Latest topics
बटाटा.. कसा उकडावा? कसा शिजवावा?
Sun Jun 24, 2012 3:33 pm by Admin
भात, डाळ आणि पोळीनंतर नंबर लागतो तो भाजीचा. भाज्यामध्ये जास्त करून क - जीवनसत्त्व असतं, ज्याचा शरीर साठा करून ठेवू शकत नाही आणि ते अन्नामधून रोजच्या रोज …
[ Full reading ]
Comments: 0
अस्सल वासाचं अस्सल चवीचं
Sun May 20, 2012 1:24 am by mansijoshi
मेन्यूकार्डवर भिरभिरणारी नजर 'स्टफ्ड बोंबिल'वर स्थिरावते. भरलेलं पापलेट, भरलेले खेकडे ठाऊक असतात. पण भरलेले बोंबिल? काहीशा आश्चर्यानेच मग 'स्टफ्ड …
[ Full reading ]
Comments: 0
चमचमीत आणि आरोग्यदायी
Sun May 13, 2012 9:39 am by vijaynjoshi
रस्त्यावरील भेळपुरी असो वा चकचकीत हॉटेलांतील पिझ्झा-बर्गर, अनभेसळीविरोधातील कायदा आता अधिक व्यापकपणे राबवला जाणार आहे. मात्र कायद्याची अमलबजावणी …
[ Full reading ]
Comments: 0
ऑनलाइन कोण आहे
सध्या येथे एकूण 1 सदस्य ऑनलाइन आहेत :: 0 नोंदित, 0 लपलेले आणि 1 पाहुणे एकही नाही
19 इतके सर्वात जास्त सदस्य ऑनलाइन Fri Aug 31, 2018 10:36 pm यावेळेस होते
शोध
Keywords
'आयटीआय'ची ग्लोबल भरारी
:: शैक्षणिक
पृष्ठ 1 - 1 पैकी
'आयटीआय'ची ग्लोबल भरारी
' आयटीआय करतोय... हो का?'... 'का, रे इंजिनीअरिंगला अॅडमिशन नाही मिळाली का?'... असा नाक मुरडून काढलेला सूर आयटीआयच्या विद्यार्थ्यांना ऐकावयला मिळतो. पण, जेव्हा हीच मुले इंजिनीअर्सच्या तोडीस तोड काम करून परदेशी रवाना होतात तेव्हा मात्र त्यांची कॉलर ताठ होते आणि नाके मुरडणारी मंडळीही कौतुकाची थाप मारण्यास विसरत नाही. अशी कौतुकाची थाप गेल्या तीन वर्षांमध्ये आयटीआयच्या तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी मिळवली आहे. हे सर्व विद्यार्थी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये चांगल्या पगाराची नोकरी करत असून त्यातील काही तेथेच स्थायिक झाले आहेत.
दहावीत कमी टक्के मिळाले तरी आपल्या मुलाला डोनेशन भरून कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळतोय का, यासाठी पालक प्रयत्न करत असतात. पण, शंभर टक्के नोकरीची हमी असलेल्या या कौशल्य अभ्यासक्रमांकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होते. अनेकाना हा 'ब्ल्यू कॉलर' जॉब म्हणून कमीपणाचा वाटतो. पण प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना जागतिक मार्केटमध्ये खूप मोठी संधी आहे, याकडे असे मुलुंड आयटीआयचे मुख्याध्यापक पुरषोत्तम वाघ यांनी लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्ट्रिशियन आणि एसी मॅकेनिक्सची मोठी कमी जाणवते. अशा विद्यार्थ्यांना तेथे खूप मोठी मागणी आहे. तेथे आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येते. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. दरवषीर् दोनदा ही भरती प्रक्रिया पार पडते आणि विद्यार्थ्यांना यातून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येते. व्हिटासीस नावाची कंपनी या प्रक्रियेसाठी दोन्ही सरकारमधील दुवा म्हणून काम करते. मुलुंड आयटीआयमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या मुलाखती, प्रॅक्टिकल परीक्षांचे आयोजन करण्यात येते, असेही वाघ यांनी सांगितले.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आजपर्यंत २८३ विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहेत. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच सौदीमधील तसेच काही पाश्चिमात्य देशांमध्येही आयटीआय विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. मात्र त्या देशांशी कोणताही करार न झाल्यामुळे आम्ही त्याची जबाबदारी घेत नसल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.
दहावीत कमी टक्के मिळाले तरी आपल्या मुलाला डोनेशन भरून कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्रवेश मिळतोय का, यासाठी पालक प्रयत्न करत असतात. पण, शंभर टक्के नोकरीची हमी असलेल्या या कौशल्य अभ्यासक्रमांकडे मात्र पालकांचे दुर्लक्ष होते. अनेकाना हा 'ब्ल्यू कॉलर' जॉब म्हणून कमीपणाचा वाटतो. पण प्रत्यक्षात या विद्यार्थ्यांना जागतिक मार्केटमध्ये खूप मोठी संधी आहे, याकडे असे मुलुंड आयटीआयचे मुख्याध्यापक पुरषोत्तम वाघ यांनी लक्ष वेधले.
ऑस्ट्रेलियामध्ये इलेक्ट्रिशियन आणि एसी मॅकेनिक्सची मोठी कमी जाणवते. अशा विद्यार्थ्यांना तेथे खूप मोठी मागणी आहे. तेथे आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना प्रशिक्षण देऊन ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात येते. यासाठी ऑस्ट्रेलियन सरकार आणि महाराष्ट्र सरकारचा करार झाला आहे. दरवषीर् दोनदा ही भरती प्रक्रिया पार पडते आणि विद्यार्थ्यांना यातून ऑस्ट्रेलियाला पाठविण्यात येते. व्हिटासीस नावाची कंपनी या प्रक्रियेसाठी दोन्ही सरकारमधील दुवा म्हणून काम करते. मुलुंड आयटीआयमध्ये अशा विद्यार्थ्यांच्या मुलाखती, प्रॅक्टिकल परीक्षांचे आयोजन करण्यात येते, असेही वाघ यांनी सांगितले.
या योजनेचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. गेल्या तीन वर्षांपासून सुरू झालेल्या या योजनेंतर्गत आजपर्यंत २८३ विद्यार्थी ऑस्ट्रेलियामध्ये गेले आहेत. ऑस्ट्रेलियाप्रमाणेच सौदीमधील तसेच काही पाश्चिमात्य देशांमध्येही आयटीआय विद्यार्थ्यांना मोठी मागणी आहे. मात्र त्या देशांशी कोणताही करार न झाल्यामुळे आम्ही त्याची जबाबदारी घेत नसल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले.
aplemarathijagat- Member
- Posts : 47
Join date : 15/05/2012
:: शैक्षणिक
पृष्ठ 1 - 1 पैकी
Permissions in this forum:
तुम्ही या सार्वत्रिकेत विषयाला प्रतिक्रिया देऊ शकत नाही
|
|
Wed Jun 19, 2013 1:08 am by Admin
» दहावीनंतर करिअरच्या वाटा
Fri May 24, 2013 1:09 am by Admin
» खिद्रापूर- कोपेश्वर मंदिर
Sat Feb 16, 2013 9:00 pm by Admin
» अँड्रॉइडच्या बनावट आवृत्तीचा शिरकाव
Sat Feb 16, 2013 1:33 pm by Admin
» मराठी डॉक्टरच्या 'टुथब्रश'नं अमेरिका 'चमकली'
Sat Feb 16, 2013 1:28 pm by Admin
» नवीन सदस्यांना आग्रहाची विनंती
Sat Feb 16, 2013 1:23 pm by Admin
» ई विश्व आणि टपालखाते
Wed Jan 16, 2013 3:00 pm by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे उपसंचालक पदाच्या २ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin
» महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे समाज कल्याण अधिकारी पदाच्या ३६ जागा
Sat Jul 07, 2012 2:06 am by Admin