच, पण त्याचबरोबर सनावळ्या आणि क्लिष्ट नोंदींमध्ये गुरफटलेला इतिहासही अत्यंत वाचनीय पद्धतीनं शब्दबद्ध केला आहे. प्रस्तुत कादंबरीचा काळ हा १६४२च्या थोडा आधी सुरू होतो. तरुण शिवाजी, समाजातील अन्यायाविरोधात बंड करून कसा उभा राहतो आणि त्या अन्यायाविरुद्धच्या लढाईत सभोवतालच्या आपल्या सवंगड्यांना कसा सामील करून घेतो, याचं अत्यंत ओजस्वी आणि तितकेच हृदयाला हात घालणारं चित्रण नाथमाधवांनी आपल्या सहजसुंदर शैलीत केलं आहे. जिजाई, महाराजांच्या सालस पत्नी सईबाई, दादोजी कोंडदेव, अशा काही प्रमुख व्यक्तिरेखांबरोबरच महाराजांचे जिवाला जीव देऊन लढणारे सवंगडी नेताजी व आबाजी या कादंबरीत भेटतातच. पण या सार्‍यांपासून प्रेरणा घेऊन स्वराज्याच्या ध्येयासाठी कोणत्याही प्रकारच्या संघर्षाला तोंड देण्यासाठी आतुर असलेल्या निर्मला व सुमित्रा या दोन तरुणीही कथानक पुढे नेण्यास आणि त्याचबरोबर कादंबरीविषयीची मोहिनी कायम ठेवण्यास मदत करतात. कादंबरीचा शेवट नाथमाधवांची लेखनशैली आणि त्यांची शिवरायांवरील असीम निष्ठा यांचे द्योतक आहेत. ते लिहितात : या एकंदर वर्णनावरून तो दिवस शिवाजीं महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे सुवर्णक्षरांनी लिहून ठेवण्याजोगा नव्हता काय? होय, त्याने तोरणागडाच्या प्रवेशद्वारावर तरवारीच्या टोकाने जी अक्षरे लिहिली, ती वाचून त्या काळच्या मावळ्यांत चैतन्य उत्पन्न झाले! तसे चैतन्य भावी पिढीत उत्पन्न होण्याकरिता प्रस्तुत लेखक आपल्या लेखणीने तीच अक्षरे लिहितो, ती वाचा - - स्वराज्याचा श्रीगणेशा! नाथमाधवांच्या लिखाणास पुरतं शतक उलटलं, तरी त्यांच्या कादंबर्‍या केव्हाही हातात घेऊन वाचायला सुरुवात केली की त्या खाली ठेवावाशा वाटत नाहीत. त्यांच्या लेखनाची आणखी पावती ती कोणती?
Admin
Admin
Admin
Admin

Posts : 269
Join date : 12/05/2012

https://aplemarathijagat.catsboard.com

वापस वरती Go down

वापस वरती


 
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही